शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बिल्डरविरोधात शेकापसह ग्रामस्थांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 02:48 IST

आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज : आजी-माजी आमदारांसह ग्रामस्थांना अटक ; लढा सुरूच ठेवण्याचा इशारा

पनवेल : शेतकरी कामगार पक्षासह मोठा खांदा ग्रामस्थांनी श्री गणेश इंटरप्रायझेस या बिल्डरविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. आजी-माजी आमदारांसह हजारो आंदोलकांनी पाच तास रोडवर ठिय्या मांडला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करून, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह तब्बल ४१ जणांना अटक केली. पोलिसांच्या भूमिकेमुळे नागरिकांनी परिसरात बंद पाळला होता. सायंकाळी आंदोलकांना पोलिसांनी सोडले असून, बिल्डरविरोधात लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार शेकापने व्यक्त केला आहे.मोठा खांदा गावातील गावकीचे भूखंड विकसित करण्यासाठी श्री गणेश इंटरप्रायझेसला देण्यात आले होते. विकसित करण्यासाठीचा मोबदला म्हणून ५० लाख गावकीला देणे बाकी आहे. मात्र, वारंवार बैठका, निवेदन, आंदोलन करूनदेखील गावकीचे पैसे देण्यास नकार देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. निम्मी रक्कम देतो, असे सांगूनही बिल्डरकडून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बुधवार, २३ मेला सकाळी ११ वाजता श्री गणेश इंटरप्रायझेसच्या कार्यालसमोर मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी तो मोर्चा कार्यालयाच्या बाजूला अडवला. त्यामुळे नागरिकांना पाच तास बसावे लागले. आंदोलनात आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शहर चिटणीस गणेश कडू, तालुका चिटणीस एकनाथ भोपी, नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, सारिका भगत, विजय भगत, शशिकांत शेळके, जयंत भगत आदी सहभागी झाले होते. वारंवार समन्वयाची भूमिका घेऊनसुद्धा येथील ग्रामस्थांना अन्याय सहन करावा लागत होता. या वेळी, ‘आमचा गाव, आमचा हक्क’, ‘जमीन आमच्या हक्काची’ अशा घोषणा देत महिला आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. रणरणत्या उन्हामध्ये ग्रामस्थांचे आंदोलन रस्त्यावर बसून सुरूच होते. ग्रामस्थांच्या रोजगारावर गदा येणार असेल तर आम्हीही उरावर बसून हक्क मिळवण्यास तयार आहोत, अशी घोषणाबाजी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. नागरिकांनी या आंदोलनात गणेश इंटरप्रायझेस विरोधात घोषणाबाजी दिल्या. या आंदोलनाला मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ काम बंद करण्यासाठी तगादा लावून उन्हात बसले होते. दरम्यान, ग्रामस्थांमधील एका महिलेला चक्कर आली, या महिलेला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.दुपारी ३.३०च्या सुमारास आंदोलन संपवून टाका, असे पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना सांगण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यास न जुमानता आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील यांना ताब्यात घेते वेळी काहींनी दगडफेक केली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याने आंदोलकांवर पोलिसांना लाठीचार्ज केला. यात काही आंदोलनकर्ते जखमी झाले, त्यामुळे वातावरण आणखी चिघळले. पोलिसांनी आजी-माजी आमदारांसह शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलकांवर बेकायदेशीर जमावबंदी, तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांची जमीनावर सुटका करण्यात आली. पोलिसांनी ग्रामस्थांना सहकार्य केले नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.मार्ग न निघाल्यास पुन्हा लढाशेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाविषयी भूमिका मांडताना सांगितले की, प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनीचा त्याग केला आहे. या परिसरात विकास होत असताना गावांचा व परिसराचा विकास व्हावा. बांधकाम करताना कामे स्थानिकांना मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. बिल्डरने गावकीच्या विकासासाठी सहकार्य केले नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे. ग्रामस्थांच्या हक्कासाठी लढा उभारला आहे. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचेही स्पष्ट केले.कामोठे बंदखांदा गावातील आंदोलन चिघळल्यानंतर आजी-माजी आमदारांना कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे शेकाप कार्यकर्त्यांनी पोलिसांवर रोष व्यक्त करत कामोठे वसाहतीतील दुकाने बंद केली. त्यामुळे कामोठे वसाहतीत थोड्या फार प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने पोलीस स्टेशनला यात्रेचे स्वरूप आले होते.

टॅग्स :Homeघर