शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

पाताळगंगा नदीवरील नव्या पुलावरून वाहतूक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 23:07 IST

रसायनीतील पाताळगंगा पूल हा १९८० ज्या दशकात पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या उदयास आल्यानंतर बांधण्यात आला होता.

रसायनी : रसायनीतील पाताळगंगा पूल हा १९८० ज्या दशकात पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या उदयास आल्यानंतर बांधण्यात आला होता. यामुळे येथील सततच्या अवजड वाहतुकीमुळे पुलावर खड्डे पडून मोठी दुरवस्था झाली होती. यामुळे या पुलावरील ताण कमी करण्यासाठी नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्या नवीन पुलाचे काम आता पूर्ण झाले असून येथून वाहतूक सुरू झाली आहे; तर जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पाताळगंगेवरील पुलामुळे आताचे जुने औद्योगिक क्षेत्र व नदीपलीकडील वडगांव, वाशिवली, लोहोप, बोरीवली, कैरे ही गावे जोडली गेली. सन २०१२-१४ पासून अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात आणखी काही कंपन्या सुरू झाल्या. यामुळेया अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांबरोबरच परिसरात चावणे, सवणे, कासप, कालिवली, जांभिवली, कराडे खुर्द व कराडे बुद्रुक व तीन-चार आदिवासीवाड्या यांना दळणवळणासाठी याच पुलाचा उपयोग होतो.

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे व वाढत्या अवजड वाहतुकीमुळे जुन्या पुलावर ताण येऊ लागला. यामुळे जुन्या पुलावर वारंवार खड्डे पडणे, जोडाच्या ठिकाणी लोखंडी अँगल वर येणे, यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे धोक्याचे ठरत होते; यामुळे कारखानदार आणि वाहनचालक त्रस्त झाले होते. खड्डे भरणे, डांबरीकरण करणे हे होतच होते. त्याबरोबर या पुलावरील ताण कमी करण्यासाठी नव्या पुलाची गरजही निर्माण झाली होती.

रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या या औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीने पराडा कार्नर ते सिद्देश्वरी कार्नरपर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण व चौपदरी काँक्रीटचा रस्ता चार वर्षांपूर्वीच केला आहे.

जुन्या पुलाची डागडुजी

मागील सव्वा वर्षापासून जुन्या पुलाला जोडून नवीन पूल बांधण्याचे काम चालू होते. ते आता पूर्ण झाले आहे. त्यावरून वाहतूकही सुरू झाली आहे. त्यामुळे आता जुन्या पुलाच्या डागडुजीचे काम सुरू झाले आहे. यामुळे वाहनचालक व संबंधित गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

टॅग्स :riverनदीNavi Mumbaiनवी मुंबई