शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी आदिवासींचा हल्लाबोल

By admin | Updated: March 21, 2017 02:16 IST

तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा सर्वांनाच बसू लागल्या आहेत. पनवेल तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली असून आदिवासी वाड्यांना याची अधिक झळ बसत आहे.

मयूर तांबडे / पनवेलतापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा सर्वांनाच बसू लागल्या आहेत. पनवेल तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली असून आदिवासी वाड्यांना याची अधिक झळ बसत आहे.तालुक्यातील नांदगाव येथील जवळपास ५०० लोकसंख्या असलेल्या आदिवासी वाडीला पाण्यावाचून वंचित राहावे लागत असल्याने त्यांनी सोमवारी पंचायत समितीवर मोर्चा काढला होता. त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावात असलेल्या विहिरींची पातळी खाली गेल्याने आदिवासी वाडीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास प्रशासनाला अद्यापही यश आले नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. मार्च महिन्यातच पनवेल तालुक्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून महिलांना, लहान मुलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. डोंगर कपाऱ्यात वसलेल्या गाव-पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. नांदगाव येथील खालची व वरची आदिवासी वाडीतील नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने ‘खायला नको पण पाणी द्या’ अशी अवस्था झाली आहे. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या आदिवासी बांधवांना आता मजुरीबरोबरच पाण्यासाठीही भटकावे लागत आहे. पाणी नसल्यामुळे मजुरीवरही याचा परिणाम होत आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या असल्याने परिसरातील पशू-पक्षीही पाण्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने परिसरातील विहिरीचे पाणी आटले आहे. तालुक्यातील पाणी समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी समन्वयाने नियोजन करून दुर्गम पाडे, वस्त्यांना पाणी कसे देता येईल याचे नियोजन करावे, त्यासाठी आर्थिक तरतूद करावी. नद्यांचे, ओहळाचे पाणी अडवणे, विहिरी, तलाव खोदणे, मोठ्या प्रमाणात बंधारे बांधून पाणी जिरवणे अशा स्वरूपाच्या योजना लक्षात घेऊन त्या राबवण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. मोरबे धरणामध्ये पुरेसा जलसाठा असला तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने राज्यातील अनेक गावे व शहरांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मोरबे धरणामध्ये पुरेसा जलसाठा असल्याने नवी मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही. पण यानंतरही नागरिकांनी भविष्यात पाणी समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी आतापासून पाणीबचत करण्यास सुरवात करावी. पाइपचा वापर करून वाहने धुवू नये. पाण्याचा कुठेही गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. जलबचतीचे महत्त्व लक्षात घेवून नैसर्गिक जलप्रवाह, जलाशय, कालवे व पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करून पाण्याविषयी कायदे व नियमांचे काटेकोर पालन केले जावे. पाणीपुरवठ्याविषयी काहीही तक्रारी असल्यास संकेतस्थळावर व टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर सुधाकर सोनावणे यांनी केले आहे.