शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील आदिवासीवाडी विजेच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 28, 2016 03:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवित आहे. त्यासाठी शहराबरोबरच ग्रामीण भागातील शाळा स्मार्ट करण्यात येत आहे. मात्र मुंबईपासून ४०-५० किमीवर

पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवित आहे. त्यासाठी शहराबरोबरच ग्रामीण भागातील शाळा स्मार्ट करण्यात येत आहे. मात्र मुंबईपासून ४०-५० किमीवर असलेल्या पनवेल तालुक्यातील खानाचा बंगला (निताळ - वावंजे) आदिवासी वाडी अद्याप अंधारमय आहे. पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योजिक वसाहतीत कल्याण तालुक्याच्या सरहद्दीजवळ वावंजे गाव आहे. या गावापासून एक - दीड किमी अंतरावर खानाचा बंगला (निताळे - वावंजे) आदिवासी वाडी आहे. वाडीत ४५-५० घरे आहेत. येथील आदिवासी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. गावात २००१ मध्ये मुलांसाठी वस्ती शाळा सुरू झाली. यावेळी १४-१५ मुले शाळेत येत होती. शाळा कधी मंदिरात, तर कधी झाडाखाली भरत होती. शिक्षिका रेखा पाटील स्वत: घरोघरी जाऊन मुलांना शाळेत घेऊन यायच्या. आदिवासी मुलांना शाळेची आवड लावण्याचे काम त्यांनी केले. आज शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग असून ४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दोन महिन्यापूर्वी संजय कदम यांची येथे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली. आदिवासी मुलांना संगणकीय शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी ई-लर्निंगसाठी प्रयत्न सुरू केले. त्याच्या पाठपुराव्यामुळे एक कंपनी शाळेला संगणक व प्रोजेक्टर द्यायला तयारही झाली. मात्र शाळेतच काय आदिवासी वाडीतही अद्याप वीज न पोहोचल्याने मुलांना स्मार्ट शिक्षण कसे द्यावे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. (वार्ताहर) खानाचा बंगला आदिवासी वाडीसाठी वीज पुरवठा योजना मंजूर झाली होती. मात्र अनुदान न मिळाल्याने योजना पूर्ण होऊ शकली नाही. आता दीनदयाळ उपाध्याय योजनेस मंजुरी मिळाली आहे. एजन्सीची नेमणूक झाल्यावर दोन महिन्यात या वाडीवर वीज पुरवठा होईल.-डी.बी. गोसावी, कार्यकारी अभियंता, वीज मंडळ आदिवासी मुलांना माहिती-तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, त्यांच्यात डिजिटल शिक्षणाबाबत आवड निर्माण व्हावी, यासाठी परिसरातील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संगणक, प्रोजेक्टर देण्याची तयारी दर्शवली. मात्र आदिवासीवाडीत अद्याप वीजच न आल्याने डिजिटल शिक्षण हे केवळ दिवास्वप्न राहिले आहे.- संजय निकम, मुख्याध्यापकखानाचा बंगला आदिवासीवाडीचा १९८४ पर्यंत ग्रामपंचायतीत समावेश नव्हता. कालांतराने निताळ ग्रामपंचायतीकडून घरपट्टी वसूल करण्यात येऊ लागली. ३० वर्षे पाठपुरावा केल्यावर २०१५ मध्ये पहिल्यांदा आदिवासी वाडीतील लोकांनी ग्रामपंचायतीसाठी मतदान केले. वीजेसाठी प्रयत्न सुरू आहेत. -जानू कातकरी, सामाजिक कार्यकर्ते