शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नवी मुंबईसह खारघर,कामोठेत उद्या पाणीबाणी; जलवाहिनीची पावसाळापूर्वी दुरुस्ती

By नामदेव मोरे | Updated: May 27, 2024 20:02 IST

बुधवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा

नवी मुंबई : मोरबे धरण ते दिघा जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे नवी मुंबई, खारघर व कामोठे परिसरातील पाणीपुरवठा २८ मे रोजी बंद राहणार आहे. बुधवारीही कमी दाबाने पाणी येणार असल्यामुळे नागरिकांनी त्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सीबीडी ते ऐरोली दरम्यान मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. खारघर ते कामोठे वसाहतीलाही मोरबे धरणातून पाणी पुरवले जाते. पावसाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत करता यावा यासाठी मोरबे धरण ते दिघा दरम्यानच्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. 

यामुळे मंगळवारी सकाळी १० ते रात्री १२ पर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. संपूर्ण शहराला दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही. याशिवाय या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होणाऱ्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर कामोठे विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी पाणी पुरवले जाणार असले तरी ते कमी दाबाने उपलब्ध होईल असे महानगरपालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी सांगितले आहे.

एक दिवस पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार असल्यामुळे व दुसऱ्या दिवशी कमी पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी साठ्याचा योग्य पद्धतीने वापर करावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी