शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

"छोटा रिचार्ज येवून गेल्याचं समजलं"; ठाकरे-केजरीवाल भेटीवर ओवेसींची टीका

By कमलाकर कांबळे | Updated: February 25, 2023 17:06 IST

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिमोट कंट्रोल मोदी-शहा यांच्या हातात"

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. छोटा रिचार्ज येवून गेल्याचे समजते, अशा शब्दात असदुद्दीन ओवेसी यांनी या भेटीवर मिश्कील टिप्पणी केली. मोदी आणि शहा यांच्या हातातील तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिमोट कंट्रोल मोदी-शहा यांच्या हातात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली.

एआयएमआयएमचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत होत आहे. याचीच माहिती देण्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे शनिवारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह सोळा राज्यातील पक्षाचे खासदार, आमदार आणि पक्षांचे अध्यक्ष उपस्थित होते.

केंद्र सरकार मुस्लिमांच्या विरोधात आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये अल्पसंख्यांकावर अन्याय होत आहेत. पिडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी कॉंग्रेस भारत जोडो यात्रेत मग्न आहे. लव्ह जिहादच्या मोर्चामागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याची टिका ओवेसी यांनी केली. लोकभावना विचारात न घेता औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव, असे नामकारण करण्यात आले आहे. त्याचा ओवेसी यांनी यांनी यावेळी निषेध केला. लोकसभा निवडणुकीत आम्ही औरंगाबाद जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच लोकसभा निवडणुकीसाठी कोणाशी आणि कशी आघडी करायची याबाबत या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद शहराच्या नामकारणाला आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही मोर्चाही काढला होता. मात्र त्यानंतरही नामकारण करण्यात आले. आता नामकारण झालेच आहे, तर सरकारने या शहरातील जीवनमान सुधारण्यावर भर द्यावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, पाण्याचा प्रश्न मार्गी लावाला. केवळ नाव बदलून हे शक्य होणार नाही, याची सरकारलाही जाण आहे. एकूणच जनतेच्या भावनेशी हा खेळ असून त्याविरोधात आमची कायदेशीर लढाई सुरूच राहिल, असे इम्तियाज जलील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीUddhav Thackerayउद्धव ठाकरेArvind Kejriwalअरविंद केजरीवालEknath Shindeएकनाथ शिंदे