शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शहरातील दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे, वाहतूक पोलिसांची १४४७ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 07:02 IST

नियम धाब्यावर बसवणाºया २४६२ बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे, तर वाहनांना काळ्या काचा

नवी मुंबई : नियम धाब्यावर बसवणाºया २४६२ बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे, तर वाहनांना काळ्या काचा लावणा-यांवरही कारवाईची संख्या मोठी असल्याने काळ्या काचांमागचे गूढ काय हे अद्याप उघड झालेले नाही.पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १६ ते २६ नोव्हेंबर दरम्यान वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमाचे पालन व्हावे व त्यांना शिस्त लागावी या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली होती. या कालावधीत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक शाखा उपआयुक्त नितीन पवार यांनी सर्व युनिटच्या अधिकाºयांना दिले होते. त्यानुसार आयुक्तालय क्षेत्रात सर्वच ठिकाणी वाहतूक पोलिसांमार्फत ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी विना हेल्मेट दुचाकी चालवणाºयांसह फॅन्सी नंबरप्लेट तसेच काळ्या काचा वापरणाºयांवर कारवाई करण्यात आली. यादरम्यान आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण २४६२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये वाहनांना काळ्या काचा लावल्याप्रकरणी ४३२ जणांवर तर फॅन्सी अथवा अस्पष्ट नंबरप्लेट प्रकरणी ५८३ कारवाया झालेल्या आहेत. तर विना हेल्मेट दुचाकी चालवल्याप्रकरणी तब्बल १४४७ जणांवर कारवाई झाली आहे. त्यावरुन शहरातील दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे असल्याचे दिसून येत आहे.वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी यापूर्वी देखील वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारे धडक कारवाईची मोहीम राबवलेली आहे. त्यावेळी देखील सर्वाधिक कारवाया हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांवर झाल्या होत्या. त्यामध्ये तरुणाईचा सर्वाधिक समावेश असल्याने त्यांना शिस्त लावण्यासाठी महाविद्यालयांच्या बाहेर मोहीम राबवून त्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत शिस्तीचे धडे देखील देण्यात आले होते. दुचाकीच्या अपघातामध्ये प्राण जाण्याची शक्यता अधिक असल्याने हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यात आले होते. परंतु त्यानंतरही बहुतांश दुचाकीस्वारांमधला बेशिस्तपणा कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. तर गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी वाहनांना काळ्या काचा वापरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यानंतरही व्हीआयपी थाट म्हणून अनेक जण कारच्या काचांना काळी फिल्म लावतात, परंतु रात्रीच्या वेळी काळ्या काचांमुळे अनेकांचे अपघात देखील झालेले आहेत. त्यानंतरही काळ्या काचांचा मोह कायम असल्याने, अशा वाहनांमध्ये नेमके दडलेय काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.हेल्मेट न वापरल्याने किरकोळ अपघातामध्ये देखील दुचाकीस्वाराचे प्राण गेल्याच्या घटना शहरात घडलेल्या आहेत. ठाणे-बेलापूर मार्गासह पामबीच मार्गावर सर्वाधिक अशा घटना घडल्या आहेत. अशावेळी दुचाकीस्वारांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताच्या घटना नक्कीच टळतील.वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने नियम पाळल्यास स्वत:चे व इतरांचे प्राण नक्कीच वाचतील. परंतु अद्यापही अनेक जण वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्यावर कारवाईच्या उद्देशाने दहा दिवसांची विशेष कारवाईची मोहीम राबवण्यात आली होती. त्यात एकूण २४६२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.- नितीन पवार,पोलीस उपआयुक्त,वाहतूक शाखा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई