शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

पाण्यासाठी आदिवासींचा हल्लाबोल

By admin | Updated: March 21, 2017 02:16 IST

तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा सर्वांनाच बसू लागल्या आहेत. पनवेल तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली असून आदिवासी वाड्यांना याची अधिक झळ बसत आहे.

मयूर तांबडे / पनवेलतापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा सर्वांनाच बसू लागल्या आहेत. पनवेल तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली असून आदिवासी वाड्यांना याची अधिक झळ बसत आहे.तालुक्यातील नांदगाव येथील जवळपास ५०० लोकसंख्या असलेल्या आदिवासी वाडीला पाण्यावाचून वंचित राहावे लागत असल्याने त्यांनी सोमवारी पंचायत समितीवर मोर्चा काढला होता. त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावात असलेल्या विहिरींची पातळी खाली गेल्याने आदिवासी वाडीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास प्रशासनाला अद्यापही यश आले नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. मार्च महिन्यातच पनवेल तालुक्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून महिलांना, लहान मुलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. डोंगर कपाऱ्यात वसलेल्या गाव-पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. नांदगाव येथील खालची व वरची आदिवासी वाडीतील नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने ‘खायला नको पण पाणी द्या’ अशी अवस्था झाली आहे. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या आदिवासी बांधवांना आता मजुरीबरोबरच पाण्यासाठीही भटकावे लागत आहे. पाणी नसल्यामुळे मजुरीवरही याचा परिणाम होत आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या असल्याने परिसरातील पशू-पक्षीही पाण्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने परिसरातील विहिरीचे पाणी आटले आहे. तालुक्यातील पाणी समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी समन्वयाने नियोजन करून दुर्गम पाडे, वस्त्यांना पाणी कसे देता येईल याचे नियोजन करावे, त्यासाठी आर्थिक तरतूद करावी. नद्यांचे, ओहळाचे पाणी अडवणे, विहिरी, तलाव खोदणे, मोठ्या प्रमाणात बंधारे बांधून पाणी जिरवणे अशा स्वरूपाच्या योजना लक्षात घेऊन त्या राबवण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. मोरबे धरणामध्ये पुरेसा जलसाठा असला तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने राज्यातील अनेक गावे व शहरांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मोरबे धरणामध्ये पुरेसा जलसाठा असल्याने नवी मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही. पण यानंतरही नागरिकांनी भविष्यात पाणी समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी आतापासून पाणीबचत करण्यास सुरवात करावी. पाइपचा वापर करून वाहने धुवू नये. पाण्याचा कुठेही गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. जलबचतीचे महत्त्व लक्षात घेवून नैसर्गिक जलप्रवाह, जलाशय, कालवे व पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करून पाण्याविषयी कायदे व नियमांचे काटेकोर पालन केले जावे. पाणीपुरवठ्याविषयी काहीही तक्रारी असल्यास संकेतस्थळावर व टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर सुधाकर सोनावणे यांनी केले आहे.