शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

प्रभाग समित्या रखडल्या

By admin | Updated: October 29, 2015 23:52 IST

महापालिकेच्या निवडणुका होवून सहा महिने झाल्यानंतरही अद्याप प्रभाग समित्यांची रचना झालेली नाही. आॅगस्टमध्ये घाई गडबडीमध्ये केलेल्या रचनेस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे

नामदेव मोरे, नवी मुंबईमहापालिकेच्या निवडणुका होवून सहा महिने झाल्यानंतरही अद्याप प्रभाग समित्यांची रचना झालेली नाही. आॅगस्टमध्ये घाई गडबडीमध्ये केलेल्या रचनेस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. दोन महिन्यांनंतरही स्थगिती कायम असल्यामुळे प्रभागांमधील विकासकामे ठप्प झाली असून नगरसेवकांनी राज्य शासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिलमध्ये झाल्या आहेत. ९ मे रोजी महापौरांची निवड करण्यात आली. त्यानंतर एक महिन्यामध्ये प्रभाग समित्यांची नियुक्ती होणे आवश्यक होते. यापूर्वीच्या पंचवार्षिकमध्ये सहा प्रभाग समित्या होत्या. यावेळी नगरसेवकांची संख्या १११ असल्यामुळे ८ समित्यांची रचना केली आहे. २० आॅगस्टमध्ये झालेल्या तहकूब सर्वसाधारण सभेमध्ये प्रभाग समित्यांची रचना केली होती. परंतु तहकूब समित्यांमध्ये आयत्या वेळचे विषय आणता येत नसल्याचे सांगत शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला होता. बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेवून थेट आयुक्त दिनेश वाघमारे यांना फोन करून स्थगिती दिली होती. दोन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी अद्याप स्थगिती उठविलेली नाही. यामुळे अद्याप प्रभाग समित्यांची फेररचना होवू शकलेली नाही. महापालिकेने अनावश्यक खर्च कमी केला आहे. मोठे प्रकल्प या वर्षात सुरू केले जाणार नाहीत. यामुळे नगरसेवकांना प्रभाग समिती व नगरसेवक निधीचा आधार होता. निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवारांनी नागरिकांना प्रचंड आश्वासने दिली होती. परंतु प्रभाग समित्यांची रचनाच नसल्यामुळे एकही काम करता आलेले नाही. आयुक्तांच्या अधिकारामध्ये काही ठिकाणी कामे झाली आहेत. परंतु सर्वच प्रभागांमध्ये कामे झालेली नाहीत. प्रत्येक नगरसेवकाला १० लाख व प्रभाग समितीसाठी ४० लाख रुपयांचा निधी असतो. सहा महिन्यांमध्ये यामधील एकही रुपया खर्च केलेला नाही. प्रभागामधील गटारावरील झाकणे बसविणे, पदपथांची किरकोळ दुरुस्ती व इतर अत्यावश्यक कामे या निधीमधून करता येतात. परंतु सर्वच कामे ठप्प झाल्यामुळे नगरसेवकही हतबल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ स्थगिती उठवावी व लवकरात लवकर प्रभाग समित्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक करू लागले आहेत. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रभाग समित्यांच्या रचनेस नगरविकास खात्याने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठली की लगेच समित्यांच्या रचनेचे काम केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.