शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत फेरीवाल्यांकडून पादचाऱ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:12 IST

कारवाईकडे डोळेझाक; मुख्य रस्त्यांसह पदपथ बळकावले

नवी मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईत प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे. परिणामी, त्यांच्याकडून रहदारीच्या मुख्य रस्त्यांसह पदपथ बळकावले जात आहेत. याचा नाहक त्रास पादचाऱ्यांसह वाहनचालकांना करावा लागत असून, वाहतूककोंडीतही भर पडत चालली आहे.न्यायालयाच्या निर्देशानंतरही अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यातून शहराला सोडवण्यात पालिका अधिकारी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे उद्भवत असलेल्या समस्यांकडे लोकप्रतिनिधींचीही डोळेझाक होत आहे. याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ठोस भूमिका घेतली होती. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांचे धाबे दणाणले होते. शिवाय, पदपथ व रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याने रहदारीचीही वाट मोकळी झाली होती; परंतु त्यांच्या बदलीनंतर मागील अडीच वर्षांत त्यांनी बसवलेली घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. जागोजागी फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचे दिसत असून, पदपथ व रस्तेही बळकावले जात आहेत. या अनधिकृत फेरीवाल्यांमागे अनेक टोळ्या सक्रिय असून, त्यांना पालिका अधिकाºयांसह लोकप्रतिनिधींचाही छुपा पाठिंबा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आवाज दाबला जात असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण वाढत चालले असून, त्यांच्यातल्या गुंडगिरी प्रवृत्तीचेही दर्शन जागोजागी घडत आहे.पदपथ व रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी दुकान मांडल्याची तक्रार केल्यास संबंधिताला थेट धमकावलेही जात आहे, असे अनेक प्रकार वाशी व ऐरोलीसह घणसोली परिसरात घडले आहेत. त्यामुळे नागरिकांवर फेरीवाल्यांची दहशत निर्माण होत चालली आहे. तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वाशी सेक्टर-९ व लगतचा संपूर्ण परिसर फेरीवाला मुक्त केला होता. तर जे अनेक वर्षांपासून व्यवसाय करत होते, त्यांना अधिकृत जागा उपलब्ध करून दिली होती; परंतु मागील काही वर्षांत वाशी सेक्टर ९, १५ व इतर परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यांच्याकडून पदपथांवरच बाजार मांडला जात असल्याने पादचाºयांना नाइलाजास्तव रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामध्ये अपघाताचाही धोका निर्माण होत आहे. तर त्याच परिसरात रस्त्यालगत मोठ्या संख्येने वाहनेही उभी केली जात असल्याने वर्दळीच्या वेळी अग्निशमन केंद्र ते जुहूगाव दरम्यान मोठी वाहतूककोंडी होत आहे. यामुळे वाहनांपासून होणाºया प्रदूषणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.मार्जिनल स्पेसवरील कारवाईतही पालिकेने हात आखडता घेतल्याने प्रशासनाच्याच भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे. तर पालिकेकडूनच अभय मिळत असल्याने व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानापुढील जागेतही छोटी दुकाने थाटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.पार्किंगचाही फटकाशहरात अनेक छोटी-मोठी वाहन विक्री केंद्र असून, त्यापैकी बहुतांश ठिकाणे रस्त्यालगतच आहेत. त्यांच्याकडून विक्रीसाठी असलेली वाहने पदपथांवरच मांडली जात आहेत. त्याशिवाय टुरिस्ट कंपन्यांचीही वाहने रस्त्यालगत तसेच पदपथांवर उभी केली जात आहेत. यामुळेही रहदारीला अडथळा होत असून त्यावरही कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. फेरीवाल्यांसह अशा अतिक्रमणावर कारवाईला मिळणाºया अभयामागे अर्थपूर्ण हितसंबंध असल्याचा आरोप होत आहे.ना फेरीवाला क्षेत्रातही अतिक्रमणरेल्वेस्थानक, रुग्णालये तसेच शाळा व इतर महत्त्वाच्या ठिकाणाबाहेर १५० मीटरपर्यंत ना फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अनधिकृत फेरीवाल्यांना थारा मिळू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. यानंतरही अशा ठिकाणच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. यावरून प्रशासनाकडूनच न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होताना दिसून येत आहे; परंतु सर्वच राजकीय पक्षांकडूनही अर्थपूर्ण मौन बाळगले जात आहे.स्टेशन परिसरातही बाजाररेल्वेस्थानकांच्या आवारातही अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. वाशी, सानपाडा, ऐरोली तसेच नेरुळ व जुईनगर स्थानकाबाहेर हा प्रकार पाहायला मिळत आहे. व्यावसायिक गाळ्यातील दुकानदारांसह अनधिकृत फेरीवाल्यांकडून प्रवाशांची वाट अडवण्यात आली आहे. त्यांच्यावरही कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वच प्रशासनाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे.

टॅग्स :hawkersफेरीवाले