शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

सवलती दिल्या, घरांचे दर कमी कधी होणार?

By नारायण जाधव | Updated: December 23, 2024 08:55 IST

सध्या 'एमएमआरडीए' क्षेत्रात घरांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे जमिनींचे भाव वधारले आहेत.

नगरविकास विभागाने सप्टेंबर २०२४ मध्ये आपल्या एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावलीत बदल करून बिल्डरांना एकात्मिक नगर वसाहतींसाठी अर्थात टाऊनशिपसाठी चटई क्षेत्र मोकळे केले आहे. याचा सर्वांत मोठा फायदा नवी मुंबई, उरण- पनवेल, शीळ-महापे परिसरातील १४ गावे आणि ठाणे-भिवंडीच्या वेशीवरील टाऊनशिपना होणार आहे.

सध्या 'एमएमआरडीए' क्षेत्रात घरांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे जमिनींचे भाव वधारले आहेत. लोकांना परवडणारी घरे मिळावीत म्हणून सुरुवातीला रेंटल हाऊसिंग त्यानंतर विशेष नगर वसाहत आणि आता एकात्मिक नगर वसाहतीचे धोरण सरकार राबवीत आहे. त्यामध्ये विकासकाला अनेक माध्यमांतून चटई क्षेत्र देण्यात येत आहे. सरकारने सुरुवातीला आणलेल्या विशेष नगर वसाहत योजनेत अवघे १ चटई क्षेत्र देण्याची तरतूद होती. ती परवडत नाही, या सबबीखाली बिल्डरांनी राज्यकर्त्यांकडून वर्ष २०१६ मध्ये एकात्मिक नगर वसाहत योजना मंजूर करून घेतली. ती मंजूर करताना अल्पदरात सर्वसामान्यांना घरे मिळतील, असे सांगितले असले तरी घरांची किंमत ही आभाळाला भिडणारी असल्याचे सांगून आचारसंहिता लागू होण्याआधी बिल्डरांना परवडणारी ही नवी योजना अंमलात आणल्याची चर्चा आहे. यात मिळणारा लाभ बघून पुन्हा एकदा अतिरिक्त चटई क्षेत्र देण्याचे धोरण महायुती सरकारने मंजूर केले आहे. यामध्ये १० टक्के द्या आणि १०० टक्के एफएसआय अर्थात चटई क्षेत्र घ्या, अशी तरतूद आहे. यापूर्वी फक्त ५०० हेक्टर क्षेत्र असलेल्या विकास योजनांना हा लाभ मिळणार होता; परंतु सरसकट सर्वच विकास योजनांना तो मिळणार आहे. बिल्डरांना आता रेडिरेकनरच्या १० टक्के दरात १०० टक्के अतिरिक्त एफएसआय मिळेल. शिवाय स्टॅम्प ड्युटीत ५० टक्के आणि विकास दरात प्रत्येकी ५० टक्के सूट मिळणार असल्याने त्यांचे चांगभलं झाले आहे.

पायाभूत सुविधांवर येणार ताण 

वाढीव चटई क्षेत्राच्या खिरापतीमुळे त्या-त्या ठिकाणच्या पायाभूत सुविधांवर ताण पडणार आहे. 

आताच नवी मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, पनवेल, उरणसह भिवंडीत वॉटर, मीटर, गटार, रस्ते, वाहतूक या पायाभूत सुविधांची बोंब आहे. 

त्यातच सर्वच शहरात एसआरए आणि पुनर्विकासाचे भूत मानगुटीवर बसले आहे. 

यामुळे पायाभूत सुविधांवर ताण आण आणखी वाढणार आहे; परंतु त्याचे सोयरसुतक कोणालाही नाही 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार