शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
4
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
5
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
6
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टूक बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
7
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
8
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
9
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
10
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
11
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
12
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
13
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
14
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
15
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
16
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
17
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
18
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
19
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
20
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

माथाडींनी धडक देताच सुरू झाला कांदा-बटाटा मार्केटचे पाणी

By नारायण जाधव | Updated: June 24, 2024 17:55 IST

चर्चेनंतर महापालिकेने पाणीपुरवठा सुरू केल्याने माथाडी कामागांनी आनंद व्यक्त केला आहे

नवी मुंबई : इमारती धोकादायक असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून नवी मुंबई महापालिकेने येथील एपीएमसी मार्केटच्या कांदा-बटाटा मार्केटसह सुविधा इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे २० जूनपासून येथे काम करणाऱ्या माथाडी कामगारांसह व्यापारी यांचे हाल सुरू झाले होते. त्यामुळे माथाडी कामगारांनी हा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सोमवारी माथाडी नेते नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली थेट महापालिकेवर धडक दिली. त्यानंतर आयुक्त कैलास शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर महापालिकेने पाणीपुरवठा सुरू केल्याने कामागांनी आनंद व्यक्त केला आहे.

कांदा-बटाटा मार्केट परिसरात व्यापारी आणि माथाडी कामगार मिळून पाच हजार लोक काम करतात. या सर्वांचे २० जूनपासून गेले चार चार दिवस पाण्यावाचून प्रचंड हाल सुरू होते. त्यात विशेषत: महिला कामगार, ग्राहकांची तर मोठी कुचंबणा होत होती. मात्र, एपीएमसी प्रशासनाने आपली जबाबदारी झटकून महापालकेकडे बोट दाखविले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी माथाडी कामगारांनी सोमवारी सकाळी अचानक मार्केट बंद ठेवून महापालिकेकडे कुच केले. त्यात बस, ट्रक, मोटारसायकलींसह कामगार आपले नेते नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर धडकले. येथे द्वारसभा घेऊन नरेंद्र पाटील यांनी महापालिकेवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर आयु्क्त कैलास शिंदे सोबत चर्चा केली. आयुक्तांनी व्यापारी हमी पत्र लिहून देण्याच्या अटीवर मार्केटचा पाणीपुरवठा तत्काळ सुरू केला.

आयुक्तांनी मागितले हे हमीपत्र

कांदा-बटाटा मार्केटची इमारत अतिधोकादायक झाली आहे. यामुळे पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी शासनाच्या नियमानुसारच पाणीपुरवठा खंडित केल्याचे आयुक्त कैलास शिंदे यांनी माथाडी नेत्यांना सांगितले. त्यानंतर मार्केटमधील प्रत्येक व्यापाऱ्याने आपला गाळा क्रमांक लिहून पावसाळ्यात दुर्दैवाने एखादी दुर्घटना झाल्यास त्यास आम्ही जबाबदार राहू असे हमीपत्र लिहून दिल्यास पाणीपुरवठा त्वरीत सुरू कसे सांगितले. आयुक्तांची ही अट माथाडीनी मान्य केले. त्यानुसार येत्या दोन दिवसांत व्यापाऱ्यांनी हे हमी पत्र द्यायचे आहे. मात्र, ही बैठक संपल्यानंतर लगेच पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यामुळे व्यापारी आणि माथाडींनी आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबईchandrakant patilचंद्रकांत पाटील