शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

वाशी भाजीपाला मार्केटला छत्रपती संभाजीराजांचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 20:45 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देणे अत्यंत गरजेचे आहे.

नवी मुंबई: वाशी येथील भाजीपाला बाजार संकुलाला  'धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल' नाव देण्याचा नामकरण सोहळा सोमवारी पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटले की, धर्मवीर संभाजी राजेंच्या जन्मदिनी भाजीपाला मार्केटचे नाव धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल असे करण्याचा निर्णय तब्बल 20 वर्षांनंतर आमच्या सरकारने  घेऊन धर्मवीर संभाजी राजेंना मानाचा मुजरा केला असे म्हणने वावगे ठरणार नाही.  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा आत्मा असून आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. या बाजार समितीमध्ये आपण सर्वांनी विशेष लक्ष देऊन शेतमाल निर्यातीला चालना देण्याची गरज आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या येणाऱ्या शेतमालाची साठवणूक करण्यासाठी गोदाम व शीतगृहाची सुविधा बाजार समितीने उपलब्ध करून द्यावे. तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल जगाच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बाजार समितीला बजवावी लागणार आहे. स्पर्धात्मक युगात शेतकरी टिकणे अतिशय महत्त्वाचे असून त्याकरीता बाजार समित्यांची भूमिका दिशादर्शक ठरणार आहे. शेतकरी शेतात काबाडकष्ट करतो आणि त्याच्यावरच हजारो लोकांची पोटं चालतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देणे अत्यंत गरजेचे आहे. गेली कित्येक वर्षे या भाजीपाला बाजार संकुलाचा नामकरण सोहळा मागच्या सरकारने प्रलंबित ठेवला होता. परंतु, या सरकारने त्यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे या बाजार संकुलाला धर्मवीर सभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल  हे नाव देण्यात आल्याचे खोत यांनी सांगितले. 

टॅग्स :vegetableभाज्याNavi Mumbaiनवी मुंबई