शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

पावणेतील ती वनराई वाचण्याची चिन्हे; गणेश नाईकांच्या पुढाकारानं २०० वृक्षांना जीवदान

By नारायण जाधव | Updated: June 27, 2024 16:19 IST

मुंबईतील सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी शहरातील अनेक पर्यावरणीय समस्यांसह हा भूखंड वाचविण्यासाठी नाईक यांंची भेट घेऊन चर्चा केली.

नवी मुंबई : नवी मुंबईतील पावणे येथील एमआयडीच्या भूखंडावरील २०० वृक्षांना जीवदान मिळण्याची चिन्हे आहेत. पावणेतील ओएस-७ या भूखंडावर एका खासगी पेट्रो-केमिकल कंपनीने २० वर्षांपूर्वी वनराई विकसित केली आहे. मात्र, याच भूखंडावर एमआयडीसीने स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी भूखंड देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी किमान २०० वृक्ष तोडावे लागणार आहेत. याला स्थानिक वृक्षप्रेमींसह नॅट कनेक्ट फाउंडेशनने विरोध करून ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांना ते वाचविण्याची गळ घातली होती. तिला प्रतिसाद देऊन नाईक यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी नवा भूखंड शोधण्याचे निर्देश एमआयडीला दिले आहेत.

वनराईने बहरलेला हा भूखंड वाचविण्यासाठी याआधी येथील नॅट कनेक्ट फाउंडेशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल पाठवला असून त्यांनी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. अशातच मुंबईतील सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी शहरातील अनेक पर्यावरणीय समस्यांसह हा भूखंड वाचविण्यासाठी नाईक यांंची भेट घेऊन चर्चा केली.

तसेच राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शहरातील पर्यावरणाचे विषय मांडण्याची त्यांना विनंती केली. यानंतर नाईक यांनी पर्यावरणप्रेमींच्या मागणीला पाठिंबा देऊन एमआयडीसीला ओएस-७ हा भूखंड सोडून प्रकल्पांसाठी दुसरी पर्यायी जागा शोधण्यास सांगितले आहे.

हिरवळ वाचविण्याची जबाबदारी महापालिकेचीएवढेच नव्हे तर काळजी करू नका, जर कोणी झाडांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर मी प्रत्यक्षपणे घटनास्थळी येईन, असे आश्वासन नाईक यांनी दिले असल्याचे कुमार म्हणाले. एक एकरचा भूखंड हा मुळात दलदलीचा परिसर होता. एमआयडीसीत हायड्रोकार्बन्सचा व्यवहार करणाऱ्या खासगी कंपनीने २० वर्षांपूर्वी तो हरित क्षेत्र म्हणून विकसित केला होता. कंपनीने वृक्षारोपण केले असून, आता २०० परिपूर्ण झाडे बहरली आहेत. यात वाढलेली खजुरासह अनेक फुलझाडे आहेत. आता ही हिरवळ वाचवण्याची जबाबदारीही नवी मुंबई महापालिकेेची आहे. त्यासाठी अमृत मिशनच्या निधीचा वापर करावा, अशी सूचना बी.एन. कुमार यांनी केली आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईक