शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

नाल्याशेजारी भाजीपाला, फळांची होतेय विक्री, कारवाईनंतरही परिस्थिती जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:51 AM

नवी मुंबई : बेलापूरमधील कोकण भवन इमारतीच्या शेजारी असलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीखाली असलेल्या मोकळ्या भूखंडावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे.

नवी मुंबई : बेलापूरमधील कोकण भवन इमारतीच्या शेजारी असलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीखाली असलेल्या मोकळ्या भूखंडावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी असलेला नाला आणि भूखंडाशेजारी डम्पिंग केले जात असल्याने हा परिसर दुर्गंधीयुक्त झाला आहे. अशा अस्वच्छ ठिकाणी दररोज भाजीपाला, तसेच फळांची विक्री केली जाते. या ठिकाणी असलेल्या वाहनतळाच्या जागेवरही फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचे चित्र पाहायला मिळते.कोकणभवन, सिडको तसेच बेलापूर रेल्वेस्थानक परिसरात दिवसाला शेकडो नागरिक ये-जा करत असतात. नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या कोकण भवन परिसरात परगावाहून कामानिमित्त येणाºया नागरिकांनाही या फेरीवाल्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सकाळी कार्यालयीन वेळेत या परिसरातून मार्ग काढणे मुश्कील असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. उघड्या नाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नाकाला रुमाल लावून मार्ग काढण्याशिवाय पर्याय उरत नसल्याची प्रतिक्रिया कर्मचारी मालती पांचाळ यांनी व्यक्त केली. संध्याकाळच्या वेळी या परिसरात मासळी विक्रेत्यांकडून जागेची अडवणूक केली जाते. अतिक्रमणावर ठोस कारवाई होत नसल्याने निर्भयपणे जागेचा वापर केल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक विक्रेत्यांनी या ठिकाणी उघड्यावर हॉटेल थाटले असून, पार्किंगच्या जागेवर खुर्च्या आणि टेबल मांडले आहेत. परिसरात माशांचे प्रमाण वाढले असून, विक्रेते या ठिकाणीच कचरा टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. त्यामुळे रोगराईला आमंत्रण दिले जात असून, नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे या परिसरातील समस्यांची वाढ होत आहे. भाजी, फळविक्रेत्यांवर पालिकेची ठोस कारवाई होत नसल्याने फेरीवाले सर्रासपणे या ठिकाणी बस्तान मांडत असल्याचा प्रकार पाहायला मिळतो. सर्वसामान्य नागरिक, तसेच प्रवाशांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचे सत्र सुरू असताना, या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांना अभय का दिले जात आहे? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. कामानिमित्त येणाºया नागरिकांना या ठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसून, या पार्किंगच्या जागेवरही फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे.ठोस कारवाई न केल्याने दुसºया दिवशी पुन्हा या ठिकाणी व्यवसाय करण्याचे धाडस या फेरीवाल्यांमध्ये पाहायला मिळते. पुन्हा तीच परिस्थिती उद्भवत असून, पदपथावरील जागेवरही या फेरीवाल्यांनी जागा अडविली आहे.ऐन कार्यालयीन वेळेतही या ठिकाणी पदपथावर असलेल्या विक्रेत्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी.