शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

माथाडींनी धडक देताच सुरू झाला कांदा-बटाटा मार्केटचे पाणी

By नारायण जाधव | Updated: June 24, 2024 17:55 IST

चर्चेनंतर महापालिकेने पाणीपुरवठा सुरू केल्याने माथाडी कामागांनी आनंद व्यक्त केला आहे

नवी मुंबई : इमारती धोकादायक असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून नवी मुंबई महापालिकेने येथील एपीएमसी मार्केटच्या कांदा-बटाटा मार्केटसह सुविधा इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे २० जूनपासून येथे काम करणाऱ्या माथाडी कामगारांसह व्यापारी यांचे हाल सुरू झाले होते. त्यामुळे माथाडी कामगारांनी हा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सोमवारी माथाडी नेते नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली थेट महापालिकेवर धडक दिली. त्यानंतर आयुक्त कैलास शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर महापालिकेने पाणीपुरवठा सुरू केल्याने कामागांनी आनंद व्यक्त केला आहे.

कांदा-बटाटा मार्केट परिसरात व्यापारी आणि माथाडी कामगार मिळून पाच हजार लोक काम करतात. या सर्वांचे २० जूनपासून गेले चार चार दिवस पाण्यावाचून प्रचंड हाल सुरू होते. त्यात विशेषत: महिला कामगार, ग्राहकांची तर मोठी कुचंबणा होत होती. मात्र, एपीएमसी प्रशासनाने आपली जबाबदारी झटकून महापालकेकडे बोट दाखविले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी माथाडी कामगारांनी सोमवारी सकाळी अचानक मार्केट बंद ठेवून महापालिकेकडे कुच केले. त्यात बस, ट्रक, मोटारसायकलींसह कामगार आपले नेते नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर धडकले. येथे द्वारसभा घेऊन नरेंद्र पाटील यांनी महापालिकेवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर आयु्क्त कैलास शिंदे सोबत चर्चा केली. आयुक्तांनी व्यापारी हमी पत्र लिहून देण्याच्या अटीवर मार्केटचा पाणीपुरवठा तत्काळ सुरू केला.

आयुक्तांनी मागितले हे हमीपत्र

कांदा-बटाटा मार्केटची इमारत अतिधोकादायक झाली आहे. यामुळे पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी शासनाच्या नियमानुसारच पाणीपुरवठा खंडित केल्याचे आयुक्त कैलास शिंदे यांनी माथाडी नेत्यांना सांगितले. त्यानंतर मार्केटमधील प्रत्येक व्यापाऱ्याने आपला गाळा क्रमांक लिहून पावसाळ्यात दुर्दैवाने एखादी दुर्घटना झाल्यास त्यास आम्ही जबाबदार राहू असे हमीपत्र लिहून दिल्यास पाणीपुरवठा त्वरीत सुरू कसे सांगितले. आयुक्तांची ही अट माथाडीनी मान्य केले. त्यानुसार येत्या दोन दिवसांत व्यापाऱ्यांनी हे हमी पत्र द्यायचे आहे. मात्र, ही बैठक संपल्यानंतर लगेच पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यामुळे व्यापारी आणि माथाडींनी आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबईchandrakant patilचंद्रकांत पाटील