शहरं
Join us  
Trending Stories
1
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
2
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
3
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
4
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
5
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
6
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
7
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
8
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
9
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं
10
Onion Price Hike : महाराष्ट्रात कांद्याचे भाव गगनाला भिडणार? नेमकं करण तरी काय?
11
Corona Virus Update : चिंता वाढतेय! २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू, देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या किती?
12
'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट', केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत
13
सनातन धर्माला काहीही बोललं जातं तेव्हा हा राग कुठे जातो? शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून पवन कल्याण संतप्त
14
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
15
विमान प्रवास होणार स्वस्त? विमान इंधनाच्या किमती सलग तिसऱ्यांदा घटल्या; काय आहेत सध्याचे दर?
16
अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला
17
नातेवाईक बाहेर करत राहिले विरोध, पोलिसांनी ठाण्यात लावून दिलं लग्न, पोलीसच बनले वऱ्हाडी आणि...  
18
टाटा-रिलायन्सला सरकारी कंपनी ठरली सरस! आठवड्यात कमावला ५९,२३३ कोटी रुपयांचा नफा
19
३० कोटींची लॉटरी जिंकून पैसे गर्लफ्रेंडला दिले, दुसऱ्यासोबत फुर्र होऊन तिने बॉयफ्रेंडलाच कंगाल केले! 

राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा

By नारायण जाधव | Updated: May 31, 2025 07:36 IST

वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ

नारायण जाधव

नवी मुंबई : राज्यातील वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासह प्रवासी, तसेच वाहनांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी राज्य शासनाने आपल्या विविध विभागांच्या मालकीची २१,४२५ वाहने भंगारात काढली आहेत. यातील १२,८२३ वाहने १ एप्रिल २०२४ ते २१ एप्रिल २०२५ या काळात भंगारात काढली आहेत. उर्वरित ७,८७९ ही १ एप्रिल २०२४ पूर्वी भंगारात काढल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच, नव्याने ९४६ वाहने विभागाच्या पोर्टलवर भंगारासाठी लिलावात काढली.

केंद्र सरकारच्या मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम २०२१ अनुसार ही वाहने निष्कासित केल्याची माहिती परितटन विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमात दिली. भविष्यात वाहनांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. जुनी वाहने भंगारात काढल्यानंतर नवी वाहने खरेदी करण्याची मुभा दिल्याने अर्थव्यवस्थेत चालना मिळेल, असे शासनाने म्हटले आहे.

जुनी वाहने भंगारात का? 

राज्यातील वाहनांचे प्रदूषण कमी करणे. 

रस्त्यावरील प्रवासी, तसेच वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करणे. 

वाहनांची इंधन कार्यक्षमतेत सुधारणा करून देखभाल खर्च कमी करणे.

जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणून अर्थव्यवस्थेत गुणात्मक सुधारणा करणे.

खरेदी करण्यासाठी मुभा 

१५ वर्षे किंवा त्याहून जुनी जी शासकीय वाहने भंगारात काढून त्यांचा लिलाव केला आहे, त्यामुळे त्यांच्याअभावी अधिकाऱ्यांची गैरसोय होऊ नये, शासकीय कामे खोळंबू नये, हे लक्षात घेऊन या वाहनांच्या जागी भाड्याने घेण्याची वा नवी वाहने खरेदी करण्याची मुभा संबंधितांना दिली आहे.

कोणाची किती वाहने ?

केंद्र शासन १,१४६ 

राज्य शासन ५,२११ 

पोलिस ६,४६६

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcarकार