शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

स्मार्ट सिटीतले वाहनचालक बेशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 02:08 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेणाऱ्या शहरातील वाहनचालक मात्र बेशिस्त असल्याचे वाहतूक पोलिसांनी तीन वर्षांत केलेल्या कारवाईतून समोर आले आहे.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईस्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेणाऱ्या शहरातील वाहनचालक मात्र बेशिस्त असल्याचे वाहतूक पोलिसांनी तीन वर्षांत केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. तीन वर्षांत तब्बल १० लाख ६१ हजार ३१३ चालकांवर वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली आहे.नवी मुंबई शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी सिडको व महापालिका प्रशासनाने पाऊल उचलले आहे. परंतु भविष्यात सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईला ओळख मिळत असतानाच बेशिस्त वाहनचालकांमुळे त्याला खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुकीच्या नियमांबाबत वारंवार जनजागृती करूनही शहरात बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढतच चालली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहने चालवणाऱ्या अशा १० लाख ६१ हजार ३१३ चालकांवर मागील तीन वर्षांत कारवाई झाली आहे. बेशिस्त वाहनचालकांची ही संख्या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या बरोबरीची आहे. तर त्यांच्याकडून १२ कोटी १५ लाख ३१ हजार ७०० रुपये इतकी रक्कम दंड स्वरूपात जमा झालेली आहे. वाहतूक पोलिसांनी परिमंडळ १ व २ मध्ये या कारवाया केल्या आहेत. अवैध प्रवासी वाहतूक, हेल्मेट न वापरणे, मद्यपान करून वाहन चालवणे अशा विविध प्रकारांतून या कारवाया झालेल्या आहेत. मागील वर्षभरात वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनालकांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. यासाठी नवी मुंबईसह पनवेल परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाया होत आहेत. सिग्नल तोडणे अथवा धूम स्टाईलने वाहन पळवल्याने सर्वाधिक अपघात घडत आहेत. यामध्ये अनेकांना प्राणास मुकावे लागले असून, बहुतांश मृत्यू हे हेल्मेटचा वापर न केल्याने झाले आहेत. त्यामुळे एकीकडे कारवाया करीत असताना दुसरीकडे जनजागृतीचाही उपक्रम वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी राबवलेला आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरुणांचे सर्वाधिक प्रमाण आहे. अशा रोडरोमीओंना देखील आवर घालण्यासाठी महाविद्यालय आवारात कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी ८५३ तरुणांवर वाहतुकीच्या विविध कलमांतर्गत कारवाई झाली होती. त्यानंतर उपक्रमाद्वारे तरुणांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृतीचा प्रयत्न वाहतूक पोलिसांनी केला होता. त्यानंतरही स्मार्ट सिटीतल्या स्मार्ट नागरिकांमध्ये जनजागृती न झाल्याने सर्रास वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत आहे.मद्यपान करून भरधाव वेगात वाहन चालवल्यामुळे घडणाऱ्या अपघातांचेही प्रमाण वाढत आहे. असे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तळीराम वाहनचालकांवर गतवर्षी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. थर्टीफर्स्टच्या दिवशीही जागोजागी नाकाबंदी करून तळीराम चालकांचा शोध घेण्यात आलेला आहे. त्यानुसार २०१५ मध्ये १,८११ चालकांवर दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी कारवाया केल्या आहेत. पामबीच मार्गावर तसेच वाशीच्या मिनी सीशोअर व इतर मार्गावर धूम स्टाईलने मोटारसायकल पळवणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम पोलिसांनी राबवली. सन २०१५ मध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात अशा कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये १,३५८ जणांना वेगात वाहने चालवल्यामुळे पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. असे असले तरीही आजही अनेक भागांत तरूणाईची धूम स्टाईल सुरूच असल्याचे पहावयास मिळते.