शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘त्या’ स्थलांतरित गावांतील मतदारांत मतदान केंद्रावरून संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 23:43 IST

स्थलांतर झालेल्या ग्रामस्थांकडून मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे. अधिकाधिक लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांचा प्रचार रंगात आला आहे. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रमुख उमेदवारांची कसरत सुरू आहे; परंतु मावळ मतदार संघातील विमानतळ प्रकल्पामुळे स्थलांतरित झालेल्या त्या दहा गावांतील ग्रामस्थांत मतदान केंद्रावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडूनही आतापर्यंत स्पष्ट सूचना न आल्याने सुमारे २० हजार मतदारांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकसभेच्या मावळ मतदार संघात शेवटच्या टप्प्यात म्हणजेच २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदार संघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यात खरी लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. दहा गावे स्थलांतरित झाल्याने येथील पारंपरिक मतदारांचा शोध घेण्याचे प्रयास दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून केले जात आहेत. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे बाधित झालेल्या दहा गावांचे करंजाडे, वडघर, उलवे आणि प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. दहा गावांतील जवळपास ३००० कुटुंबे यामुळे विस्थापित झाली आहेत. पूर्वी गावातच मतदान केंद्र असायचे, त्यामुळे मतदानासाठी फार दूर जायची गरज नसायची. मात्र, या वेळी अख्खी गावेच स्थलांतर झाली आहेत. सिडकोने या गावांसाठी उलवे आणि करजांडे येथे दोन शाळा बांधल्या आहेत. या शाळांत मतदान केंद्र असेल, असे आडाखे ग्रामस्थांकडून बांधले जात आहेत; परंतु याबाबत अद्यापि कोणतीही स्पष्टता नसल्याने ग्रामस्थांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या स्थलांतरित मतदारांसाठी अद्यापि मतदान केंद्रप्रमुखांचीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नक्की मतदान कुठे करायचे, असा प्रश्न येथील २० हजार मतदारांना पडला आहे.

स्थलांतर झालेल्या ग्रामस्थांकडून मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे. अधिकाधिक लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. विशेष म्हणजे, या गावांतील काही कुटुंबांच्या स्थलांतराची प्रक्रिया आजही सुरू आहे. मतदारयादीत मतदारांचा जुनाच पत्ता असणार आहे. त्यामुळे नवीन पत्त्यावरील मतदारांना त्यांचा मतदान क्रमांक देण्याबाबतही अद्यापि कोणतीही कार्यवाही सुरू असल्याचे दिसत नाही. या परिस्थितीमुळे स्थलांतरित गावांतील सुमारे २० हजार मतदारांत मतदान प्रक्रियेवरून गोंधळाचे वातावरण आहे. स्थलांतरित झालेल्या दहा गावांत आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या शेकापचा प्रभाव आहे. त्याचप्रमाणे मागील काही वर्षात या गावात भाजपनेसुद्धा आपली पाळेमुळे रोवली आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावरून निर्माण झालेल्या गोंधळाचा फटका राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यासह सेनेचे श्रीरंग बारणे यांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :maval-pcमावळNavi Mumbaiनवी मुंबईLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक