शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

दिवाळीमध्ये शहरात आगीच्या १५ घटना, अग्निशमन दलावरील ताण वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 02:46 IST

दिवाळीच्या चार दिवसांमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये आग लागल्याच्या तब्बल १५ घटना घडल्या आहेत. उद्योजकांसह किरकोळ दुकानदार व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अग्निशमनविषयी उपाययोजना फक्त नावालाच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

नवी मुंबई : दिवाळीच्या चार दिवसांमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये आग लागल्याच्या तब्बल १५ घटना घडल्या आहेत. उद्योजकांसह किरकोळ दुकानदार व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अग्निशमनविषयी उपाययोजना फक्त नावालाच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नागरिकांमधील उदासीनतेमुळे अग्निशमन दलावरील ताण वाढू लागला आहे.नेरुळ सेक्टर २८ मधील सद्गुरू अपार्टमेंटच्या समोरील झोपडपट्टीमध्ये १७ आॅक्टोबरला फटाक्यांमुळे आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन आग नियंत्रणामध्ये आणली. सीवूड सेक्टर ४२ ए गणपती अपार्टमेंटच्या समोरील झोपड्यांनाही दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आग लागली. याच दिवशी तुर्भे एमआयडीसीमधील मॅकेमको कंपनीलाही आग लागली. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास कंपनीमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. ठिणगीमुळे कंपनीमधील केमिकलने पेट घेतला. केमिकलचा स्फोट झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तीन तासांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणामध्ये आणली. वास्तविक कंपनीमध्ये वेल्डिंग व इतर कामे करत असताना आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक होते. केमिकल कंपनीमध्ये विशेष दक्ष असणे आवश्यक असते; परंतु योग्य काळजी घेतली गेली नसल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नक्की कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेमध्ये कंपनीमधील एकही कामगार गंभीर जखमी झालेला नाही. सर्वांना वेळेत घराबाहेर काढण्यात यश मिळविले. या घटनेमुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अग्निशमन दलावरील ताण वाढला व सर्व अग्निशमन कर्मचाºयांना पुढील चार दिवस दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.जुईनगर सेक्टर २४ मधील सुंदरम सोसायटीच्या तिसºया मजल्यावर शुक्रवारी आग लागली. पेट्रोल पंपाजवळच आग लागल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रॉकेटमुळे ही आग लागल्याचा अंदाज रहिवाशांनी व्यक्त केला. आग लागताच परिसरामध्ये बघ्याची गर्दी जमली होती. विजय साळे व विनोद लोखंडे व सोसायटीमधील नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून आग नियंत्रणामध्ये आणली. तुर्भे सेक्टर २३ मधील जनता मार्केटमध्येही १९ आॅक्टोबरला दुकानांना आग लागली होती. महादेव कलेक्शन या कपड्यांच्या दुकानांना पहाटे ५ वाजताच आग लागली. ही आगही फटाक्यांमुळे लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईमध्ये पाच दिवसांमध्ये तब्बल १५ ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये सर्वाधिक ७ घटना वाशी परिसरामध्ये घडल्या आहेत. यानंतर ५ घटना नेरुळ अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्रामध्ये घडल्या असून, तीन घटना ऐरोलीच्या कार्यक्षेत्रामध्ये घडल्याची नोंद झाली आहे.आग वेळेत नियंत्रणामध्ये आणण्यात यश आले आहे. करोडो रुपयांचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी व कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.>नियम तोडणाºयांवर कारवाई नाहीशहरातील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी, व्यावसायिक दुकान व एमआयडीसीतील कंपन्यांना अग्निशमनविषयी उपाययोजना करणे आवश्यक आहे. याविषयी नियमित पाहणी करून तसा अग्निशनचा ना हरकत दाखला घेणेही आवश्यक असते; परंतु कोणीही गांभीर्याने अग्निशमनचे नियम पाळत नाही व नियम तोडणाºयांवर प्रशासनाकडूनही काहीच कारवाई केली जात नाही.दिवाळीमध्ये लागलेल्या काही महत्त्वाच्या घटनातुर्भे एमआयडीसीमधील मॅकेमको कंपनीला आग लागून करोडो रूपयांचे नुकसाननेरूळ सेक्टर २८ मधील सद्गुरू अपार्टमेंटसमोरील झोपड्यांना आगनेरूळ सेक्टर १० मधील पंचशील अपार्टमेंटसमोर गाडीला आगसीवूड सेक्टर ४२ मधील गणपती अपार्टमेंटसमोरील झोपड्यांना आगजुईनगर सेक्टर २४ मधील सुंदरम सोसायटीच्या तिसºया मजल्यावरील घरामध्ये आगतुर्भे सेक्टर २३ मधील महादेव कलेक्शन या कपड्याच्या दुकाना आग लागली.