शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

हॉटेलचे टाकाऊ अन्न रस्त्यावर, स्वच्छ भारत अभियानाला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 03:33 IST

दुर्गंधीने नागरिक त्रस्त : स्वच्छता अभियानाचा फज्जा

नवी मुंबई : हॉटेल्स व कॅटरिंग व्यावसायिकांकडून टाकाऊ अन्न रस्त्यावर अथवा कचराकुंडीच्या भोवती टाकले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत असून, भटक्या कुत्र्यांसह उंदरांनाही त्याठिकाणी आश्रय मिळत आहे; परंतु स्वच्छता अभियानाला खो घालणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

शहरात बहुतांश ठिकाणचे रस्तेच कचरा कुंड्या बनले आहेत. परिसरातील कचरा, कचरा कुंडीत टाकताना कुंडी भरल्यानंतरही तो त्याचठिकाणी टाकला जात आहे. यामुळे कुंड्यांमधील कचरा रस्त्यांवर पसरत आहे. या कचºयात हॉटेल्स व कॅटरिंग व्यावसायिकांकडून टाकल्या जाणाºया टाकाऊ अन्नाचाही समावेश दिसून येत आहे. यामुळे कचरा कुंडीच्या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत पालिकेकडून घरोघरी जनजागृती करण्यात आलेली आहे. मात्र, त्यात हॉटेल्स व्यावसायिकांचा समावेश होत नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा प्रकार आहे. मात्र, त्यांच्याकडून रस्त्यावर अथवा कचरा कुंडीत टाकल्या जाणाºया अन्नामुळे ते खाण्यासाठी त्याठिकाणी भटके कुत्रे, कावळे मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत, तर अशा ठिकाणी घुशी व उंदरांचेही साम्राज्य आढळून येत आहे. परिणामी लगतच्या रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे; परंतु अशा हॉटेल व कॅटरिंग व्यावसायिकांवर पालिका कारवाईत चालढकल करत असल्याचाही आरोप नागरिकांकडून होत आहे. नागरिकांच्या नजरेतून लपवण्यासाठी रात्रीच्या वेळी हे टाकाऊ अन्न त्याठिकाणी टाकले जाते; परंतु दुसºया दिवशी दुपारपर्यंत हा कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यावर पडून राहिलेला कचरा व त्यामधील टाकाऊ अन्न यापासून दुर्गंधी पसरत आहे. घणसोलीत टाकल्या जाणाºया कचºयाने परिसराला बकालपणा आला आहे. त्यामुळे कारवाईची मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस कृष्णा पाटील यांनी केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई