शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

विकास आला हो नैनाच्या अंगणी, सात टप्प्यांत १२०० कोटींची विकासकामे : रस्त्यांसह मलवाहिन्यांचा समावेश

By नारायण जाधव | Updated: April 18, 2023 19:13 IST

सिडकोच्या ‘नैना’कडे तिसरी मुंबई म्हणून पाहिले जाते आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आपल्या बहुचर्चित नैना क्षेत्रात सिडकोने आता १२०० कोटींहून अधिक किमतीचे रस्ते आणि मलवाहिन्यांची कामे हाती घेतली आहे. गेल्या आठवड्यात स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध डावलून राज्याच्या नगरविकास विभागाने नैनाला गती देण्यासाठी २२ महसूल अधिकारी, कर्मचारी यांची फौज तैनात दिली आहे. यामुळे हुरूप वाढलेल्या सिडकोने आता येथील रस्ते आणि मलवाहिन्यांची १२०० कोटींहून अधिक खर्चाची कामे काढली आहेत.

सिडकोच्या ‘नैना’कडे तिसरी मुंबई म्हणून पाहिले जाते आहे. त्यासाठी शासनाने रायगड जिल्ह्यातील २५६ व ठाणे जिल्ह्यातील १४ अशा २७० गावांचे सुमारे ४६४ किमी क्षेत्र हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अर्थात ‘नैना’ क्षेत्र म्हणून अधिसूचित केले आहे. मात्र, स्थापनेपासून नैनात एक वीटही रचली गेलेली नाही. कारण, सिडकोने शेतकऱ्यांकडून जी जमीन घेणार आहे, त्यापैकी ६० टक्के जमीन स्वत:कडे ठेवून उर्वरित ४० टक्के विकसित भूखंड शेतकऱ्यांना देणार आहे. सिडकोच्या या धोरणास विरोध करून नैनातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. मात्र, असे असतानाही नगरविकास विभागाने नैनाला गती देण्यासाठी गेल्या आठवड्यात सिडकोच्या मागणीनुसार २२ महसूल अधिकारी, कर्मचारी यांची फौज तैनात केली.

मात्र, या भागात पायाभूत सुविधांची बोंब असल्याने विकासकांकडून सिडकोवर टीका होत होती. रस्ते, गटारे, मलवाहिन्याच नसतील शहर कसे विकसित करणार? असा सवाल त्यांच्याकडून करण्यात येत होता. मात्र, शासनाने २२ अधिकारी देऊन हुरूप वाढलेल्या सिडकोने आता विकासकांच्या मागणीनुसार नैनातील रस्ते आणि मलवाहिन्यांची कामे पूर्ण करण्याभर दिला आहे. त्यानुसार सात टप्प्यांत ही १,२०० कोटींहून अधिकची कामे करण्यात येणार आहेत.

टीपीएसनुसार अशी आहेत कामेटीपीएस २-१०६ काेटी २८ लाख ५६ हजार ७४५ रुपयेटीपीएस ३-३३४ कोटी २५ लाख ४८ हजार ९४० रुपयेटीपीएस ४-२८८ कोटी ५४ लाख २६ हजार १२० रुपयेटीपीएस ५-१७५ कोटी ५१ लाख ९९ हजार १६९ रुपयेटीपीएस-६-१८१ कोटी २४ लाख ६२ हजार ९९६ रुपयेटीपीएस ७-१३३ कोटी ६७ लाख एक हजार ४२७ रुपयेइच्छुक कंत्राटदारांनी की कामे करण्यासाठी ८ मे २०२३ पर्यंत भरायच्या असून, त्यानंतर सर्वप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र निविदाकारास कार्यादेश दिल्यानंतर त्याने पावसाळ्यासहीत ३० महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याचे बंधन त्याच्यावर राहणार आहे.