शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

चिंचोली तलावातील पाण्याला दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 04:52 IST

पाण्याचा कपडे धुण्यासाठी वापर : निर्माल्य उचलण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

नवी मुंबई : शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महापालिकेने निर्माण केलेल्या तलावांच्या देखभालीवर महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे तलावातील पाण्यात कपडे धुणे, अंघोळ करणे यासारखे प्रकार होत असून पाण्याचा गैरवापर केला जात आहे. निर्माल्य कलशांची दुरवस्था झाल्याने निर्माल्य तलावात टाकले जात असून, यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. या पाण्याला दुर्गंधी सुटली असून, त्यामुळे तलाव परिसरात येणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.

नवी मुंबई शहराला उद्यानांचे शहर म्हणून संबोधण्यात येते. शहरात तलावांची निर्मिती करताना, तसेच जुन्या तलावांचा पुनर्विकास करताना तलावांच्याभोवती देखील महापालिकेने हिरवळ, उद्याने, ज्येष्ठ नागरिक केंद्र, ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी आदी सुविधा निर्माण केल्या आहेत; परंतु या परिसराची देखभाल होत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तलावातील पाण्यात कपडे धुणे, अंघोळ करणे यासाठी बंदी घालण्यात आली आहे; परंतु तलावातील पाण्याच्या गैरवापरावर महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने नियमांची पायमल्ली केली जात आहे. शिरवणे येथील चिंचोली तलावात कपडे धुणे, अंघोळ करणे यासारखे प्रकार घडत आहेत. दिवाळीमुळे तलावाजवळील निर्माल्य कलशांजवळ मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचले आहे. निर्माल्य कलशांची झाकणे तुटलेली आहेत त्यामुळे निर्माल्य कलशात टाकलेले निर्माल्य पुन्हा बाहेर पडत आहे. त्यामुळे कलशाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचले आहे. गणपती आणि देवी विसर्जनाच्यावेळी वापरण्यात आलेले लाकडी तराफे तलावातील पाण्यातून बाहेर काढण्यात आलेले नाहीत. निर्माल्य कलाशाजवळ साचलेले निर्माल्य पाहून अनेक नागरिक निर्माल्य तलावातील पाण्यात टाकत आहेत. तलावातील पाण्याचा होणारा गैरवापर आणि निर्माल्य यामुळे तलावातील पाणी दूषित झाले असून या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे तलाव परिसरातील उद्यानात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तलाव परिसरात रात्री मद्यपी मद्यपान करत असून अनेक ठिकाणी मद्याच्या मोकळ्या आणि फुटलेल्या काचेच्या बाटल्यांचे तुकडे पडले आहेत. सुरक्षारक्षक नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. तलाव परिसरात महापालिकेने स्वच्छता ठेवावी, तसेच या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबईchinchole chowkचिंचोले चौक