शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईसह रायगडमधील वाहतूकदारांचा संप, गुरु वारपासून आंदोलनाची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 03:12 IST

जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.

नवी मुंबई - जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी, वाहतूकदार त्रस्त झाले आहेत. तसेच मालवाहू वाहनांना मुख्य मार्गावर प्रवेश बंदी, नो एंट्री, दंडात्मक कारवाई होत असल्याने वाहतूकदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नवी मुंबई व रायगडमधील वाहतूक संघटना एकत्र आल्या असून, अन्यायकारक प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी गुरु वार, ३ आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नवी मुंबई येथील जेएनपीटी बंदरावरून मालाची वाहतूक करण्यासाठी राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागातून जड-अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. जेएनपीटी बंदराकडे जाणाºया रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी सारख्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहेत. वाहतूकदारांना उद्भवणाºया विविध अडचणींवर तोडगा काढण्यासाठी सानपाडा येथील केमिस्ट भवन येथे नवी मुंबई आणि रायगडमधील वाहतूकदारांची बैठक पार पडली. या बैठकीत सुविधा उपलब्ध होणार नाहीत, तोपर्यंत वाहने रस्त्यावर न काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रमुख मागण्यांमध्ये प्रामुख्याने वाहतूककोंडी कमी करण्याकरिता रस्त्यांची दुरु स्ती तसेच सर्व्हिस रोडची कामे पूर्ण करून तो मार्ग स्थानिक व प्रवासी वाहने यांना उपलब्ध करून द्यावा. जेएनपीटीपासून १०० किलोमीटर अंतरापर्यंत सर्व रस्ते सुव्यवस्थित दर्जेदार असावेत. शिळफाटा-महापे, जेएनपीटी परिसरात लावण्यात आलेली प्रवेशबंदी काढून रस्ते पूर्ववत करण्यात यावेत. जेएनपीटी परिसरातील राज्य महामार्ग क्र ५४, राष्ट्रीय महामार्ग ४ बी, गव्हाण-दिघोडे या तिन्ही रस्त्यांना आपापसात जोडणारे जोडरस्ते चांगले असावेत. न्हावा-शेवा पोर्ट परिसरातील सीएफएस व एमटी कंटेनर यार्ड यांच्याकडे स्वत:ची पार्किंग नसल्याने होणारी कारवाई वाहतूकदारांवर न करता संबंधितांवर करावी. संबंधित यार्डला पार्किंग उपलब्ध करून देण्याची ताकीद देण्यात यावी. जेएनपीटी प्रशासनाने त्यांच्या परिसरामध्ये वाहनांस विनाशुल्क पार्किंगसाठी प्लॉट उपलब्ध करून वाहतूकतळ निर्माण करावेत.मागण्यांसाठी एकवटले वाहतूकदारई-चलानमध्ये पारदर्शकता आणून त्यानंतरच कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या असल्याचे महाराष्ट्र मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष भरत पोखरकर यांनी सांगितले.या मागण्यांसाठी सर्व वाहतूकदार एकवटले असून संबंधित प्रशासनाला निवेदने देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.या सर्व मागण्यांबाबत काही कारवाई न झाल्यास ३ आॅक्टोबरपासून आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई