शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पाताळगंगा नदीवरील नव्या पुलावरून वाहतूक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 23:07 IST

रसायनीतील पाताळगंगा पूल हा १९८० ज्या दशकात पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या उदयास आल्यानंतर बांधण्यात आला होता.

रसायनी : रसायनीतील पाताळगंगा पूल हा १९८० ज्या दशकात पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या उदयास आल्यानंतर बांधण्यात आला होता. यामुळे येथील सततच्या अवजड वाहतुकीमुळे पुलावर खड्डे पडून मोठी दुरवस्था झाली होती. यामुळे या पुलावरील ताण कमी करण्यासाठी नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्या नवीन पुलाचे काम आता पूर्ण झाले असून येथून वाहतूक सुरू झाली आहे; तर जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पाताळगंगेवरील पुलामुळे आताचे जुने औद्योगिक क्षेत्र व नदीपलीकडील वडगांव, वाशिवली, लोहोप, बोरीवली, कैरे ही गावे जोडली गेली. सन २०१२-१४ पासून अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात आणखी काही कंपन्या सुरू झाल्या. यामुळेया अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांबरोबरच परिसरात चावणे, सवणे, कासप, कालिवली, जांभिवली, कराडे खुर्द व कराडे बुद्रुक व तीन-चार आदिवासीवाड्या यांना दळणवळणासाठी याच पुलाचा उपयोग होतो.

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे व वाढत्या अवजड वाहतुकीमुळे जुन्या पुलावर ताण येऊ लागला. यामुळे जुन्या पुलावर वारंवार खड्डे पडणे, जोडाच्या ठिकाणी लोखंडी अँगल वर येणे, यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे धोक्याचे ठरत होते; यामुळे कारखानदार आणि वाहनचालक त्रस्त झाले होते. खड्डे भरणे, डांबरीकरण करणे हे होतच होते. त्याबरोबर या पुलावरील ताण कमी करण्यासाठी नव्या पुलाची गरजही निर्माण झाली होती.

रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या या औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीने पराडा कार्नर ते सिद्देश्वरी कार्नरपर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण व चौपदरी काँक्रीटचा रस्ता चार वर्षांपूर्वीच केला आहे.

जुन्या पुलाची डागडुजी

मागील सव्वा वर्षापासून जुन्या पुलाला जोडून नवीन पूल बांधण्याचे काम चालू होते. ते आता पूर्ण झाले आहे. त्यावरून वाहतूकही सुरू झाली आहे. त्यामुळे आता जुन्या पुलाच्या डागडुजीचे काम सुरू झाले आहे. यामुळे वाहनचालक व संबंधित गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

टॅग्स :riverनदीNavi Mumbaiनवी मुंबई