शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रिक्षाचालकांकडून रेल्वेप्रवाशांची अडवणूक; वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 00:12 IST

आरटीओचे दुर्लक्ष

नवी मुंबई : शहरातील रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारावर रिक्षाचालक प्रवाशांवर अरोरावी करीत असून रस्त्यातच उभ्या असलेल्या रिक्षाचालकांमुळे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघनही होत असून, स्थानकाबाहेरील रस्त्यावर रिक्षा उभ्या करून रस्ता अडवला जात आहे. यामुळे वाहतूककोंडीची समस्याही उद्भवते. या प्रकाराकडे आरटीओचे आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.

२१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबई शहरात शहराला साजेशा रेल्वेस्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. स्थानकाबाहेर वाहन पार्किंग, रिक्षा, टॅक्सी स्टॅण्डचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कामानिमित्त शहरातील आणि शहराबाहेरील हजारो नागरिक रेल्वेने प्रवास करून शहरातील विविध भागात ये-जा करतात. स्थानकांच्या बाहेर बेकायदा रिक्षास्टॅण्डची संख्या वाढली असून, यामुळे रेल्वे प्रवाशांना वाहने पार्किंग करताना विविध अडचणी निर्माण होत आहेत.

नेरुळ, जुईनगर, सानपाडा, तुर्भे आदी रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वाराबाहेरील रस्त्यावर अनेक रिक्षाचालक रिक्षा उभ्या करीत असून, प्रवेशद्वारावर येऊन प्रवाशांना रिक्षाने प्रवास करायचा आहे का, याची विचारणा करीत आहेत. स्थानकाबाहेर उभ्या केल्या जाणाऱ्या रिक्षांमुळे वाहतूककोंडी होत असून, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची वाट अडवली जात असल्याने वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत.

रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. स्थानकाबाहेर रिक्षाचालकांकडून होणाºया अरेरावीमुळे प्रवासी त्रस्त असून, याबाबत कारवाई करण्याची मागणी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडे करण्यात येत आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र