शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅपरेशन मुस्कान’मुळे तिघांना कुटुंब गवसले

By admin | Updated: July 24, 2015 02:57 IST

हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी राबवल्या जात असलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’मुळे तीन मुलांना कुटुंब मिळाले आहे, तर पाच बेवारस मुलांची

नवी मुंबई : हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी राबवल्या जात असलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’मुळे तीन मुलांना कुटुंब मिळाले आहे, तर पाच बेवारस मुलांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. त्यामध्ये आईच्या त्रासाला कंटाळून पळालेल्या मुलाचाही पोलिसांनी शोध घेतला आहे.‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने आजवर १८ मुलांचा शोध घेतला आहे. हरवलेल्या अथवा कुटुंबापासून दूर पळून गेलेल्या अल्पवयीन मुलांचा त्यात समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी पळालेल्या एका १५ वर्षीय मुलाला पोलिसांनी परत घरी आणले आहे. रबाळे येथे राहणारा श्याम चहार (१५) हा आईच्या वागण्यामुळे त्रस्त होता. आई मद्यपान करून शिवीगाळ करत असल्याचा मनस्ताप त्याला होत होता. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तो घर सोडून पळाला होता. त्यानंतर तो खारघर, पनवेल या ठिकाणी मिळेल ते काम करून स्वत:च्या गरजा भागवू लागला. तो उस्मानाबाद येथे मामाच्या गावीदेखील राहून आला. परंतु घरी जातो असे सांगून मुंबईला येऊनही तो आईकडे परत जात नव्हता. अखेर सोमवारी तो रबाळे एमआयडीसी पोलीस व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची संयुक्त मोहीम सुरू असताना रबाळे स्टेशनलगत आढळला. ओळख पटताच त्याला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. तसेच व्यसनाच्या आहारी गेलेल्या त्याच्या आईला देखील पोलिसांनी समज दिली.रबाळे येथूनच पाच वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचाही शोध लागला आहे. मोहमद चांद सोहेल खान (७) हा दोन वर्षांचा असताना हरवला होता. त्याच्यासारखाच मुलगा भिवंडी बालसुधारगृहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे यांच्या पथकाने त्याचे आई - वडील उम्मतुलनिसार खान व सोहेल खान यांनाही त्याची माहिती सांगितली. त्यांनी बालसुधारगृहात जाऊन मोहमद खानची चौकशी केली असता त्याची ओळख पटली. त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.