शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

मुंबईत कांद्यासह भाजीपाला महागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 05:50 IST

मुंबईमध्ये कांद्यासह भाजीपाल्याचे दरही वाढू लागले आहेत. एपीएमसीमध्ये कांदा ४२ ते ४७ रुपये किलो दराने विकला जात आहे...

नवी मुंबई : मुंबईमध्ये कांद्यासह भाजीपाल्याचे दरही वाढू लागले आहेत. एपीएमसीमध्ये कांदा ४२ ते ४७ रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये हे दर ६० रुपयांवर गेले आहेत. हिरवा वाटाणा तब्बल १६० रुपये किलो दराने विकला जात असून लसूणची किंमतही १८० ते २०० रुपयांवर गेली आहे.राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईमधील भाजीपाल्याच्या आवकवर झाला आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे बाजारभाव वाढत आहेत. शुक्रवारी बाजार समितीमध्ये १४०० टन कांदा व २०८ टन लसूणची आवक झाली. या दोनही वस्तूंचे दर प्रतिदिन वाढत चालले आहेत. होलसेल मार्केटमध्ये कांदा ४२ ते ४७ रुपये किलो दराने विकला जात आहे. किरकोळ मार्केटमध्ये हे दर ६० रुपयांवर गेले आहेत. काही ठिकाणी यापेक्षाही जास्त दराने कांदा विकला जात आहे. मुंबईमध्ये पुणे व नाशिकमधून आवक होत आहे. पुढील काही दिवसांमध्ये कांदा शंभरी गाठेल, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. शासनाने वेळेत उपाययोजना करावी व मार्केटमध्ये मागणी व पुरवठा यामधील तफावत दूर करावी, अशी मागणी ग्राहकही करू लागले आहेत.भाजीपाल्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. गत आठवड्यामध्ये १५ ते ३६ रुपये किलो दराने विकली जाणारी भेंडी २६ ते ४० रुपयांवर गेली आहे. फरसबी ३० ते ५० वरून ४५ ते ६५ रुपये, वाटाणा ६५ ते ७५ रुपयांवरून ८० ते १०० रुपये झाला आहे. टोमॅटो सोडल्यास इतर सर्व भाज्यांचे दर वाढत आहेत.

टॅग्स :onionकांदा