शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

सवलती दिल्या, घरांचे दर कमी कधी होणार?

By नारायण जाधव | Updated: December 23, 2024 08:55 IST

सध्या 'एमएमआरडीए' क्षेत्रात घरांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे जमिनींचे भाव वधारले आहेत.

नगरविकास विभागाने सप्टेंबर २०२४ मध्ये आपल्या एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावलीत बदल करून बिल्डरांना एकात्मिक नगर वसाहतींसाठी अर्थात टाऊनशिपसाठी चटई क्षेत्र मोकळे केले आहे. याचा सर्वांत मोठा फायदा नवी मुंबई, उरण- पनवेल, शीळ-महापे परिसरातील १४ गावे आणि ठाणे-भिवंडीच्या वेशीवरील टाऊनशिपना होणार आहे.

सध्या 'एमएमआरडीए' क्षेत्रात घरांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे जमिनींचे भाव वधारले आहेत. लोकांना परवडणारी घरे मिळावीत म्हणून सुरुवातीला रेंटल हाऊसिंग त्यानंतर विशेष नगर वसाहत आणि आता एकात्मिक नगर वसाहतीचे धोरण सरकार राबवीत आहे. त्यामध्ये विकासकाला अनेक माध्यमांतून चटई क्षेत्र देण्यात येत आहे. सरकारने सुरुवातीला आणलेल्या विशेष नगर वसाहत योजनेत अवघे १ चटई क्षेत्र देण्याची तरतूद होती. ती परवडत नाही, या सबबीखाली बिल्डरांनी राज्यकर्त्यांकडून वर्ष २०१६ मध्ये एकात्मिक नगर वसाहत योजना मंजूर करून घेतली. ती मंजूर करताना अल्पदरात सर्वसामान्यांना घरे मिळतील, असे सांगितले असले तरी घरांची किंमत ही आभाळाला भिडणारी असल्याचे सांगून आचारसंहिता लागू होण्याआधी बिल्डरांना परवडणारी ही नवी योजना अंमलात आणल्याची चर्चा आहे. यात मिळणारा लाभ बघून पुन्हा एकदा अतिरिक्त चटई क्षेत्र देण्याचे धोरण महायुती सरकारने मंजूर केले आहे. यामध्ये १० टक्के द्या आणि १०० टक्के एफएसआय अर्थात चटई क्षेत्र घ्या, अशी तरतूद आहे. यापूर्वी फक्त ५०० हेक्टर क्षेत्र असलेल्या विकास योजनांना हा लाभ मिळणार होता; परंतु सरसकट सर्वच विकास योजनांना तो मिळणार आहे. बिल्डरांना आता रेडिरेकनरच्या १० टक्के दरात १०० टक्के अतिरिक्त एफएसआय मिळेल. शिवाय स्टॅम्प ड्युटीत ५० टक्के आणि विकास दरात प्रत्येकी ५० टक्के सूट मिळणार असल्याने त्यांचे चांगभलं झाले आहे.

पायाभूत सुविधांवर येणार ताण 

वाढीव चटई क्षेत्राच्या खिरापतीमुळे त्या-त्या ठिकाणच्या पायाभूत सुविधांवर ताण पडणार आहे. 

आताच नवी मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, पनवेल, उरणसह भिवंडीत वॉटर, मीटर, गटार, रस्ते, वाहतूक या पायाभूत सुविधांची बोंब आहे. 

त्यातच सर्वच शहरात एसआरए आणि पुनर्विकासाचे भूत मानगुटीवर बसले आहे. 

यामुळे पायाभूत सुविधांवर ताण आण आणखी वाढणार आहे; परंतु त्याचे सोयरसुतक कोणालाही नाही 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार