शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलचे टाकाऊ अन्न रस्त्यावर, स्वच्छ भारत अभियानाला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 03:33 IST

दुर्गंधीने नागरिक त्रस्त : स्वच्छता अभियानाचा फज्जा

नवी मुंबई : हॉटेल्स व कॅटरिंग व्यावसायिकांकडून टाकाऊ अन्न रस्त्यावर अथवा कचराकुंडीच्या भोवती टाकले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत असून, भटक्या कुत्र्यांसह उंदरांनाही त्याठिकाणी आश्रय मिळत आहे; परंतु स्वच्छता अभियानाला खो घालणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

शहरात बहुतांश ठिकाणचे रस्तेच कचरा कुंड्या बनले आहेत. परिसरातील कचरा, कचरा कुंडीत टाकताना कुंडी भरल्यानंतरही तो त्याचठिकाणी टाकला जात आहे. यामुळे कुंड्यांमधील कचरा रस्त्यांवर पसरत आहे. या कचºयात हॉटेल्स व कॅटरिंग व्यावसायिकांकडून टाकल्या जाणाºया टाकाऊ अन्नाचाही समावेश दिसून येत आहे. यामुळे कचरा कुंडीच्या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत पालिकेकडून घरोघरी जनजागृती करण्यात आलेली आहे. मात्र, त्यात हॉटेल्स व्यावसायिकांचा समावेश होत नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा प्रकार आहे. मात्र, त्यांच्याकडून रस्त्यावर अथवा कचरा कुंडीत टाकल्या जाणाºया अन्नामुळे ते खाण्यासाठी त्याठिकाणी भटके कुत्रे, कावळे मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत, तर अशा ठिकाणी घुशी व उंदरांचेही साम्राज्य आढळून येत आहे. परिणामी लगतच्या रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे; परंतु अशा हॉटेल व कॅटरिंग व्यावसायिकांवर पालिका कारवाईत चालढकल करत असल्याचाही आरोप नागरिकांकडून होत आहे. नागरिकांच्या नजरेतून लपवण्यासाठी रात्रीच्या वेळी हे टाकाऊ अन्न त्याठिकाणी टाकले जाते; परंतु दुसºया दिवशी दुपारपर्यंत हा कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यावर पडून राहिलेला कचरा व त्यामधील टाकाऊ अन्न यापासून दुर्गंधी पसरत आहे. घणसोलीत टाकल्या जाणाºया कचºयाने परिसराला बकालपणा आला आहे. त्यामुळे कारवाईची मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस कृष्णा पाटील यांनी केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई