शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

महापेतील तीन कंपन्या जळून खाक; सात तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:24 IST

महापे एमआयडीसी येथील पॅथोपॅक कंपनीला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. ही आग लगतच्या दोन कंपन्यांमध्येही पसरल्याने तीनही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत.

नवी मुंबई : महापे एमआयडीसी येथील पॅथोपॅक कंपनीला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. ही आग लगतच्या दोन कंपन्यांमध्येही पसरल्याने तीनही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. कंपन्यांमधील पुठ्ठे व केमिकलने पेट घेतल्याने सुमारे सात तासांनंतर ती आटोक्यात आली.ऐरोली येथील एमएसईबीच्या सबस्टेशनला लागलेल्या आगीनंतर शनिवारी पहाटे शहरात आगीची दुसरी घटना घडली. यामध्ये महापे एमआयडीसीमधील तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. पॅथोपॅक, मालविका व मॅच्युटॅक अशी तीन कंपन्यांची नावे आहेत. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सुरुवातीला पॅथोपॅक कंपनीत आग लागली. या वेळी कंपनीतील कामगारांनी बाहेर पळ काढून स्वत:ला सुरक्षित करून घेतले; परंतु कंपनीतील कागदी पुठ्ठ्यांनी पेट घेतल्याने काही वेळातच आगीची तीव्रता वाढली. त्यामुळे ही आग लगतच्याच मालविका या कापड कंपनीपर्यंत पसरली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवाण्नांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याच्या कामाला सुरुवात केली; परंतु आग आटोक्यात येत नसल्याने त्यांच्या मदतीला महापालिका, सिडको, रिलायन्स यांचे अग्निशमन दलाचे बंदही घटनास्थळी दाखल होते. त्यांच्याकडून सुरू असलेल्या अथक प्रयत्नानंतर सुमारे सात तासांनंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत तीन कंपन्या जळून पूर्णपणे खाक झाल्याने कोट्यावधीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे; परंतु कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे अग्निशमन अधिकारी आर. बी. पाटील यांनी सांगितले. शिवाय, आगीचे कारणही अद्याप कळू शकले नसून, त्याच्या कारणांचा शोध घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले. आगीच्या या घटनेमुळे परिसरातील इतर कंपन्यांनाही धोका निर्माण झाला होता. औद्योगिक क्षेत्रातील सर्वच कंपन्या एकमेकांना लागून असल्याने एका कंपनीला आग लागल्यास ती शेजारच्या कंपनीपर्यंत पसरते. या दुर्घटनेतही आगीच्या ठिणग्या शेजारच्या कंपनीवर पडल्याने इतर दोन कंपन्यांपर्यंत आग पसरली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई