शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोली तलावातील पाण्याला दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 04:52 IST

पाण्याचा कपडे धुण्यासाठी वापर : निर्माल्य उचलण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

नवी मुंबई : शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महापालिकेने निर्माण केलेल्या तलावांच्या देखभालीवर महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे तलावातील पाण्यात कपडे धुणे, अंघोळ करणे यासारखे प्रकार होत असून पाण्याचा गैरवापर केला जात आहे. निर्माल्य कलशांची दुरवस्था झाल्याने निर्माल्य तलावात टाकले जात असून, यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. या पाण्याला दुर्गंधी सुटली असून, त्यामुळे तलाव परिसरात येणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.

नवी मुंबई शहराला उद्यानांचे शहर म्हणून संबोधण्यात येते. शहरात तलावांची निर्मिती करताना, तसेच जुन्या तलावांचा पुनर्विकास करताना तलावांच्याभोवती देखील महापालिकेने हिरवळ, उद्याने, ज्येष्ठ नागरिक केंद्र, ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी आदी सुविधा निर्माण केल्या आहेत; परंतु या परिसराची देखभाल होत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तलावातील पाण्यात कपडे धुणे, अंघोळ करणे यासाठी बंदी घालण्यात आली आहे; परंतु तलावातील पाण्याच्या गैरवापरावर महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने नियमांची पायमल्ली केली जात आहे. शिरवणे येथील चिंचोली तलावात कपडे धुणे, अंघोळ करणे यासारखे प्रकार घडत आहेत. दिवाळीमुळे तलावाजवळील निर्माल्य कलशांजवळ मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचले आहे. निर्माल्य कलशांची झाकणे तुटलेली आहेत त्यामुळे निर्माल्य कलशात टाकलेले निर्माल्य पुन्हा बाहेर पडत आहे. त्यामुळे कलशाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचले आहे. गणपती आणि देवी विसर्जनाच्यावेळी वापरण्यात आलेले लाकडी तराफे तलावातील पाण्यातून बाहेर काढण्यात आलेले नाहीत. निर्माल्य कलाशाजवळ साचलेले निर्माल्य पाहून अनेक नागरिक निर्माल्य तलावातील पाण्यात टाकत आहेत. तलावातील पाण्याचा होणारा गैरवापर आणि निर्माल्य यामुळे तलावातील पाणी दूषित झाले असून या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे तलाव परिसरातील उद्यानात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तलाव परिसरात रात्री मद्यपी मद्यपान करत असून अनेक ठिकाणी मद्याच्या मोकळ्या आणि फुटलेल्या काचेच्या बाटल्यांचे तुकडे पडले आहेत. सुरक्षारक्षक नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. तलाव परिसरात महापालिकेने स्वच्छता ठेवावी, तसेच या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबईchinchole chowkचिंचोले चौक