शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

"छोटा रिचार्ज येवून गेल्याचं समजलं"; ठाकरे-केजरीवाल भेटीवर ओवेसींची टीका

By कमलाकर कांबळे | Updated: February 25, 2023 17:06 IST

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिमोट कंट्रोल मोदी-शहा यांच्या हातात"

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. छोटा रिचार्ज येवून गेल्याचे समजते, अशा शब्दात असदुद्दीन ओवेसी यांनी या भेटीवर मिश्कील टिप्पणी केली. मोदी आणि शहा यांच्या हातातील तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिमोट कंट्रोल मोदी-शहा यांच्या हातात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली.

एआयएमआयएमचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत होत आहे. याचीच माहिती देण्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे शनिवारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह सोळा राज्यातील पक्षाचे खासदार, आमदार आणि पक्षांचे अध्यक्ष उपस्थित होते.

केंद्र सरकार मुस्लिमांच्या विरोधात आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये अल्पसंख्यांकावर अन्याय होत आहेत. पिडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी कॉंग्रेस भारत जोडो यात्रेत मग्न आहे. लव्ह जिहादच्या मोर्चामागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याची टिका ओवेसी यांनी केली. लोकभावना विचारात न घेता औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव, असे नामकारण करण्यात आले आहे. त्याचा ओवेसी यांनी यांनी यावेळी निषेध केला. लोकसभा निवडणुकीत आम्ही औरंगाबाद जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच लोकसभा निवडणुकीसाठी कोणाशी आणि कशी आघडी करायची याबाबत या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद शहराच्या नामकारणाला आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही मोर्चाही काढला होता. मात्र त्यानंतरही नामकारण करण्यात आले. आता नामकारण झालेच आहे, तर सरकारने या शहरातील जीवनमान सुधारण्यावर भर द्यावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, पाण्याचा प्रश्न मार्गी लावाला. केवळ नाव बदलून हे शक्य होणार नाही, याची सरकारलाही जाण आहे. एकूणच जनतेच्या भावनेशी हा खेळ असून त्याविरोधात आमची कायदेशीर लढाई सुरूच राहिल, असे इम्तियाज जलील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीUddhav Thackerayउद्धव ठाकरेArvind Kejriwalअरविंद केजरीवालEknath Shindeएकनाथ शिंदे