शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

साडेतीन हजार मुक्या जिवांना जीवनदान

By admin | Updated: September 27, 2015 00:20 IST

वाढत्या शहरीकरणामुळे इमारतींची संख्या वाढत आहेत आणि पशुपक्ष्यांच्या राहण्याची जागा नागरिकांनी घेतल्याने या पक्ष्यांना मात्र आसरा न मिळाल्याने शहराचा इमारतींवर आसरा घ्यावा लागतो

प्राची सोनवणे, नवी मुंबईवाढत्या शहरीकरणामुळे इमारतींची संख्या वाढत आहेत आणि पशुपक्ष्यांच्या राहण्याची जागा नागरिकांनी घेतल्याने या पक्ष्यांना मात्र आसरा न मिळाल्याने शहराचा इमारतींवर आसरा घ्यावा लागतो. वाशी परिसरातील भुमी जीवदया संवर्धन संस्थेच्या वतीने शहरातील मुक्या जीवांवर मोफत उपचार करुन त्यांना मायेचा आसरा दिला आहे. या वर्षभरात या संस्थेच्या वतीने साडेतीन हजार मुक्याजीवांचे प्राण वाचविण्यात आले आहे. नवी मुंबई परिसरातील कुठेही एखादा जखमी पक्षी, प्राणी आढळल्यास या संस्थेचे स्वयंसेवक स्वत: जाऊन त्या मुक्या जीवावर मोफत उपचार करतात, त्याला पुर्णत: बरे होईपर्यंत त्याच्यावर देखरेख ठेवण्यात येते. नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते असे असताना वाढते प्रदुषण, मानवी वस्तींसाठी होणारी झाडांची कत्तल अशा अनेक कारणांमुळे मुक्या प्राण्याचा बळी जात असल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. या सर्व घटनांचे गांभीर्य ठेवून वाशी परिसरात राहणारा सागर सावला या तरुणाने मुक्या जीवांच्या रक्षणासाठी भुमी जीवदया ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. राघवजी वाघजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली २७ जुलै २०१४ रोजी भुमी जीवदया संवर्धन संस्थेची स्थापना करण्यात आली. या वर्षभराच्या कालावधीत सरपटणारे प्राणी, गाय, बैल, म्हैस तसेच विविध प्रकारच्या पक्ष्यांवर उपचार करुन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहे. वाशीतील लहानश्या खोलीत सुरु केलेल्या या संस्थेचा पुढे विस्तार करावयाचा असून यासाठी या संस्थेला मदतीची अपेक्षा आहे अशी माहिती सागर सावला यांनी दिली. या संस्थेत कार्यरत असलेले धवल देढीया, सचिन धरोड तसेच हित देढीया ही रात्रंदिवस शहरातील मुक्या जीवांच्या उपचाराकरिता मेहनत घेत असतात.