शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

चिंचोली तलावातील पाण्याला दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 04:52 IST

पाण्याचा कपडे धुण्यासाठी वापर : निर्माल्य उचलण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

नवी मुंबई : शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महापालिकेने निर्माण केलेल्या तलावांच्या देखभालीवर महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे तलावातील पाण्यात कपडे धुणे, अंघोळ करणे यासारखे प्रकार होत असून पाण्याचा गैरवापर केला जात आहे. निर्माल्य कलशांची दुरवस्था झाल्याने निर्माल्य तलावात टाकले जात असून, यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. या पाण्याला दुर्गंधी सुटली असून, त्यामुळे तलाव परिसरात येणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.

नवी मुंबई शहराला उद्यानांचे शहर म्हणून संबोधण्यात येते. शहरात तलावांची निर्मिती करताना, तसेच जुन्या तलावांचा पुनर्विकास करताना तलावांच्याभोवती देखील महापालिकेने हिरवळ, उद्याने, ज्येष्ठ नागरिक केंद्र, ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी आदी सुविधा निर्माण केल्या आहेत; परंतु या परिसराची देखभाल होत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तलावातील पाण्यात कपडे धुणे, अंघोळ करणे यासाठी बंदी घालण्यात आली आहे; परंतु तलावातील पाण्याच्या गैरवापरावर महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने नियमांची पायमल्ली केली जात आहे. शिरवणे येथील चिंचोली तलावात कपडे धुणे, अंघोळ करणे यासारखे प्रकार घडत आहेत. दिवाळीमुळे तलावाजवळील निर्माल्य कलशांजवळ मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचले आहे. निर्माल्य कलशांची झाकणे तुटलेली आहेत त्यामुळे निर्माल्य कलशात टाकलेले निर्माल्य पुन्हा बाहेर पडत आहे. त्यामुळे कलशाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचले आहे. गणपती आणि देवी विसर्जनाच्यावेळी वापरण्यात आलेले लाकडी तराफे तलावातील पाण्यातून बाहेर काढण्यात आलेले नाहीत. निर्माल्य कलाशाजवळ साचलेले निर्माल्य पाहून अनेक नागरिक निर्माल्य तलावातील पाण्यात टाकत आहेत. तलावातील पाण्याचा होणारा गैरवापर आणि निर्माल्य यामुळे तलावातील पाणी दूषित झाले असून या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे तलाव परिसरातील उद्यानात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तलाव परिसरात रात्री मद्यपी मद्यपान करत असून अनेक ठिकाणी मद्याच्या मोकळ्या आणि फुटलेल्या काचेच्या बाटल्यांचे तुकडे पडले आहेत. सुरक्षारक्षक नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. तलाव परिसरात महापालिकेने स्वच्छता ठेवावी, तसेच या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबईchinchole chowkचिंचोले चौक