शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

पनवेलमध्ये विकासाच्या नावाखाली घेतला जातोय झाडांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 02:01 IST

नवी मुंबईनंतर आता पनवेल परिसरामध्येही दुकानांच्या समोरील वृक्षांवर विषप्रयोग करण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.

- अरुणकुमार मेहेत्रेकळंबोली - नवी मुंबईनंतर आता पनवेल परिसरामध्येही दुकानांच्या समोरील वृक्षांवर विषप्रयोग करण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. नेरे-माथेरान रोडवरील अनेक झाडे विषप्रयोगाने मारली गेली आहेत. त्याचबरोबर कळंबोलीत सुद्धा हा प्रकार समोर आला आहे. शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी करोडो रु पये खर्च करत असले तरी पनवेल परिसरात झाडे अशा प्रकारे मारली जात आहेत. याबाबत महापालिका व सिडकोकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.नवीन पनवेल येथील एचडीएफसी ते आदई सर्कल या दरम्यान सिडकोने सुरु वातीला झाडे लावून वनराई केली. या रोडवर बँका, शोरु म, बांधकाम व्यावसायीकांची कार्यालये असल्याने वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागरिक व वाहनांची सातत्याने वर्दळ असते. उन्हाळ्यात हीच झाडे सावली देण्याचे काम करत असत. अचानक येथील झाडे सुकू लागली. झाडांची पानगळ झाली. अशी शेकडो झाडे मरणावस्थेत आहेत. या झाडांवर विषप्रयोग होत असल्याने ती मृत अवस्थेत आहेत. सद्यस्थितीत मोठमोठी दुकाने, शोरु म, जाहिरात फलक दिसत नाहीत म्हणून हिरवळ असलेल्या झाडांची विष देवून कत्तल केली जाते. कळंबोलीतील होर्डिंग उभारण्यासाठी झाडांना विष देवून मारण्यात आले.याबाबत पनवेल परिसरातील सामाजिक संस्थांनी आवाज उठवत चौकशीची मागणी केली. याबाबत पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत आवाज उठवला. मात्र रविवारी होर्डिंगवर जाहिरातीचा फलक लावण्यात आला. यामुळे सभागृह नेते, स्थायी समितीचे माजी सभापती व भाजपचे कळंबोली शहरउपाध्यक्ष तोंडघशी पडले. मनसेनेसुद्धा निवेदन दिले, सह्यांची मोहीम घेतली. मात्र जाहिरातीचा फलक उभा राहिला आहे.पर्यावरणाच्या संतुलनावरही परिणामविकासासाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा परिणाम पर्यावरणावरही होऊ लागला आहे. अशीच स्थिती राहिली तर नवी मुंबई, पनवेल परिसरातील प्रदूषण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महामार्ग रुंदीकरण, उड्डाणपूल, रस्ते सिमेंटीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. यासाठीही मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली आहेत.या बदल्यात तिप्पट झाडे लावणे बंधनकारक असताना, अद्याप एकही झाड लावण्यात आले नाही. या संदर्भात वनविभाग अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता हे आमच्या अखत्यारीत येत नाही. महापालिका व सिडकोनेच दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळाली नाही.झाडांवर असा विषप्रयोग केला जातोझाडांची साल काढली जाते. तसेच काही झाडांच्या खोडावर खिळे ठोकून दोन तीन इंच छिद्रे करण्यात येते. त्यात इंजेक्शनद्वारे मारक रसायन आत सोडले जाते. यात सल्फ्युरीक व हायड्रोक्लोरीक अ‍ॅसिडचाही वापर केला जातो. त्यामुळे हळूहळू झाडे मृत अवस्थेत जातात. झाडांची पानगळ होते.महापालिका व सिडकोची अनास्थाइतक्या मोठ्या प्रमाणात रसायनाचा वापर करून झाडे मारली जातात. पण याच्या मुळाशी जावून सिडको आणि महापालिका शोध घेत नाही. संबंधितांवर गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. यासाठी कोणी पुढे येत नसल्याची खंत अ‍ॅड. श्रीनिवास क्षीरसागर यांनी व्यक्त केली.नवी मुंबईमध्येही घडल्या होत्या घटनायापूर्वी नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्येही हा विषय चर्चेत आला होता. वाशी सेक्टर १७, वाशी रेल्वे स्टेशनसमोरील व्यावसायिक इमारतींचा परिसर, सानपाडामधील एक शाळा व इतर दुकानांच्या समोरील वृक्ष अचानक सुकले होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई