शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सेनेत निष्ठावंत-उपरे वाद वाढला

By admin | Updated: April 28, 2017 00:41 IST

स्थायी समिती निवडणुकीवरून शिवसेनेमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. अनेक पक्षांच्या वळचणींना

नवी मुंबई : स्थायी समिती निवडणुकीवरून शिवसेनेमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. अनेक पक्षांच्या वळचणींना जावून आलेलेही आम्हीच निष्ठावंत असल्याचे दावे करू लागले आहेत. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी नेत्यांमध्ये संघटनेचे नुकसान करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये सामान्य शिवसैनिक भरडला जावू लागला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबई शिवसेनेने पहिल्यांदा गट - तट बाजूला ठेवून राजन विचारे यांचा प्रचार केला. यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदार संघामध्ये आघाडी मिळविणे शक्य झाले होते. परंतु हीच एकी कायम ठेवण्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अपयश आले. विधानसभा निवडणुकीमध्ये विजय चौगुले व विजय नाहटा यांच्या प्रचारामध्ये समन्वय नसल्याने वातावरण चांगले असताना दोन्ही मतदार संघामध्ये थोड्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. महापालिका निवडणुकीमध्ये तर मतभेद प्रचंड वाढले व त्याचमुळे पालिकेवर भगवा फडकण्याचे स्वप्न पूर्ण करता आलेले नाही. निवडणुकीनंतरही पक्षातील मतभेद अद्याप कमी झाले नाहीत. गतवर्षी एकीचे उसने अवसान आणून स्थायी समिती सभापतीपद मिळविले असले तरी त्याचा पक्षवाढीसाठी काहीही फायदा झालेला नाही. उलट स्थायी समिती सभापती यांनी आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात घेतलेल्या भूमिकेचा सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसलाच फायदा झाला. आता पुन्हा स्थायी समिती निवडणुकीवरून पक्षातील मतभेद प्रचंड वाढले आहेत. विजय चौगुले व विजय नाहटा या गटामध्ये शिवसेना विभागली आहे. पक्षांतर्गत मतभेद प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचवून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू झाले आहे. वरिष्ठांच्या भांडणामध्ये सामान्य शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे. स्थायी समिती सदस्य निवडीवरून १८ नगरसेवक राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु यामधील एकाही नगरसेवकाने प्रत्यक्ष राजीनामा दिला नाही. अशाप्रकारे धाडस करण्याचे सामर्थ्य यापैकी एकामध्येही नसल्याने हे फक्त दबाव निर्माण करण्यासाठीच असल्याचे मत एक गटाकडून करण्यात येत होते. पक्षामध्ये निष्ठावंत विरोधात उपरे असा वाद निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात शिवसेनेमध्ये निष्ठावंत कोणाला म्हणायचे व उपरे कोणाला म्हणायचे यावरूनच एकवाक्यता नाही. पालिका सभागृहातील निवडून आलेले ३८ व दोन स्वीकृतमधील हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच नगरसेवक मूळ संघटनेतील असून उर्वरित नगरसेवकांनी सवडीप्रमाणे पक्षांतर केले आहे. वास्तविक जो पक्षात आहे तो आपला असे समजून त्यांना पक्ष कार्यामध्ये सहभागी करून घेण्याऐवजी निष्ठावंत व उपरे वाद निर्माण करून पक्षाचे नुकसान केले जात असल्याबद्दल शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.