शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

पावणेतील ती वनराई वाचण्याची चिन्हे; गणेश नाईकांच्या पुढाकारानं २०० वृक्षांना जीवदान

By नारायण जाधव | Updated: June 27, 2024 16:19 IST

मुंबईतील सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी शहरातील अनेक पर्यावरणीय समस्यांसह हा भूखंड वाचविण्यासाठी नाईक यांंची भेट घेऊन चर्चा केली.

नवी मुंबई : नवी मुंबईतील पावणे येथील एमआयडीच्या भूखंडावरील २०० वृक्षांना जीवदान मिळण्याची चिन्हे आहेत. पावणेतील ओएस-७ या भूखंडावर एका खासगी पेट्रो-केमिकल कंपनीने २० वर्षांपूर्वी वनराई विकसित केली आहे. मात्र, याच भूखंडावर एमआयडीसीने स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी भूखंड देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी किमान २०० वृक्ष तोडावे लागणार आहेत. याला स्थानिक वृक्षप्रेमींसह नॅट कनेक्ट फाउंडेशनने विरोध करून ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांना ते वाचविण्याची गळ घातली होती. तिला प्रतिसाद देऊन नाईक यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी नवा भूखंड शोधण्याचे निर्देश एमआयडीला दिले आहेत.

वनराईने बहरलेला हा भूखंड वाचविण्यासाठी याआधी येथील नॅट कनेक्ट फाउंडेशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल पाठवला असून त्यांनी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. अशातच मुंबईतील सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी शहरातील अनेक पर्यावरणीय समस्यांसह हा भूखंड वाचविण्यासाठी नाईक यांंची भेट घेऊन चर्चा केली.

तसेच राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शहरातील पर्यावरणाचे विषय मांडण्याची त्यांना विनंती केली. यानंतर नाईक यांनी पर्यावरणप्रेमींच्या मागणीला पाठिंबा देऊन एमआयडीसीला ओएस-७ हा भूखंड सोडून प्रकल्पांसाठी दुसरी पर्यायी जागा शोधण्यास सांगितले आहे.

हिरवळ वाचविण्याची जबाबदारी महापालिकेचीएवढेच नव्हे तर काळजी करू नका, जर कोणी झाडांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर मी प्रत्यक्षपणे घटनास्थळी येईन, असे आश्वासन नाईक यांनी दिले असल्याचे कुमार म्हणाले. एक एकरचा भूखंड हा मुळात दलदलीचा परिसर होता. एमआयडीसीत हायड्रोकार्बन्सचा व्यवहार करणाऱ्या खासगी कंपनीने २० वर्षांपूर्वी तो हरित क्षेत्र म्हणून विकसित केला होता. कंपनीने वृक्षारोपण केले असून, आता २०० परिपूर्ण झाडे बहरली आहेत. यात वाढलेली खजुरासह अनेक फुलझाडे आहेत. आता ही हिरवळ वाचवण्याची जबाबदारीही नवी मुंबई महापालिकेेची आहे. त्यासाठी अमृत मिशनच्या निधीचा वापर करावा, अशी सूचना बी.एन. कुमार यांनी केली आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईक