शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

प्रभाग समित्या रखडल्या

By admin | Updated: October 29, 2015 23:52 IST

महापालिकेच्या निवडणुका होवून सहा महिने झाल्यानंतरही अद्याप प्रभाग समित्यांची रचना झालेली नाही. आॅगस्टमध्ये घाई गडबडीमध्ये केलेल्या रचनेस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे

नामदेव मोरे, नवी मुंबईमहापालिकेच्या निवडणुका होवून सहा महिने झाल्यानंतरही अद्याप प्रभाग समित्यांची रचना झालेली नाही. आॅगस्टमध्ये घाई गडबडीमध्ये केलेल्या रचनेस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. दोन महिन्यांनंतरही स्थगिती कायम असल्यामुळे प्रभागांमधील विकासकामे ठप्प झाली असून नगरसेवकांनी राज्य शासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिलमध्ये झाल्या आहेत. ९ मे रोजी महापौरांची निवड करण्यात आली. त्यानंतर एक महिन्यामध्ये प्रभाग समित्यांची नियुक्ती होणे आवश्यक होते. यापूर्वीच्या पंचवार्षिकमध्ये सहा प्रभाग समित्या होत्या. यावेळी नगरसेवकांची संख्या १११ असल्यामुळे ८ समित्यांची रचना केली आहे. २० आॅगस्टमध्ये झालेल्या तहकूब सर्वसाधारण सभेमध्ये प्रभाग समित्यांची रचना केली होती. परंतु तहकूब समित्यांमध्ये आयत्या वेळचे विषय आणता येत नसल्याचे सांगत शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला होता. बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेवून थेट आयुक्त दिनेश वाघमारे यांना फोन करून स्थगिती दिली होती. दोन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी अद्याप स्थगिती उठविलेली नाही. यामुळे अद्याप प्रभाग समित्यांची फेररचना होवू शकलेली नाही. महापालिकेने अनावश्यक खर्च कमी केला आहे. मोठे प्रकल्प या वर्षात सुरू केले जाणार नाहीत. यामुळे नगरसेवकांना प्रभाग समिती व नगरसेवक निधीचा आधार होता. निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवारांनी नागरिकांना प्रचंड आश्वासने दिली होती. परंतु प्रभाग समित्यांची रचनाच नसल्यामुळे एकही काम करता आलेले नाही. आयुक्तांच्या अधिकारामध्ये काही ठिकाणी कामे झाली आहेत. परंतु सर्वच प्रभागांमध्ये कामे झालेली नाहीत. प्रत्येक नगरसेवकाला १० लाख व प्रभाग समितीसाठी ४० लाख रुपयांचा निधी असतो. सहा महिन्यांमध्ये यामधील एकही रुपया खर्च केलेला नाही. प्रभागामधील गटारावरील झाकणे बसविणे, पदपथांची किरकोळ दुरुस्ती व इतर अत्यावश्यक कामे या निधीमधून करता येतात. परंतु सर्वच कामे ठप्प झाल्यामुळे नगरसेवकही हतबल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ स्थगिती उठवावी व लवकरात लवकर प्रभाग समित्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक करू लागले आहेत. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रभाग समित्यांच्या रचनेस नगरविकास खात्याने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठली की लगेच समित्यांच्या रचनेचे काम केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.