शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 00:40 IST

उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यात येणार

- वैभव गायकरपनवेल : पनवेलमध्ये यंदा विक्र मी पावसाची नोंद झाली असली तरी शहरवासीयांची पाणीकपातीतून मुक्तता होणार नाही. शहरवासीयांच्या मागणीच्या तुलनेमध्ये धरणामध्ये कमी साठा आहे, यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोरपणे वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाणीकपात वेगवेगळ्या विभागात चार वेगवेगळ्या दिवशी केल्याने एकत्रितपणे पनवेलकरांवर त्याचा अतिरिक्त ताण पडणार नाही. महानगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग (आप्पासाहेब वेदक) धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने या धरणाची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. २६०० एमएलडी साठवणूक क्षमता असलेल्या या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणाची साठवणूक क्षमता १७०० एमएलडीवर येऊन ठेपली आहे. यापैकी केवळ १५०० एमएलडी पाण्याचा वापर करता येतो. दरवर्षी उन्हाळ्यात पनवेलमध्ये प्रचंड पाणीसमस्या निर्माण होते.

सध्याच्या घडीला पनवेल शहराला सुमारे २८ ते ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते, अशा परिस्थितीत देहरंग धरणातून १७ एमएलडी, एमजीपीकडून ४ ते ५ एमएलडी व एमआयडीसीकडून ६ एमएलडी पाण्याचे नियोजन केले जाते. विविध विभागांत केलेल्या पाणीकपातीमुळे आठवडाभरात सुमारे ६ ते ७ एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाण्याच्या तुटवड्यावर आताच नियोजन करण्याच्या दृष्टीने या बचतीमुळे महिन्याला सुमारे १२० एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. त्या दृष्टीने हे नियोजन केले असल्याचे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी उल्हास वाढ यांनी सांगितले.

शहरातील पाण्याचा तुटवडा लक्षात घेता एमजेपीकडे अतिरिक्त पाण्याची मागणी केली आहे. सोमवारी यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे. एमजेपीकडून अतिरिक्त ८ एमएलडी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. हे पाणी मिळाल्यास शहरातील पाणीसमस्या दूर होण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात पनवेल संघर्ष समितीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव वेलसरू यांना पत्र लिहून अतिरिक्त १५ एमएलडी पाणी पालिकेला देऊन रसायनी ते जेएनपीटी जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली आहे.

साठलेल्या गाळाचा सर्व्हे करणार

पनवेल तालुक्यात विक्र मी पावसाची नोंद या वर्षी झाली. सुमारे २९ वर्षांचा विक्र म या पावसाने तोडल्याने मोठ्या प्रमाणात गाळ देहरंग धरणात पोहोचल्याची शक्यता आहे. गाळ साचल्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होण्याची शक्यता असल्याने धरणात किती गाळ साचला आहे. यासंदर्भात सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकारी वाड यांनी दिली. उन्हाळ्यात पाण्याने तळ गाठल्यावर सर्व्हे करण्यात येणार आहे.

२०१८ पासूनच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या वर्षी आठवड्यातून एकदा विभागवार पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा इतर प्राधिकरणाकडून मिळेल, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत.- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :WaterपाणीpanvelपनवेलMaharashtraमहाराष्ट्रNavi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका