शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नवी मुंबईतील ‘ताे’ भूखंड क्रीडा संकुलासाठीच वापरा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 12:18 IST

Navi Mumbai News: नवी मुंबईतील घणसोली येथे क्रीडा संकुलासाठी असलेली जमीन खासगी बांधकाम व्यावसायिकांना देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान देणारी सिडकोची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.

 नवी दिल्ली - नवी मुंबईतील घणसोली येथे क्रीडा संकुलासाठी असलेली जमीन खासगी बांधकाम व्यावसायिकांना देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान देणारी सिडकोची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.

सिडको ही महाराष्ट्र सरकारच्या अख्यत्यारीतील संस्था आहे. नवी मुंबईसारख्या शहरी भागात हिरवा पट्टा जपण्यास सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने महत्त्व दिले आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये मुलांना खेळण्यासाठी उद्यानांची, मैदानांची गरज आहे अशी टिप्पणी चंद्रचूड यांनी केली. ते म्हणाले की, जी हरित क्षेत्र शिल्लक आहेत ती आपण नीट राखली पाहिजेत. मॉल्स आणि निवासी संकुले बांधण्यासाठी बिल्डरना हरित क्षेत्र देण्यात आले होते. नवी मुंबईतील मुलांना शाळांमधून परतल्यानंतर खेळण्यासाठी शेजारच्या रायगड जिल्ह्यात अनेक किलोमीटर प्रवास करून जाण्याची वेळ येऊ नये याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही चंद्रचूड म्हणाले.

नवी मुंबईतील क्रीडा संकुलासाठी राखीव असलेला हा प्रकल्प या ठिकाणापासून ११५ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मुंबई, नवी मुंबईमध्ये जी काही हरित क्षेत्र उरलेली आहेत, त्यांचे संरक्षण केले पाहिजे, असे याआधी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. नवी मुंबईतील जागा क्रीडा संकुलासाठी राखीव असल्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्या जागेचा काही भाग निवासी व व्यावसायिक कारणासाठी खासगी विकासकाला दिला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाने विरोध केला.

‘२० एकरचा भूखंड क्रीडा संकुलासाठी पुरेसा नाही’घणसोली येथे क्रीडा संकुलासाठी असलेली जमीन खासगी बांधकाम व्यावसायिकाला देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने जुलै महिन्यात रद्दबातल ठरविला होता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् या संस्थेच्या नवी मुंबई सेंटरने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला सिडकोने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तिथे सिडकोच्या वतीने साॅलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, घणसोली येथील २० एकरांचा भूखंड हा क्रीडा संकुल बांधण्यासाठी पुरेसा नाही. त्यामुळे क्रीडा संकुलासाठी राज्य सरकारने अन्यत्र पर्यायी जागा देऊ केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcidcoसिडको