शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

नवी मुंबईसह रायगडमधील वाहतूकदारांचा संप, गुरु वारपासून आंदोलनाची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 03:12 IST

जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.

नवी मुंबई - जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी, वाहतूकदार त्रस्त झाले आहेत. तसेच मालवाहू वाहनांना मुख्य मार्गावर प्रवेश बंदी, नो एंट्री, दंडात्मक कारवाई होत असल्याने वाहतूकदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नवी मुंबई व रायगडमधील वाहतूक संघटना एकत्र आल्या असून, अन्यायकारक प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी गुरु वार, ३ आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नवी मुंबई येथील जेएनपीटी बंदरावरून मालाची वाहतूक करण्यासाठी राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागातून जड-अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. जेएनपीटी बंदराकडे जाणाºया रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी सारख्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहेत. वाहतूकदारांना उद्भवणाºया विविध अडचणींवर तोडगा काढण्यासाठी सानपाडा येथील केमिस्ट भवन येथे नवी मुंबई आणि रायगडमधील वाहतूकदारांची बैठक पार पडली. या बैठकीत सुविधा उपलब्ध होणार नाहीत, तोपर्यंत वाहने रस्त्यावर न काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रमुख मागण्यांमध्ये प्रामुख्याने वाहतूककोंडी कमी करण्याकरिता रस्त्यांची दुरु स्ती तसेच सर्व्हिस रोडची कामे पूर्ण करून तो मार्ग स्थानिक व प्रवासी वाहने यांना उपलब्ध करून द्यावा. जेएनपीटीपासून १०० किलोमीटर अंतरापर्यंत सर्व रस्ते सुव्यवस्थित दर्जेदार असावेत. शिळफाटा-महापे, जेएनपीटी परिसरात लावण्यात आलेली प्रवेशबंदी काढून रस्ते पूर्ववत करण्यात यावेत. जेएनपीटी परिसरातील राज्य महामार्ग क्र ५४, राष्ट्रीय महामार्ग ४ बी, गव्हाण-दिघोडे या तिन्ही रस्त्यांना आपापसात जोडणारे जोडरस्ते चांगले असावेत. न्हावा-शेवा पोर्ट परिसरातील सीएफएस व एमटी कंटेनर यार्ड यांच्याकडे स्वत:ची पार्किंग नसल्याने होणारी कारवाई वाहतूकदारांवर न करता संबंधितांवर करावी. संबंधित यार्डला पार्किंग उपलब्ध करून देण्याची ताकीद देण्यात यावी. जेएनपीटी प्रशासनाने त्यांच्या परिसरामध्ये वाहनांस विनाशुल्क पार्किंगसाठी प्लॉट उपलब्ध करून वाहतूकतळ निर्माण करावेत.मागण्यांसाठी एकवटले वाहतूकदारई-चलानमध्ये पारदर्शकता आणून त्यानंतरच कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या असल्याचे महाराष्ट्र मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष भरत पोखरकर यांनी सांगितले.या मागण्यांसाठी सर्व वाहतूकदार एकवटले असून संबंधित प्रशासनाला निवेदने देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.या सर्व मागण्यांबाबत काही कारवाई न झाल्यास ३ आॅक्टोबरपासून आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई