शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

स्मार्ट सिटीतले वाहनचालक बेशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 02:08 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेणाऱ्या शहरातील वाहनचालक मात्र बेशिस्त असल्याचे वाहतूक पोलिसांनी तीन वर्षांत केलेल्या कारवाईतून समोर आले आहे.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईस्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेणाऱ्या शहरातील वाहनचालक मात्र बेशिस्त असल्याचे वाहतूक पोलिसांनी तीन वर्षांत केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. तीन वर्षांत तब्बल १० लाख ६१ हजार ३१३ चालकांवर वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली आहे.नवी मुंबई शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी सिडको व महापालिका प्रशासनाने पाऊल उचलले आहे. परंतु भविष्यात सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईला ओळख मिळत असतानाच बेशिस्त वाहनचालकांमुळे त्याला खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुकीच्या नियमांबाबत वारंवार जनजागृती करूनही शहरात बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढतच चालली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहने चालवणाऱ्या अशा १० लाख ६१ हजार ३१३ चालकांवर मागील तीन वर्षांत कारवाई झाली आहे. बेशिस्त वाहनचालकांची ही संख्या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या बरोबरीची आहे. तर त्यांच्याकडून १२ कोटी १५ लाख ३१ हजार ७०० रुपये इतकी रक्कम दंड स्वरूपात जमा झालेली आहे. वाहतूक पोलिसांनी परिमंडळ १ व २ मध्ये या कारवाया केल्या आहेत. अवैध प्रवासी वाहतूक, हेल्मेट न वापरणे, मद्यपान करून वाहन चालवणे अशा विविध प्रकारांतून या कारवाया झालेल्या आहेत. मागील वर्षभरात वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनालकांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. यासाठी नवी मुंबईसह पनवेल परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाया होत आहेत. सिग्नल तोडणे अथवा धूम स्टाईलने वाहन पळवल्याने सर्वाधिक अपघात घडत आहेत. यामध्ये अनेकांना प्राणास मुकावे लागले असून, बहुतांश मृत्यू हे हेल्मेटचा वापर न केल्याने झाले आहेत. त्यामुळे एकीकडे कारवाया करीत असताना दुसरीकडे जनजागृतीचाही उपक्रम वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी राबवलेला आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरुणांचे सर्वाधिक प्रमाण आहे. अशा रोडरोमीओंना देखील आवर घालण्यासाठी महाविद्यालय आवारात कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी ८५३ तरुणांवर वाहतुकीच्या विविध कलमांतर्गत कारवाई झाली होती. त्यानंतर उपक्रमाद्वारे तरुणांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृतीचा प्रयत्न वाहतूक पोलिसांनी केला होता. त्यानंतरही स्मार्ट सिटीतल्या स्मार्ट नागरिकांमध्ये जनजागृती न झाल्याने सर्रास वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत आहे.मद्यपान करून भरधाव वेगात वाहन चालवल्यामुळे घडणाऱ्या अपघातांचेही प्रमाण वाढत आहे. असे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तळीराम वाहनचालकांवर गतवर्षी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. थर्टीफर्स्टच्या दिवशीही जागोजागी नाकाबंदी करून तळीराम चालकांचा शोध घेण्यात आलेला आहे. त्यानुसार २०१५ मध्ये १,८११ चालकांवर दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी कारवाया केल्या आहेत. पामबीच मार्गावर तसेच वाशीच्या मिनी सीशोअर व इतर मार्गावर धूम स्टाईलने मोटारसायकल पळवणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम पोलिसांनी राबवली. सन २०१५ मध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात अशा कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये १,३५८ जणांना वेगात वाहने चालवल्यामुळे पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. असे असले तरीही आजही अनेक भागांत तरूणाईची धूम स्टाईल सुरूच असल्याचे पहावयास मिळते.