शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

रस्त्यांच्या कामामधील त्रुटीमुळेच पाणी, गाळ साचण्याचे प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 00:21 IST

रस्त्यांच्या कामादरम्यान तांत्रिक बाबींकडे ठेकेदारांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नवी मुंबई : रस्त्यांच्या कामादरम्यान तांत्रिक बाबींकडे ठेकेदारांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे रस्त्यांच्या आराखड्यात त्रुटी निर्माण होऊन जागोजागी पाणी तसेच गाळ साचण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, या प्रकारामुळे दुचाकीस्वारांना अपघातांचे निमंत्रण मिळत आहे.शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करताना रस्त्याचा उतार लगतच्या नाल्याच्या दिशेने करणे आवश्यक आहे. याकरिता रस्त्यांची कामे केली जाताना ती अत्यंत बारकाईने तपासली गेली पाहिजेत. मात्र, नवी मुंबई महापालिकेकडून ठेकेदारांना काम दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याला बगल दिली जाते. यामुळे तांत्रिक बाबींचे गांभीर्य लक्षात न घेता, सरसकट डांबरीकरण उरकण्याचे काम ठेकेदाराकडून केले जाते. याकरिता रस्त्याचा उतार योग्य झाला आहे का हे देखील तपासले जात नाही. परिणामी शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळते. त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. हाच निष्काळजीपणा पावसाळ्यात देखील डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यांचा उतार योग्य दिशेला नसल्याने मध्यभागी पाणी साचणे, अथवा गटारांच्या विरुद्ध दिशेने पाणी वाहणे असे प्रकार रस्त्यांवर पाहायला मिळत आहेत. त्यातूनच काही ठिकाणी पाण्यासोबत वाहून आलेला मातीचा गाळ रस्त्यालगत साचत आहे. यामुळे त्याठिकाणी रस्ता निसरडा होऊन दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रकार घडत आहेत. शिवाय अशा ठिकाणी स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण होत आहे. ही बाब पालिकेकडून गांभीर्याने घेऊन रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या सदोष कार्यपद्धतीत सुधार करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अभयचंद्र सावंत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. भविष्यात रस्त्यांचे डांबरीकरण करताना या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.