शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
4
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
5
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
7
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
8
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
9
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
10
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
11
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
12
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
13
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
14
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
15
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
16
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
17
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
18
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
19
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
20
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

स्मार्ट सिटीतले वाहनचालक बेशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 02:08 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेणाऱ्या शहरातील वाहनचालक मात्र बेशिस्त असल्याचे वाहतूक पोलिसांनी तीन वर्षांत केलेल्या कारवाईतून समोर आले आहे.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईस्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेणाऱ्या शहरातील वाहनचालक मात्र बेशिस्त असल्याचे वाहतूक पोलिसांनी तीन वर्षांत केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. तीन वर्षांत तब्बल १० लाख ६१ हजार ३१३ चालकांवर वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली आहे.नवी मुंबई शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी सिडको व महापालिका प्रशासनाने पाऊल उचलले आहे. परंतु भविष्यात सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईला ओळख मिळत असतानाच बेशिस्त वाहनचालकांमुळे त्याला खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुकीच्या नियमांबाबत वारंवार जनजागृती करूनही शहरात बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढतच चालली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहने चालवणाऱ्या अशा १० लाख ६१ हजार ३१३ चालकांवर मागील तीन वर्षांत कारवाई झाली आहे. बेशिस्त वाहनचालकांची ही संख्या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या बरोबरीची आहे. तर त्यांच्याकडून १२ कोटी १५ लाख ३१ हजार ७०० रुपये इतकी रक्कम दंड स्वरूपात जमा झालेली आहे. वाहतूक पोलिसांनी परिमंडळ १ व २ मध्ये या कारवाया केल्या आहेत. अवैध प्रवासी वाहतूक, हेल्मेट न वापरणे, मद्यपान करून वाहन चालवणे अशा विविध प्रकारांतून या कारवाया झालेल्या आहेत. मागील वर्षभरात वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनालकांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. यासाठी नवी मुंबईसह पनवेल परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाया होत आहेत. सिग्नल तोडणे अथवा धूम स्टाईलने वाहन पळवल्याने सर्वाधिक अपघात घडत आहेत. यामध्ये अनेकांना प्राणास मुकावे लागले असून, बहुतांश मृत्यू हे हेल्मेटचा वापर न केल्याने झाले आहेत. त्यामुळे एकीकडे कारवाया करीत असताना दुसरीकडे जनजागृतीचाही उपक्रम वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी राबवलेला आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरुणांचे सर्वाधिक प्रमाण आहे. अशा रोडरोमीओंना देखील आवर घालण्यासाठी महाविद्यालय आवारात कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी ८५३ तरुणांवर वाहतुकीच्या विविध कलमांतर्गत कारवाई झाली होती. त्यानंतर उपक्रमाद्वारे तरुणांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृतीचा प्रयत्न वाहतूक पोलिसांनी केला होता. त्यानंतरही स्मार्ट सिटीतल्या स्मार्ट नागरिकांमध्ये जनजागृती न झाल्याने सर्रास वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत आहे.मद्यपान करून भरधाव वेगात वाहन चालवल्यामुळे घडणाऱ्या अपघातांचेही प्रमाण वाढत आहे. असे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तळीराम वाहनचालकांवर गतवर्षी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. थर्टीफर्स्टच्या दिवशीही जागोजागी नाकाबंदी करून तळीराम चालकांचा शोध घेण्यात आलेला आहे. त्यानुसार २०१५ मध्ये १,८११ चालकांवर दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी कारवाया केल्या आहेत. पामबीच मार्गावर तसेच वाशीच्या मिनी सीशोअर व इतर मार्गावर धूम स्टाईलने मोटारसायकल पळवणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम पोलिसांनी राबवली. सन २०१५ मध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात अशा कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये १,३५८ जणांना वेगात वाहने चालवल्यामुळे पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. असे असले तरीही आजही अनेक भागांत तरूणाईची धूम स्टाईल सुरूच असल्याचे पहावयास मिळते.