शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीतले वाहनचालक बेशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 02:08 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेणाऱ्या शहरातील वाहनचालक मात्र बेशिस्त असल्याचे वाहतूक पोलिसांनी तीन वर्षांत केलेल्या कारवाईतून समोर आले आहे.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईस्मार्ट सिटीच्या दिशेने झेप घेणाऱ्या शहरातील वाहनचालक मात्र बेशिस्त असल्याचे वाहतूक पोलिसांनी तीन वर्षांत केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. तीन वर्षांत तब्बल १० लाख ६१ हजार ३१३ चालकांवर वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली आहे.नवी मुंबई शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी सिडको व महापालिका प्रशासनाने पाऊल उचलले आहे. परंतु भविष्यात सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईला ओळख मिळत असतानाच बेशिस्त वाहनचालकांमुळे त्याला खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुकीच्या नियमांबाबत वारंवार जनजागृती करूनही शहरात बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढतच चालली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहने चालवणाऱ्या अशा १० लाख ६१ हजार ३१३ चालकांवर मागील तीन वर्षांत कारवाई झाली आहे. बेशिस्त वाहनचालकांची ही संख्या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या बरोबरीची आहे. तर त्यांच्याकडून १२ कोटी १५ लाख ३१ हजार ७०० रुपये इतकी रक्कम दंड स्वरूपात जमा झालेली आहे. वाहतूक पोलिसांनी परिमंडळ १ व २ मध्ये या कारवाया केल्या आहेत. अवैध प्रवासी वाहतूक, हेल्मेट न वापरणे, मद्यपान करून वाहन चालवणे अशा विविध प्रकारांतून या कारवाया झालेल्या आहेत. मागील वर्षभरात वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनालकांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. यासाठी नवी मुंबईसह पनवेल परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाया होत आहेत. सिग्नल तोडणे अथवा धूम स्टाईलने वाहन पळवल्याने सर्वाधिक अपघात घडत आहेत. यामध्ये अनेकांना प्राणास मुकावे लागले असून, बहुतांश मृत्यू हे हेल्मेटचा वापर न केल्याने झाले आहेत. त्यामुळे एकीकडे कारवाया करीत असताना दुसरीकडे जनजागृतीचाही उपक्रम वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी राबवलेला आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरुणांचे सर्वाधिक प्रमाण आहे. अशा रोडरोमीओंना देखील आवर घालण्यासाठी महाविद्यालय आवारात कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी ८५३ तरुणांवर वाहतुकीच्या विविध कलमांतर्गत कारवाई झाली होती. त्यानंतर उपक्रमाद्वारे तरुणांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृतीचा प्रयत्न वाहतूक पोलिसांनी केला होता. त्यानंतरही स्मार्ट सिटीतल्या स्मार्ट नागरिकांमध्ये जनजागृती न झाल्याने सर्रास वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत आहे.मद्यपान करून भरधाव वेगात वाहन चालवल्यामुळे घडणाऱ्या अपघातांचेही प्रमाण वाढत आहे. असे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तळीराम वाहनचालकांवर गतवर्षी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. थर्टीफर्स्टच्या दिवशीही जागोजागी नाकाबंदी करून तळीराम चालकांचा शोध घेण्यात आलेला आहे. त्यानुसार २०१५ मध्ये १,८११ चालकांवर दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी कारवाया केल्या आहेत. पामबीच मार्गावर तसेच वाशीच्या मिनी सीशोअर व इतर मार्गावर धूम स्टाईलने मोटारसायकल पळवणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम पोलिसांनी राबवली. सन २०१५ मध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात अशा कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये १,३५८ जणांना वेगात वाहने चालवल्यामुळे पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. असे असले तरीही आजही अनेक भागांत तरूणाईची धूम स्टाईल सुरूच असल्याचे पहावयास मिळते.