शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 00:40 IST

उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यात येणार

- वैभव गायकरपनवेल : पनवेलमध्ये यंदा विक्र मी पावसाची नोंद झाली असली तरी शहरवासीयांची पाणीकपातीतून मुक्तता होणार नाही. शहरवासीयांच्या मागणीच्या तुलनेमध्ये धरणामध्ये कमी साठा आहे, यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोरपणे वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाणीकपात वेगवेगळ्या विभागात चार वेगवेगळ्या दिवशी केल्याने एकत्रितपणे पनवेलकरांवर त्याचा अतिरिक्त ताण पडणार नाही. महानगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग (आप्पासाहेब वेदक) धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने या धरणाची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. २६०० एमएलडी साठवणूक क्षमता असलेल्या या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणाची साठवणूक क्षमता १७०० एमएलडीवर येऊन ठेपली आहे. यापैकी केवळ १५०० एमएलडी पाण्याचा वापर करता येतो. दरवर्षी उन्हाळ्यात पनवेलमध्ये प्रचंड पाणीसमस्या निर्माण होते.

सध्याच्या घडीला पनवेल शहराला सुमारे २८ ते ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते, अशा परिस्थितीत देहरंग धरणातून १७ एमएलडी, एमजीपीकडून ४ ते ५ एमएलडी व एमआयडीसीकडून ६ एमएलडी पाण्याचे नियोजन केले जाते. विविध विभागांत केलेल्या पाणीकपातीमुळे आठवडाभरात सुमारे ६ ते ७ एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाण्याच्या तुटवड्यावर आताच नियोजन करण्याच्या दृष्टीने या बचतीमुळे महिन्याला सुमारे १२० एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. त्या दृष्टीने हे नियोजन केले असल्याचे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी उल्हास वाढ यांनी सांगितले.

शहरातील पाण्याचा तुटवडा लक्षात घेता एमजेपीकडे अतिरिक्त पाण्याची मागणी केली आहे. सोमवारी यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे. एमजेपीकडून अतिरिक्त ८ एमएलडी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. हे पाणी मिळाल्यास शहरातील पाणीसमस्या दूर होण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात पनवेल संघर्ष समितीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव वेलसरू यांना पत्र लिहून अतिरिक्त १५ एमएलडी पाणी पालिकेला देऊन रसायनी ते जेएनपीटी जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली आहे.

साठलेल्या गाळाचा सर्व्हे करणार

पनवेल तालुक्यात विक्र मी पावसाची नोंद या वर्षी झाली. सुमारे २९ वर्षांचा विक्र म या पावसाने तोडल्याने मोठ्या प्रमाणात गाळ देहरंग धरणात पोहोचल्याची शक्यता आहे. गाळ साचल्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होण्याची शक्यता असल्याने धरणात किती गाळ साचला आहे. यासंदर्भात सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकारी वाड यांनी दिली. उन्हाळ्यात पाण्याने तळ गाठल्यावर सर्व्हे करण्यात येणार आहे.

२०१८ पासूनच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या वर्षी आठवड्यातून एकदा विभागवार पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा इतर प्राधिकरणाकडून मिळेल, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत.- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :WaterपाणीpanvelपनवेलMaharashtraमहाराष्ट्रNavi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका