शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

चिंचोली तलावातील पाण्याला दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 04:52 IST

पाण्याचा कपडे धुण्यासाठी वापर : निर्माल्य उचलण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

नवी मुंबई : शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महापालिकेने निर्माण केलेल्या तलावांच्या देखभालीवर महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे तलावातील पाण्यात कपडे धुणे, अंघोळ करणे यासारखे प्रकार होत असून पाण्याचा गैरवापर केला जात आहे. निर्माल्य कलशांची दुरवस्था झाल्याने निर्माल्य तलावात टाकले जात असून, यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. या पाण्याला दुर्गंधी सुटली असून, त्यामुळे तलाव परिसरात येणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.

नवी मुंबई शहराला उद्यानांचे शहर म्हणून संबोधण्यात येते. शहरात तलावांची निर्मिती करताना, तसेच जुन्या तलावांचा पुनर्विकास करताना तलावांच्याभोवती देखील महापालिकेने हिरवळ, उद्याने, ज्येष्ठ नागरिक केंद्र, ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी आदी सुविधा निर्माण केल्या आहेत; परंतु या परिसराची देखभाल होत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तलावातील पाण्यात कपडे धुणे, अंघोळ करणे यासाठी बंदी घालण्यात आली आहे; परंतु तलावातील पाण्याच्या गैरवापरावर महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने नियमांची पायमल्ली केली जात आहे. शिरवणे येथील चिंचोली तलावात कपडे धुणे, अंघोळ करणे यासारखे प्रकार घडत आहेत. दिवाळीमुळे तलावाजवळील निर्माल्य कलशांजवळ मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचले आहे. निर्माल्य कलशांची झाकणे तुटलेली आहेत त्यामुळे निर्माल्य कलशात टाकलेले निर्माल्य पुन्हा बाहेर पडत आहे. त्यामुळे कलशाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचले आहे. गणपती आणि देवी विसर्जनाच्यावेळी वापरण्यात आलेले लाकडी तराफे तलावातील पाण्यातून बाहेर काढण्यात आलेले नाहीत. निर्माल्य कलाशाजवळ साचलेले निर्माल्य पाहून अनेक नागरिक निर्माल्य तलावातील पाण्यात टाकत आहेत. तलावातील पाण्याचा होणारा गैरवापर आणि निर्माल्य यामुळे तलावातील पाणी दूषित झाले असून या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे तलाव परिसरातील उद्यानात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तलाव परिसरात रात्री मद्यपी मद्यपान करत असून अनेक ठिकाणी मद्याच्या मोकळ्या आणि फुटलेल्या काचेच्या बाटल्यांचे तुकडे पडले आहेत. सुरक्षारक्षक नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. तलाव परिसरात महापालिकेने स्वच्छता ठेवावी, तसेच या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबईchinchole chowkचिंचोले चौक