शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

‘त्या’ स्थलांतरित गावांतील मतदारांत मतदान केंद्रावरून संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 23:43 IST

स्थलांतर झालेल्या ग्रामस्थांकडून मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे. अधिकाधिक लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांचा प्रचार रंगात आला आहे. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रमुख उमेदवारांची कसरत सुरू आहे; परंतु मावळ मतदार संघातील विमानतळ प्रकल्पामुळे स्थलांतरित झालेल्या त्या दहा गावांतील ग्रामस्थांत मतदान केंद्रावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडूनही आतापर्यंत स्पष्ट सूचना न आल्याने सुमारे २० हजार मतदारांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकसभेच्या मावळ मतदार संघात शेवटच्या टप्प्यात म्हणजेच २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदार संघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यात खरी लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. दहा गावे स्थलांतरित झाल्याने येथील पारंपरिक मतदारांचा शोध घेण्याचे प्रयास दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून केले जात आहेत. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे बाधित झालेल्या दहा गावांचे करंजाडे, वडघर, उलवे आणि प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. दहा गावांतील जवळपास ३००० कुटुंबे यामुळे विस्थापित झाली आहेत. पूर्वी गावातच मतदान केंद्र असायचे, त्यामुळे मतदानासाठी फार दूर जायची गरज नसायची. मात्र, या वेळी अख्खी गावेच स्थलांतर झाली आहेत. सिडकोने या गावांसाठी उलवे आणि करजांडे येथे दोन शाळा बांधल्या आहेत. या शाळांत मतदान केंद्र असेल, असे आडाखे ग्रामस्थांकडून बांधले जात आहेत; परंतु याबाबत अद्यापि कोणतीही स्पष्टता नसल्याने ग्रामस्थांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या स्थलांतरित मतदारांसाठी अद्यापि मतदान केंद्रप्रमुखांचीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नक्की मतदान कुठे करायचे, असा प्रश्न येथील २० हजार मतदारांना पडला आहे.

स्थलांतर झालेल्या ग्रामस्थांकडून मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे. अधिकाधिक लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. विशेष म्हणजे, या गावांतील काही कुटुंबांच्या स्थलांतराची प्रक्रिया आजही सुरू आहे. मतदारयादीत मतदारांचा जुनाच पत्ता असणार आहे. त्यामुळे नवीन पत्त्यावरील मतदारांना त्यांचा मतदान क्रमांक देण्याबाबतही अद्यापि कोणतीही कार्यवाही सुरू असल्याचे दिसत नाही. या परिस्थितीमुळे स्थलांतरित गावांतील सुमारे २० हजार मतदारांत मतदान प्रक्रियेवरून गोंधळाचे वातावरण आहे. स्थलांतरित झालेल्या दहा गावांत आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या शेकापचा प्रभाव आहे. त्याचप्रमाणे मागील काही वर्षात या गावात भाजपनेसुद्धा आपली पाळेमुळे रोवली आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावरून निर्माण झालेल्या गोंधळाचा फटका राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यासह सेनेचे श्रीरंग बारणे यांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :maval-pcमावळNavi Mumbaiनवी मुंबईLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक