शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

गढूळ पाण्याची कटकट दूर होणार, महापालिका बांधणार १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प

By नारायण जाधव | Updated: June 13, 2023 17:39 IST

सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकमतला दिली.

नवी मुंबई : जलवाहिन्या दुरुस्तीमुळे गेल्या पाच-सहा दिवसांपासून नवी मुंबईतील काही भागात गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय अधून-मधूनही गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी असतात. यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून नवी मुंबई महापालिकेने आता मोरबे धरणावर भोकरपाडा येथे १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकमतला दिली.

मोरबे धरण ताब्यात घेतल्यानंतर महापालिकेने त्याकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भोकरपाडा येथे बांधलेल्या ३०० एलएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढून तो ४५० एमएलडीचा केला. मात्र, कालौघात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९८७ बांधलेल्या या जलशुद्धीकरण प्रकल्प जीर्ण होत चालला असून त्याची क्षमता खंगत चालली आहे. अनेक ठिकाणची यंत्रसामग्री जीर्ण होत चालली आहे. तिची तांत्रिक क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. शिवाय तिथे जी टेक्नॉलाॅजी वापरली आहे, तीसुद्धा कालबाह्य होत चालली आहे. यामुळे काही बिघाड झाल्यास ती दुरुस्त करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येतात. यामुळे शहरात जलशुद्धीकरणात अडचणी येत आहेत. यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची डोकेदुखी वाढली हाेती.

नव्या प्रकल्पावर ४७ कोटींचा खर्च

या सर्वांवर कायमस्वरुपी उपाय म्हणून सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांशेजारी जी मोकळी जागा आहे, त्यावर १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या ठिकाणी नवे फिल्टरबेड टाकण्यात येणार आहे. या कामावर ४७ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई दिली. सध्या याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काम पूर्ण झाल्यानंतर गढूळ पाण्याची कटकट दूर होणार असल्याचे ते म्हणाले.

जुना प्रकल्प मोडीत काढणार

नवा १५० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने नंतर वाढविलेल्या १५० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बांधलेल्या जुन्या ३०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्प मोडीत काढण्यात येणार आहे.

नवा जलकुंभ ही बांधणार

जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात २.५ एमएलडी क्षमतेचा नवा जलकुंभ ही बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामावर १९ कोटी ५० रुपये खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी