शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अपघातात रोडपाली येथील दोन भावंडांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 22:16 IST

अचानक झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्दे सुशांत सदाशिव ठाकूर (27 )व प्रफुल बाळकृष्ण ठाकूर (23) असे मृत युवकांचे नाव असून ते दोघे चुलत भाऊ होते. यातील सुशांत ठाकूर याचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. शिवाय येत्या एप्रिल महिन्यात त्याचं लग्न होणार होतं.

पनवेल - रोडपाली गावातील दोन तरुणांचा आज शुक्रवार दि.7  रोजी पहाटे झालेल्या मोटारसायकल अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुशांत सदाशिव ठाकूर (27 )व प्रफुल बाळकृष्ण ठाकूर (23) असे मृत युवकांचे नाव असून ते दोघे चुलत भाऊ होते. भरधाव येणारे अवजड वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून अचानक झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

यातील सुशांत ठाकूर याचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. शिवाय येत्या एप्रिल महिन्यात त्याचं लग्न होणार होतं. पहाटे लवकर मुंबईच्या चोर बाजारात (नळ बाजारात) वस्तू स्वस्त मिळतात अशी माहिती असल्यामुळे दोघे भाऊ पहाटे साडेचारच्या सुमारास मोटरसायकलवरून निघाले होते. नवी मुंबईतील वाशी याठिकाणी पोहोचल्यावर भरधाव येणारे अवजड वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ज्या मोटर सायकलवरून ते प्रवास करत होते त्या मोटार सायकलला काहीही झालं नाही. आजूबाजूला सीसीटीव्ही नसल्यामुळे नेमक्या कोणत्या वाहनाने धडक दिली हे मात्र समजू शकले नाही.

टॅग्स :AccidentअपघातpanvelपनवेलDeathमृत्यू