शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

माथाडींनी धडक देताच सुरू झाला कांदा-बटाटा मार्केटचे पाणी

By नारायण जाधव | Updated: June 24, 2024 17:55 IST

चर्चेनंतर महापालिकेने पाणीपुरवठा सुरू केल्याने माथाडी कामागांनी आनंद व्यक्त केला आहे

नवी मुंबई : इमारती धोकादायक असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून नवी मुंबई महापालिकेने येथील एपीएमसी मार्केटच्या कांदा-बटाटा मार्केटसह सुविधा इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे २० जूनपासून येथे काम करणाऱ्या माथाडी कामगारांसह व्यापारी यांचे हाल सुरू झाले होते. त्यामुळे माथाडी कामगारांनी हा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सोमवारी माथाडी नेते नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली थेट महापालिकेवर धडक दिली. त्यानंतर आयुक्त कैलास शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर महापालिकेने पाणीपुरवठा सुरू केल्याने कामागांनी आनंद व्यक्त केला आहे.

कांदा-बटाटा मार्केट परिसरात व्यापारी आणि माथाडी कामगार मिळून पाच हजार लोक काम करतात. या सर्वांचे २० जूनपासून गेले चार चार दिवस पाण्यावाचून प्रचंड हाल सुरू होते. त्यात विशेषत: महिला कामगार, ग्राहकांची तर मोठी कुचंबणा होत होती. मात्र, एपीएमसी प्रशासनाने आपली जबाबदारी झटकून महापालकेकडे बोट दाखविले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी माथाडी कामगारांनी सोमवारी सकाळी अचानक मार्केट बंद ठेवून महापालिकेकडे कुच केले. त्यात बस, ट्रक, मोटारसायकलींसह कामगार आपले नेते नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर धडकले. येथे द्वारसभा घेऊन नरेंद्र पाटील यांनी महापालिकेवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर आयु्क्त कैलास शिंदे सोबत चर्चा केली. आयुक्तांनी व्यापारी हमी पत्र लिहून देण्याच्या अटीवर मार्केटचा पाणीपुरवठा तत्काळ सुरू केला.

आयुक्तांनी मागितले हे हमीपत्र

कांदा-बटाटा मार्केटची इमारत अतिधोकादायक झाली आहे. यामुळे पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी शासनाच्या नियमानुसारच पाणीपुरवठा खंडित केल्याचे आयुक्त कैलास शिंदे यांनी माथाडी नेत्यांना सांगितले. त्यानंतर मार्केटमधील प्रत्येक व्यापाऱ्याने आपला गाळा क्रमांक लिहून पावसाळ्यात दुर्दैवाने एखादी दुर्घटना झाल्यास त्यास आम्ही जबाबदार राहू असे हमीपत्र लिहून दिल्यास पाणीपुरवठा त्वरीत सुरू कसे सांगितले. आयुक्तांची ही अट माथाडीनी मान्य केले. त्यानुसार येत्या दोन दिवसांत व्यापाऱ्यांनी हे हमी पत्र द्यायचे आहे. मात्र, ही बैठक संपल्यानंतर लगेच पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यामुळे व्यापारी आणि माथाडींनी आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबईchandrakant patilचंद्रकांत पाटील