शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

साडेतीन हजार मुक्या जिवांना जीवनदान

By admin | Updated: September 27, 2015 00:20 IST

वाढत्या शहरीकरणामुळे इमारतींची संख्या वाढत आहेत आणि पशुपक्ष्यांच्या राहण्याची जागा नागरिकांनी घेतल्याने या पक्ष्यांना मात्र आसरा न मिळाल्याने शहराचा इमारतींवर आसरा घ्यावा लागतो

प्राची सोनवणे, नवी मुंबईवाढत्या शहरीकरणामुळे इमारतींची संख्या वाढत आहेत आणि पशुपक्ष्यांच्या राहण्याची जागा नागरिकांनी घेतल्याने या पक्ष्यांना मात्र आसरा न मिळाल्याने शहराचा इमारतींवर आसरा घ्यावा लागतो. वाशी परिसरातील भुमी जीवदया संवर्धन संस्थेच्या वतीने शहरातील मुक्या जीवांवर मोफत उपचार करुन त्यांना मायेचा आसरा दिला आहे. या वर्षभरात या संस्थेच्या वतीने साडेतीन हजार मुक्याजीवांचे प्राण वाचविण्यात आले आहे. नवी मुंबई परिसरातील कुठेही एखादा जखमी पक्षी, प्राणी आढळल्यास या संस्थेचे स्वयंसेवक स्वत: जाऊन त्या मुक्या जीवावर मोफत उपचार करतात, त्याला पुर्णत: बरे होईपर्यंत त्याच्यावर देखरेख ठेवण्यात येते. नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते असे असताना वाढते प्रदुषण, मानवी वस्तींसाठी होणारी झाडांची कत्तल अशा अनेक कारणांमुळे मुक्या प्राण्याचा बळी जात असल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. या सर्व घटनांचे गांभीर्य ठेवून वाशी परिसरात राहणारा सागर सावला या तरुणाने मुक्या जीवांच्या रक्षणासाठी भुमी जीवदया ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. राघवजी वाघजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली २७ जुलै २०१४ रोजी भुमी जीवदया संवर्धन संस्थेची स्थापना करण्यात आली. या वर्षभराच्या कालावधीत सरपटणारे प्राणी, गाय, बैल, म्हैस तसेच विविध प्रकारच्या पक्ष्यांवर उपचार करुन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहे. वाशीतील लहानश्या खोलीत सुरु केलेल्या या संस्थेचा पुढे विस्तार करावयाचा असून यासाठी या संस्थेला मदतीची अपेक्षा आहे अशी माहिती सागर सावला यांनी दिली. या संस्थेत कार्यरत असलेले धवल देढीया, सचिन धरोड तसेच हित देढीया ही रात्रंदिवस शहरातील मुक्या जीवांच्या उपचाराकरिता मेहनत घेत असतात.