शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 00:40 IST

उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यात येणार

- वैभव गायकरपनवेल : पनवेलमध्ये यंदा विक्र मी पावसाची नोंद झाली असली तरी शहरवासीयांची पाणीकपातीतून मुक्तता होणार नाही. शहरवासीयांच्या मागणीच्या तुलनेमध्ये धरणामध्ये कमी साठा आहे, यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोरपणे वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाणीकपात वेगवेगळ्या विभागात चार वेगवेगळ्या दिवशी केल्याने एकत्रितपणे पनवेलकरांवर त्याचा अतिरिक्त ताण पडणार नाही. महानगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग (आप्पासाहेब वेदक) धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने या धरणाची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. २६०० एमएलडी साठवणूक क्षमता असलेल्या या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणाची साठवणूक क्षमता १७०० एमएलडीवर येऊन ठेपली आहे. यापैकी केवळ १५०० एमएलडी पाण्याचा वापर करता येतो. दरवर्षी उन्हाळ्यात पनवेलमध्ये प्रचंड पाणीसमस्या निर्माण होते.

सध्याच्या घडीला पनवेल शहराला सुमारे २८ ते ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते, अशा परिस्थितीत देहरंग धरणातून १७ एमएलडी, एमजीपीकडून ४ ते ५ एमएलडी व एमआयडीसीकडून ६ एमएलडी पाण्याचे नियोजन केले जाते. विविध विभागांत केलेल्या पाणीकपातीमुळे आठवडाभरात सुमारे ६ ते ७ एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाण्याच्या तुटवड्यावर आताच नियोजन करण्याच्या दृष्टीने या बचतीमुळे महिन्याला सुमारे १२० एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. त्या दृष्टीने हे नियोजन केले असल्याचे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी उल्हास वाढ यांनी सांगितले.

शहरातील पाण्याचा तुटवडा लक्षात घेता एमजेपीकडे अतिरिक्त पाण्याची मागणी केली आहे. सोमवारी यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे. एमजेपीकडून अतिरिक्त ८ एमएलडी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. हे पाणी मिळाल्यास शहरातील पाणीसमस्या दूर होण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात पनवेल संघर्ष समितीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव वेलसरू यांना पत्र लिहून अतिरिक्त १५ एमएलडी पाणी पालिकेला देऊन रसायनी ते जेएनपीटी जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली आहे.

साठलेल्या गाळाचा सर्व्हे करणार

पनवेल तालुक्यात विक्र मी पावसाची नोंद या वर्षी झाली. सुमारे २९ वर्षांचा विक्र म या पावसाने तोडल्याने मोठ्या प्रमाणात गाळ देहरंग धरणात पोहोचल्याची शक्यता आहे. गाळ साचल्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होण्याची शक्यता असल्याने धरणात किती गाळ साचला आहे. यासंदर्भात सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकारी वाड यांनी दिली. उन्हाळ्यात पाण्याने तळ गाठल्यावर सर्व्हे करण्यात येणार आहे.

२०१८ पासूनच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या वर्षी आठवड्यातून एकदा विभागवार पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा इतर प्राधिकरणाकडून मिळेल, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत.- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :WaterपाणीpanvelपनवेलMaharashtraमहाराष्ट्रNavi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका