शहरं
Join us  
Trending Stories
1
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
2
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
3
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
4
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
5
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
6
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
7
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
8
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
9
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
10
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
11
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप
12
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
13
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
14
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
15
कार्तिकी एकादशी २०२५: १ नोव्हेंबरला एकादशी तिथी प्रारंभ; पण उपास नेमका कधी? वाचा अचूक माहिती
16
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
17
₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं!
18
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
19
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
20
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा

सेनेत निष्ठावंत-उपरे वाद वाढला

By admin | Updated: April 28, 2017 00:41 IST

स्थायी समिती निवडणुकीवरून शिवसेनेमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. अनेक पक्षांच्या वळचणींना

नवी मुंबई : स्थायी समिती निवडणुकीवरून शिवसेनेमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. अनेक पक्षांच्या वळचणींना जावून आलेलेही आम्हीच निष्ठावंत असल्याचे दावे करू लागले आहेत. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी नेत्यांमध्ये संघटनेचे नुकसान करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये सामान्य शिवसैनिक भरडला जावू लागला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबई शिवसेनेने पहिल्यांदा गट - तट बाजूला ठेवून राजन विचारे यांचा प्रचार केला. यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदार संघामध्ये आघाडी मिळविणे शक्य झाले होते. परंतु हीच एकी कायम ठेवण्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अपयश आले. विधानसभा निवडणुकीमध्ये विजय चौगुले व विजय नाहटा यांच्या प्रचारामध्ये समन्वय नसल्याने वातावरण चांगले असताना दोन्ही मतदार संघामध्ये थोड्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. महापालिका निवडणुकीमध्ये तर मतभेद प्रचंड वाढले व त्याचमुळे पालिकेवर भगवा फडकण्याचे स्वप्न पूर्ण करता आलेले नाही. निवडणुकीनंतरही पक्षातील मतभेद अद्याप कमी झाले नाहीत. गतवर्षी एकीचे उसने अवसान आणून स्थायी समिती सभापतीपद मिळविले असले तरी त्याचा पक्षवाढीसाठी काहीही फायदा झालेला नाही. उलट स्थायी समिती सभापती यांनी आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात घेतलेल्या भूमिकेचा सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसलाच फायदा झाला. आता पुन्हा स्थायी समिती निवडणुकीवरून पक्षातील मतभेद प्रचंड वाढले आहेत. विजय चौगुले व विजय नाहटा या गटामध्ये शिवसेना विभागली आहे. पक्षांतर्गत मतभेद प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचवून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू झाले आहे. वरिष्ठांच्या भांडणामध्ये सामान्य शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे. स्थायी समिती सदस्य निवडीवरून १८ नगरसेवक राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु यामधील एकाही नगरसेवकाने प्रत्यक्ष राजीनामा दिला नाही. अशाप्रकारे धाडस करण्याचे सामर्थ्य यापैकी एकामध्येही नसल्याने हे फक्त दबाव निर्माण करण्यासाठीच असल्याचे मत एक गटाकडून करण्यात येत होते. पक्षामध्ये निष्ठावंत विरोधात उपरे असा वाद निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात शिवसेनेमध्ये निष्ठावंत कोणाला म्हणायचे व उपरे कोणाला म्हणायचे यावरूनच एकवाक्यता नाही. पालिका सभागृहातील निवडून आलेले ३८ व दोन स्वीकृतमधील हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच नगरसेवक मूळ संघटनेतील असून उर्वरित नगरसेवकांनी सवडीप्रमाणे पक्षांतर केले आहे. वास्तविक जो पक्षात आहे तो आपला असे समजून त्यांना पक्ष कार्यामध्ये सहभागी करून घेण्याऐवजी निष्ठावंत व उपरे वाद निर्माण करून पक्षाचे नुकसान केले जात असल्याबद्दल शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.