शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

नेरुळ एमआयडीसीत तीन कंपन्यांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:28 PM

शॉर्टसर्किटमुळे घडली घटना : अर्ध्या तासानंतर कळवली अग्निशमनला माहिती

नवी मुंबई : नेरुळ एमआयडीसीमधील दोन कंपन्यांना आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. यामध्ये कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, आग लागल्यानंतर अर्ध्या तासाने प्रत्यक्षदर्शीने अग्निशमन विभागाला कळवल्यानंतर बंब घटनास्थळी दाखल झाले.

मायक्रो पॅन फार्मासी या कंपनीत सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. सुरुवातीला कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आग आटोक्यात न आल्याने ती बाजूच्या इंडियाना कंपनीतही पसरली. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने एमआयडीसी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार काही वेळात अग्निशमन दलाचे बंब त्या ठिकाणी दाखल झाले, तोपर्यंत ही आग इतर तीन कंपन्या व एका गॅरेजपर्यंत पसरली होती. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. अन्यथा परिसरातील इतरही काही कंपन्या जळाल्या असत्या.

आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाने कंपनीच्या संबंधितांकडे चौकशी केली. त्या वेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी १०१ क्रमांकावर संपर्क साधल्याचे सांगितले. मात्र, संबंधित हेल्पलाइनकडे एमआयडीच्या अग्निशमन दलाचा संपर्काचा नंबर नसल्याने वेळेवर आगीची माहिती मिळू शकली नसल्याचे अग्निशमन अधिकारी सुरेश बोल्हार यांनी सांगितले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तिथे सहा बंब दाखल झाले होते. त्यांच्या दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आग लागताच कंपनीच्या कर्मचाºयांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने कोणाला दुखापत झाली नसल्याचेही बोल्हार यांनी सांगितले.