शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

शहर तहानलेले, नेते प्रचारात व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 23:57 IST

पनवेल शहरातील पाणीसमस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे.

वैभव गायकरपनवेल : पनवेल शहरातील पाणीसमस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. शहरातील अनेक भागांत महापालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून तोही अपुरा असल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरू आहेत.दोन महिन्यांपूर्वी पाणीटंचाईविरोधात शिवसेनेने महापालिकेतील सत्ताधारी भाजपविरोधात मोर्चा काढत जोरदार टीका केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने मोर्चा काढणारी सेनाच या विषयावर चिडीचूप असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.देहरंग धरणाने तळ गाठल्याने महापालिकेला इतर प्राधिकरणांच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा करावा लागणार आहे. महापालिकेचे मुख्यालय असलेल्या पनवेल शहराला सर्वात अपुऱ्या पाण्याचा फटका बसला आहे. सत्ताधारी भाजपविरोधात फेब्रुवारी महिन्यात हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत सत्ताधाऱ्यांवर गंभीर टीका करणारे सेनेचे पदाधिकारीही सध्या या विषयावर बोलण्याचे टाळत आहेत. या मोर्चात मावळचे विद्यमान खासदार व लोकसभेचे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हेदेखील सहभागी झाले होते. काही दिवसांचा अल्टिमेटम देऊन सेनेने मोर्चा माघारी घेतला होता. मात्र, दोन महिन्यांत शहरातील पाण्याची समस्या सुटलेली नाही. मात्र, निवडणुकीचा मोहोल असल्याने सर्वपक्षीय नेते या प्रश्नांवर गप्प आहेत.पाणीप्रश्नावर आवाज उठवणारे सेनेचे पदाधिकारी भाजपशी युती झाल्याने प्रचाराकरिता एकत्र फिरत आहेत. सध्या शहराला २७ एमएलडी पाण्याची आवश्यकता असून, शहराची तहान केवळ ११ एमएलडी पाण्यावर भागवली जात आहे. खारघर, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, शहरातील ग्रामीण भागातही हीच अवस्था आहे.महापालिकेतील विरोधी पक्षात असलेला शेकापही आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात गुंतला आहे. शहरातील पाणीसमस्येकडे लक्ष देण्यास लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याचा फायदा परिसरातील टँकरमाफिया घेताना दिसतात. महापालिकेच्या टँकर धोरणाकडे दुर्लक्ष करीत मनमर्जीप्रमाणे वाटेल त्या किमतीत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. महापालिकेने ठरविलेल्या टँकर धोरणानुसार, पालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाºया टँकरवर पनवेल महानगरपालिकेचे नाव ठळकपणे लिहिलेले असावे. मात्र, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. धोरणानुसार ठरवलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम नागरिकांकडून आकारली जात आहे.>शहरातील पाणीप्रश्नाचा खासदारांना विसरदेहरंग धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणीसाठा कमी झाला आहे. हा गाळ काढल्यास धरणातील साठवणूक क्षमता वाढेल. रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका असूनही गेल्या पाच वर्षांपासून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी एकदाही धरणाची पाहणी केलेली नाही. या संदर्भात विशेष पाठपुरावाही करण्यात आलेला नाही. महापालिकेत समस्यांची तक्र ार करण्यास गेल्यावर पालिका अधिकाºयांकडून इलेक्शन ड्युटी असल्याचे एकच उत्तर सध्या ऐकायला मिळत आहे.>आश्वासनांवर बोळवणपाणीपट्टी वेळेवर भरूनदेखील शहरात तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे.शहरातील समस्यांवर तोडगा निघत नसल्याने कफनगरमधील रहिवासी मतदानावर बहिष्काराच्या तयारीत असल्याची माहिती सिटिझन युनिटी फोरमचे सदस्य अरु ण भिसे यांनी दिली. कफनगरमध्ये एकूण ३२ सोसायट्या असून, ६०० पेक्षा जास्त लोकवस्ती आहे.