शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

दोन टँकरची धडक, आठ तास वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 5:10 AM

सायन-पनवेल महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी या मार्गावरील कोपरा उड्डाणपुलावर डांबराची वाहतूक करणारा टँकर उलटला होता.

पनवेल : सायन-पनवेल महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी या मार्गावरील कोपरा उड्डाणपुलावर डांबराची वाहतूक करणारा टँकर उलटला होता. अगदी याच घटनेची पुनरावृत्ती शुक्र वारी पहाटे ५.३० च्या दरम्यान घडली. डिझेल व डांबराची वाहतूक करणाऱ्या दोन टँकरमध्ये धडक बसल्याने खारघर टोलनाक्याजवळ पुण्याकडे जाणारा मार्ग ठप्प झाला होता. या अपघातांमुळे टँकरमधील डांबर रस्त्यावर सांडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.विशेष म्हणजे, या मार्गाच्या मधोमध अपघातग्रस्त टँकर बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. खारघर स्पेगेटी बस स्थानकापासून हिरानंदानी उड्डाणपुलापर्यंत सुमारे तीन कि. मी. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर डांबर सांडल्याने दुचाकींचाही या वेळी अपघात झाला. याच मार्गावर हिरानंदानी उड्डाणपुलावर कारने टेम्पोला धडक दिल्याने नजीकच्या अंतरावर अपघाताची दुसरी घटना घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी कारचे नुकसान झाले. महामार्गावर अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. २०१६ ते २०१८पर्यंत अद्याप ९५ जणांना या मार्गावर अपघातांमुळे आपले जीव गमवावे लागल्याची माहिती, माहिती अधिकारात दीपक सिंग या आरटीआय कार्यकर्त्याने उघड केली. विशेष म्हणजे, या मार्गावर पथदिवे नसल्याने अनेक अपघात रात्री व पहाटेच्या सुमारास घडत असतात. वाहनचालकांना समोरील वाहने अंधारामुळे दिसत नसल्यानेच अशाप्रकारे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. टोलनाक्याजवळ झालेल्या अपघातामुळे वाहतूककोंडी सुरळीत होण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागला. खारघर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे हे पहाटेपासून घटनास्थळी उपस्थित होते.सिग्नल यंत्रणा बंदसायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करणाºया ठेकेदाराने अद्याप सिग्नल बसविले नाहीत. सानपाडा, नेरूळ, सीबीडी, खारघर येथे सिग्नल नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. खारघरमध्ये सकाळी व सायंकाळी प्रचंड वाहतूककोंडी होत असून वाहतूक पोलिसांना जादा मनुष्यबळ उपलब्ध करावे लागत आहे. सिग्नल नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.महामार्ग अंधारातमहामार्गावरील बहुतांश विद्युत दिवे बंद आहेत. अंधार असल्यामुळे वाहनचालकांना समोरील वाहनांचा व रोडवरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अंधारामुळे पहाटेच्या वेळी अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. खारघरमध्ये झालेला अपघातही अपुºया प्रकाशामुळे झाल्याचे बोलले जात आहे.अर्धवट राहिलेली कामेमहामार्गावर तुर्भे येथील उड्डाणपुलाचे काम अर्धवट राहिलेले आहे. नेरूळ ते उरण फाटा दरम्यानच्या पादचारी भुयारी मार्गांचे काम महापालिकेने केले आहे; परंतु सीबीडीच्या पुढील भुयारी मार्गांचे काम रखडले असून नागरिकांना धोकादायकपणे रोड ओलांडावा लागत आहे.पावसाळ्यात अपघात वाढणारपाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात महामार्गावर दोन गंभीर अपघात झाले आहेत. महामार्गावरील रखडलेली कामे. सिग्नल यंत्रणेचा अभाव व अंधारामुळे पावसाळ्यात अपघातांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई