शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचा सिडकोला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 04:52 IST

अध्यादेशावर कारवाई नाही : १६ पाडे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

नवी मुंबई : माहिती व तंत्रज्ञानाचे शहर निर्माण करणाऱ्या सिडकोला या भूमीचे आद्य नागरिक असणाºया आदिवासींचा विसर पडला आहे. विकासाच्या नावाखाली एकीकडे सिमेंटची जंगले उभारत असताना, डोंगर-कपाºयात वसलेल्या आदिवासीवाड्या आजही दुर्लक्षित आहेत. विशेष म्हणजे, आदिवासी पाड्यांचे नियोजनबद्ध पुनर्वसन करण्याबाबतचा अध्यादेश काढला होता; परंतु दोन वर्षे उलटली, तरी या संदर्भात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पनवेल तालुक्यातील सिडको हद्दीत जवळपास अडीचशे आदिवासी कुटुंबे व १६ पेक्षा अधिक आदिवासी पाडे आहेत. हे सर्व आदिवासी पाड्यांची जागा शासनाच्या मालकीची आहे, त्यामुळे शासकीय नियमानुसार त्यांचे पुनर्वसन करण्याच्या कामात अनेक अडथळे येत आहेत. त्यांना शासकीय लाभ आणि सुविधा देणे शक्य होत नाही. परिणामी, आदिवासींना अगदी प्रतिकूल परिस्थितीत राहवे लागत आहे. या संदर्भात आदिवासींकडून राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्याची दखल घेत आदिवासींच्या राहत्या घरांची जागा त्यांच्या नावे करून त्यांना त्या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संदर्भात राज्यपालांनी २२ मार्च २०१६ रोजी अध्यादेशही काढला होता. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभागीय कोकण आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे; परंतु पनवेल तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांचा सिडको हद्दीत समावेश आहे, तसेच सिडको हद्दीतील सर्व शासकीय जागा सिडकोकडे वर्ग झाल्या आहेत. त्यामुळे आदिवासींच्या पुनर्वसनाच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत, असे असले तरी सिडकोनेच आदिवासी पाड्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने लावून धरली आहे. आदिवासींचे पुनर्वसन करताना राहत्या घराखालील जमीन मालकी तत्त्वावर करण्याबाबत व घराच्या आजूबाजूची जमीन सार्वजनिक सोयी-सुविधा व वैयक्तिक शौचालये, शाळा बांधण्याकरिता द्यावी, अशी मागणीही संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याकडे करण्यात आली आहे.१० सप्टेंबरला आदिवासी काढणार मोर्चान्याय्य हक्कासाठी आदिवासींचा सिडको व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे; परंतु कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. आदिवासी व त्यांच्या पाड्यांचे नियोजनबद्ध पुनर्वसन करण्याचे आदेश राज्यपालांनी काढले आहेत. या आदेशालाही बगल दिली जात आहे. विभागीय कोकण आयुक्त आणि सिडकोने परस्पर समन्वयातून आदिवासींच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी श्रमजीवी संघटनेची मागणी आहे. दरम्यान, या प्रश्नांवर तातडीने तोडगा निघाला नाही, तर १० सप्टेंबर २०१८ रोजी सिडको आणि कोकण भवन कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको