शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

विद्यापीठाचे उपकेंद्र १ आॅगस्टपासून सुरू

By admin | Updated: June 14, 2014 23:50 IST

मुंबई विद्यापीठाचे ठाणे उपकेंद्र येत्या १ आॅगस्टपासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी दिली.

गोकुळ भवरे, किनवटबंजारा आणि आदिवासी मतदारांचे प्राबल्य असलेल्या किनवट विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय विरोधक कोणती रणनीती आखतात, याकडेच सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह नसला तरीही पक्षाच्या उमेदवाराला भाजप-शिवसेना, इतर पक्षातील विरोधक एक होणार नाहीत यासाठी आ. प्रदीप नाईक यांना नवे डावपेच खेळावे लागतील, असे सध्याचे चित्र आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत किनवट विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या उमेदवाराला निर्णायक मताधिक्य मिळाले आहे. विधानसभेला आमदार नाईकांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणला मैदानात उतरवतील, असे वाटत नाही. आ. नाईक विजयाच्या हॅट्ट्रीकवर आहेत.या मतदारसंघाच्या इतिहासात एकाही उमेदवाराने हॅट्ट्रीक साधली नाही. कै. उत्तमराव राठोड, कै. किशनराव पाचपुते व डी. बी. पाटील यांनी प्रत्येकी दोनवेळा प्रतिनिधित्व केले. या रांगेत आता प्रदीप नाईक यांचे नाव लागले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार, आदिवासी नेते भीमराव केराम यांनी भाजपाच्या तिकिटावर प्रदीप नाईक यांना तुल्यबळ लढत दिली होती. परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आ. नाईक यांच्यासमवेत केराम अग्रेसर होते. या मतदारसंघात बंजारा विरुद्ध आदिवासी अशी नेहमीच लढत होत आली आहे. त्यात दलित, मुस्लिम मते निर्णायक भूमिका बजावतात. दलित, मुस्लिमांची मते मिळविणारा हमखास यशस्वी होतो, असा इतिहास आहे. बंजारा समाजाचे प्रदीप नाईक व आदिवासी नेते भीमराव केराम सध्यातरी एकत्र असल्याने आगामी काळात राजकीय पटलावर काय व कशी उलथापालथ होईल, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षाला गत पाच वर्षांत डोळ्यात भरेल असे आंदोलन छेडण्यात यश आले नाही. भाजपाकडे उमेदवार कोण असावा, याचीच चर्चा आहे. धरमसिंग राठोड, नगरसेवक दिनकर चाडावार, संघटनमंत्री सुधाकर भोयर, शिवसेनेकडून डॉ. बी. डी. चव्हाण, ज्योतिबा खराटे हे इच्छुक आहेत. अपक्ष किंवा इतर पक्षाकडून तिकीट मिळवून माजी नगराध्यक्ष इसा खान, प्रफुल्ल राठोड, असद खान किनवटकर, मनसेकडून धनलाल पवार, माकपकडून कॉ. अर्जुन आडे, भाकपकडून गंगारेड्डी बैनमवाड आदींची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. विरोधकांची खेळी काय असेल, यावरच बरेच काही अवलंबून आहे. राष्ट्रवादीशी लढण्यासाठी खरोखरच सर्वच विरोधी पक्षांनी एका बाकावर बसून सर्व शक्तिनिशी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यास त्याला विजयाच्या निर्धाराचीही धार असावी लागणार आहे. नुसता निर्णय घेणेही धोक्याची घंटा वाजवेल, अशी चर्चा राजकीय जाणकारांतून व्यक्त होत आहे. भाजपा भीमराव केराम  ५१४८३भाकप कॉ. अर्जुन आडे  १२६०० राष्ट्रवादी काँग्रेस प्रदीप नाइक  ६९६४५इच्छुकांचे नाव पक्षप्रदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस धरमसिंग राठोड  भाजपाज्योतिबा खराटे  शिवसेनाबी. डी. चव्हाण  शिवसेनालोकसभा निवडणुकीत राजीव सातव (कॉंग्रेस) यांना २०३२ एवढे मताधिक्य