शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

‘त्या’ स्थलांतरित गावांतील मतदारांत मतदान केंद्रावरून संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 23:43 IST

स्थलांतर झालेल्या ग्रामस्थांकडून मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे. अधिकाधिक लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांचा प्रचार रंगात आला आहे. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रमुख उमेदवारांची कसरत सुरू आहे; परंतु मावळ मतदार संघातील विमानतळ प्रकल्पामुळे स्थलांतरित झालेल्या त्या दहा गावांतील ग्रामस्थांत मतदान केंद्रावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडूनही आतापर्यंत स्पष्ट सूचना न आल्याने सुमारे २० हजार मतदारांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकसभेच्या मावळ मतदार संघात शेवटच्या टप्प्यात म्हणजेच २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदार संघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यात खरी लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. दहा गावे स्थलांतरित झाल्याने येथील पारंपरिक मतदारांचा शोध घेण्याचे प्रयास दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून केले जात आहेत. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे बाधित झालेल्या दहा गावांचे करंजाडे, वडघर, उलवे आणि प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. दहा गावांतील जवळपास ३००० कुटुंबे यामुळे विस्थापित झाली आहेत. पूर्वी गावातच मतदान केंद्र असायचे, त्यामुळे मतदानासाठी फार दूर जायची गरज नसायची. मात्र, या वेळी अख्खी गावेच स्थलांतर झाली आहेत. सिडकोने या गावांसाठी उलवे आणि करजांडे येथे दोन शाळा बांधल्या आहेत. या शाळांत मतदान केंद्र असेल, असे आडाखे ग्रामस्थांकडून बांधले जात आहेत; परंतु याबाबत अद्यापि कोणतीही स्पष्टता नसल्याने ग्रामस्थांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या स्थलांतरित मतदारांसाठी अद्यापि मतदान केंद्रप्रमुखांचीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नक्की मतदान कुठे करायचे, असा प्रश्न येथील २० हजार मतदारांना पडला आहे.

स्थलांतर झालेल्या ग्रामस्थांकडून मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे. अधिकाधिक लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. विशेष म्हणजे, या गावांतील काही कुटुंबांच्या स्थलांतराची प्रक्रिया आजही सुरू आहे. मतदारयादीत मतदारांचा जुनाच पत्ता असणार आहे. त्यामुळे नवीन पत्त्यावरील मतदारांना त्यांचा मतदान क्रमांक देण्याबाबतही अद्यापि कोणतीही कार्यवाही सुरू असल्याचे दिसत नाही. या परिस्थितीमुळे स्थलांतरित गावांतील सुमारे २० हजार मतदारांत मतदान प्रक्रियेवरून गोंधळाचे वातावरण आहे. स्थलांतरित झालेल्या दहा गावांत आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या शेकापचा प्रभाव आहे. त्याचप्रमाणे मागील काही वर्षात या गावात भाजपनेसुद्धा आपली पाळेमुळे रोवली आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावरून निर्माण झालेल्या गोंधळाचा फटका राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यासह सेनेचे श्रीरंग बारणे यांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :maval-pcमावळNavi Mumbaiनवी मुंबईLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक