शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या कामामधील त्रुटीमुळेच पाणी, गाळ साचण्याचे प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 00:21 IST

रस्त्यांच्या कामादरम्यान तांत्रिक बाबींकडे ठेकेदारांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नवी मुंबई : रस्त्यांच्या कामादरम्यान तांत्रिक बाबींकडे ठेकेदारांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे रस्त्यांच्या आराखड्यात त्रुटी निर्माण होऊन जागोजागी पाणी तसेच गाळ साचण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, या प्रकारामुळे दुचाकीस्वारांना अपघातांचे निमंत्रण मिळत आहे.शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करताना रस्त्याचा उतार लगतच्या नाल्याच्या दिशेने करणे आवश्यक आहे. याकरिता रस्त्यांची कामे केली जाताना ती अत्यंत बारकाईने तपासली गेली पाहिजेत. मात्र, नवी मुंबई महापालिकेकडून ठेकेदारांना काम दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याला बगल दिली जाते. यामुळे तांत्रिक बाबींचे गांभीर्य लक्षात न घेता, सरसकट डांबरीकरण उरकण्याचे काम ठेकेदाराकडून केले जाते. याकरिता रस्त्याचा उतार योग्य झाला आहे का हे देखील तपासले जात नाही. परिणामी शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळते. त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. हाच निष्काळजीपणा पावसाळ्यात देखील डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यांचा उतार योग्य दिशेला नसल्याने मध्यभागी पाणी साचणे, अथवा गटारांच्या विरुद्ध दिशेने पाणी वाहणे असे प्रकार रस्त्यांवर पाहायला मिळत आहेत. त्यातूनच काही ठिकाणी पाण्यासोबत वाहून आलेला मातीचा गाळ रस्त्यालगत साचत आहे. यामुळे त्याठिकाणी रस्ता निसरडा होऊन दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रकार घडत आहेत. शिवाय अशा ठिकाणी स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण होत आहे. ही बाब पालिकेकडून गांभीर्याने घेऊन रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या सदोष कार्यपद्धतीत सुधार करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अभयचंद्र सावंत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. भविष्यात रस्त्यांचे डांबरीकरण करताना या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.