शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दोन चिमुरड्यांच्या अपहरणाचा प्रयत्न

By admin | Updated: July 9, 2017 02:14 IST

पायी चाललेल्या महिलेकडील दोन चिमुरड्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना नेरुळमध्ये घडली आहे; परंतु वेळीच महिलेने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पायी चाललेल्या महिलेकडील दोन चिमुरड्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना नेरुळमध्ये घडली आहे; परंतु वेळीच महिलेने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी केलेल्या मदतीमुळे अपहरणकर्त्याचा डाव फसला आहे. या अपहरणकर्त्याला नागरिकांनी पकडून नेरुळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.नेरुळ येथील सारसोळे डेपोलगत शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला आहे. आरती पाटील या त्यांचा मुलगा कृष्णा (०४) व त्या ज्यांच्याकडे काम करतात त्या सुनील पाटील यांची मुलगी दक्षता (०४) या दोघांना घेऊन रस्त्याने चालल्या होत्या. दोघेही प्लेस्कूलमध्ये शिकत असून दररोज सकाळी आरती पाटील त्यांची ने-आण करायच्या. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी त्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन रस्त्याने चालल्या असताना, समोरून आलेल्या एका व्यक्तीने दोन्ही मुलांना हिसकावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सदर व्यक्तीने आरती पाटील यांना धक्का देऊन मुलांना उचलून पळ काढताच, त्यांनी आरडाओरडा केला. त्यांनी मदतीसाठी दिलेली हाक ऐकताच परिसरातील काही व्यक्तींनी त्या ठिकाणी धाव घेत, मुलांना घेऊन पळणाऱ्या व्यक्तीला पकडले. या वेळी त्याने नागरिकांसोबतही धक्काबुक्की करून पळण्याचा प्रयत्न केला असता, जमावाने त्याला चोप दिला. तसेच संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत त्याचे नाव रामसुख रामजीयामन असल्याचे समोर आले. त्याच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याने दोन्ही मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न कशासाठी केला, याचा उलगडा अद्यापपर्यंत झालेला नाही.