शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पाताळगंगा नदीवरील नव्या पुलावरून वाहतूक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 23:07 IST

रसायनीतील पाताळगंगा पूल हा १९८० ज्या दशकात पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या उदयास आल्यानंतर बांधण्यात आला होता.

रसायनी : रसायनीतील पाताळगंगा पूल हा १९८० ज्या दशकात पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या उदयास आल्यानंतर बांधण्यात आला होता. यामुळे येथील सततच्या अवजड वाहतुकीमुळे पुलावर खड्डे पडून मोठी दुरवस्था झाली होती. यामुळे या पुलावरील ताण कमी करण्यासाठी नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्या नवीन पुलाचे काम आता पूर्ण झाले असून येथून वाहतूक सुरू झाली आहे; तर जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पाताळगंगेवरील पुलामुळे आताचे जुने औद्योगिक क्षेत्र व नदीपलीकडील वडगांव, वाशिवली, लोहोप, बोरीवली, कैरे ही गावे जोडली गेली. सन २०१२-१४ पासून अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात आणखी काही कंपन्या सुरू झाल्या. यामुळेया अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांबरोबरच परिसरात चावणे, सवणे, कासप, कालिवली, जांभिवली, कराडे खुर्द व कराडे बुद्रुक व तीन-चार आदिवासीवाड्या यांना दळणवळणासाठी याच पुलाचा उपयोग होतो.

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे व वाढत्या अवजड वाहतुकीमुळे जुन्या पुलावर ताण येऊ लागला. यामुळे जुन्या पुलावर वारंवार खड्डे पडणे, जोडाच्या ठिकाणी लोखंडी अँगल वर येणे, यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे धोक्याचे ठरत होते; यामुळे कारखानदार आणि वाहनचालक त्रस्त झाले होते. खड्डे भरणे, डांबरीकरण करणे हे होतच होते. त्याबरोबर या पुलावरील ताण कमी करण्यासाठी नव्या पुलाची गरजही निर्माण झाली होती.

रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या या औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीने पराडा कार्नर ते सिद्देश्वरी कार्नरपर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण व चौपदरी काँक्रीटचा रस्ता चार वर्षांपूर्वीच केला आहे.

जुन्या पुलाची डागडुजी

मागील सव्वा वर्षापासून जुन्या पुलाला जोडून नवीन पूल बांधण्याचे काम चालू होते. ते आता पूर्ण झाले आहे. त्यावरून वाहतूकही सुरू झाली आहे. त्यामुळे आता जुन्या पुलाच्या डागडुजीचे काम सुरू झाले आहे. यामुळे वाहनचालक व संबंधित गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

टॅग्स :riverनदीNavi Mumbaiनवी मुंबई