शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा

By नारायण जाधव | Updated: May 31, 2025 07:36 IST

वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ

नारायण जाधव

नवी मुंबई : राज्यातील वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासह प्रवासी, तसेच वाहनांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी राज्य शासनाने आपल्या विविध विभागांच्या मालकीची २१,४२५ वाहने भंगारात काढली आहेत. यातील १२,८२३ वाहने १ एप्रिल २०२४ ते २१ एप्रिल २०२५ या काळात भंगारात काढली आहेत. उर्वरित ७,८७९ ही १ एप्रिल २०२४ पूर्वी भंगारात काढल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच, नव्याने ९४६ वाहने विभागाच्या पोर्टलवर भंगारासाठी लिलावात काढली.

केंद्र सरकारच्या मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम २०२१ अनुसार ही वाहने निष्कासित केल्याची माहिती परितटन विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमात दिली. भविष्यात वाहनांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. जुनी वाहने भंगारात काढल्यानंतर नवी वाहने खरेदी करण्याची मुभा दिल्याने अर्थव्यवस्थेत चालना मिळेल, असे शासनाने म्हटले आहे.

जुनी वाहने भंगारात का? 

राज्यातील वाहनांचे प्रदूषण कमी करणे. 

रस्त्यावरील प्रवासी, तसेच वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करणे. 

वाहनांची इंधन कार्यक्षमतेत सुधारणा करून देखभाल खर्च कमी करणे.

जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणून अर्थव्यवस्थेत गुणात्मक सुधारणा करणे.

खरेदी करण्यासाठी मुभा 

१५ वर्षे किंवा त्याहून जुनी जी शासकीय वाहने भंगारात काढून त्यांचा लिलाव केला आहे, त्यामुळे त्यांच्याअभावी अधिकाऱ्यांची गैरसोय होऊ नये, शासकीय कामे खोळंबू नये, हे लक्षात घेऊन या वाहनांच्या जागी भाड्याने घेण्याची वा नवी वाहने खरेदी करण्याची मुभा संबंधितांना दिली आहे.

कोणाची किती वाहने ?

केंद्र शासन १,१४६ 

राज्य शासन ५,२११ 

पोलिस ६,४६६

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcarकार