शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आदिवासींचा सिडकोला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 04:52 IST

अध्यादेशावर कारवाई नाही : १६ पाडे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

नवी मुंबई : माहिती व तंत्रज्ञानाचे शहर निर्माण करणाऱ्या सिडकोला या भूमीचे आद्य नागरिक असणाºया आदिवासींचा विसर पडला आहे. विकासाच्या नावाखाली एकीकडे सिमेंटची जंगले उभारत असताना, डोंगर-कपाºयात वसलेल्या आदिवासीवाड्या आजही दुर्लक्षित आहेत. विशेष म्हणजे, आदिवासी पाड्यांचे नियोजनबद्ध पुनर्वसन करण्याबाबतचा अध्यादेश काढला होता; परंतु दोन वर्षे उलटली, तरी या संदर्भात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पनवेल तालुक्यातील सिडको हद्दीत जवळपास अडीचशे आदिवासी कुटुंबे व १६ पेक्षा अधिक आदिवासी पाडे आहेत. हे सर्व आदिवासी पाड्यांची जागा शासनाच्या मालकीची आहे, त्यामुळे शासकीय नियमानुसार त्यांचे पुनर्वसन करण्याच्या कामात अनेक अडथळे येत आहेत. त्यांना शासकीय लाभ आणि सुविधा देणे शक्य होत नाही. परिणामी, आदिवासींना अगदी प्रतिकूल परिस्थितीत राहवे लागत आहे. या संदर्भात आदिवासींकडून राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्याची दखल घेत आदिवासींच्या राहत्या घरांची जागा त्यांच्या नावे करून त्यांना त्या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संदर्भात राज्यपालांनी २२ मार्च २०१६ रोजी अध्यादेशही काढला होता. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभागीय कोकण आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे; परंतु पनवेल तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांचा सिडको हद्दीत समावेश आहे, तसेच सिडको हद्दीतील सर्व शासकीय जागा सिडकोकडे वर्ग झाल्या आहेत. त्यामुळे आदिवासींच्या पुनर्वसनाच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत, असे असले तरी सिडकोनेच आदिवासी पाड्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने लावून धरली आहे. आदिवासींचे पुनर्वसन करताना राहत्या घराखालील जमीन मालकी तत्त्वावर करण्याबाबत व घराच्या आजूबाजूची जमीन सार्वजनिक सोयी-सुविधा व वैयक्तिक शौचालये, शाळा बांधण्याकरिता द्यावी, अशी मागणीही संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याकडे करण्यात आली आहे.१० सप्टेंबरला आदिवासी काढणार मोर्चान्याय्य हक्कासाठी आदिवासींचा सिडको व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे; परंतु कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. आदिवासी व त्यांच्या पाड्यांचे नियोजनबद्ध पुनर्वसन करण्याचे आदेश राज्यपालांनी काढले आहेत. या आदेशालाही बगल दिली जात आहे. विभागीय कोकण आयुक्त आणि सिडकोने परस्पर समन्वयातून आदिवासींच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी श्रमजीवी संघटनेची मागणी आहे. दरम्यान, या प्रश्नांवर तातडीने तोडगा निघाला नाही, तर १० सप्टेंबर २०१८ रोजी सिडको आणि कोकण भवन कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको