शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

सेनेत निष्ठावंत-उपरे वाद वाढला

By admin | Updated: April 28, 2017 00:41 IST

स्थायी समिती निवडणुकीवरून शिवसेनेमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. अनेक पक्षांच्या वळचणींना

नवी मुंबई : स्थायी समिती निवडणुकीवरून शिवसेनेमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. अनेक पक्षांच्या वळचणींना जावून आलेलेही आम्हीच निष्ठावंत असल्याचे दावे करू लागले आहेत. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी नेत्यांमध्ये संघटनेचे नुकसान करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये सामान्य शिवसैनिक भरडला जावू लागला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबई शिवसेनेने पहिल्यांदा गट - तट बाजूला ठेवून राजन विचारे यांचा प्रचार केला. यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदार संघामध्ये आघाडी मिळविणे शक्य झाले होते. परंतु हीच एकी कायम ठेवण्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अपयश आले. विधानसभा निवडणुकीमध्ये विजय चौगुले व विजय नाहटा यांच्या प्रचारामध्ये समन्वय नसल्याने वातावरण चांगले असताना दोन्ही मतदार संघामध्ये थोड्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. महापालिका निवडणुकीमध्ये तर मतभेद प्रचंड वाढले व त्याचमुळे पालिकेवर भगवा फडकण्याचे स्वप्न पूर्ण करता आलेले नाही. निवडणुकीनंतरही पक्षातील मतभेद अद्याप कमी झाले नाहीत. गतवर्षी एकीचे उसने अवसान आणून स्थायी समिती सभापतीपद मिळविले असले तरी त्याचा पक्षवाढीसाठी काहीही फायदा झालेला नाही. उलट स्थायी समिती सभापती यांनी आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात घेतलेल्या भूमिकेचा सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसलाच फायदा झाला. आता पुन्हा स्थायी समिती निवडणुकीवरून पक्षातील मतभेद प्रचंड वाढले आहेत. विजय चौगुले व विजय नाहटा या गटामध्ये शिवसेना विभागली आहे. पक्षांतर्गत मतभेद प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचवून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू झाले आहे. वरिष्ठांच्या भांडणामध्ये सामान्य शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे. स्थायी समिती सदस्य निवडीवरून १८ नगरसेवक राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु यामधील एकाही नगरसेवकाने प्रत्यक्ष राजीनामा दिला नाही. अशाप्रकारे धाडस करण्याचे सामर्थ्य यापैकी एकामध्येही नसल्याने हे फक्त दबाव निर्माण करण्यासाठीच असल्याचे मत एक गटाकडून करण्यात येत होते. पक्षामध्ये निष्ठावंत विरोधात उपरे असा वाद निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात शिवसेनेमध्ये निष्ठावंत कोणाला म्हणायचे व उपरे कोणाला म्हणायचे यावरूनच एकवाक्यता नाही. पालिका सभागृहातील निवडून आलेले ३८ व दोन स्वीकृतमधील हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच नगरसेवक मूळ संघटनेतील असून उर्वरित नगरसेवकांनी सवडीप्रमाणे पक्षांतर केले आहे. वास्तविक जो पक्षात आहे तो आपला असे समजून त्यांना पक्ष कार्यामध्ये सहभागी करून घेण्याऐवजी निष्ठावंत व उपरे वाद निर्माण करून पक्षाचे नुकसान केले जात असल्याबद्दल शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.