शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

गढूळ पाण्याची कटकट दूर होणार, महापालिका बांधणार १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प

By नारायण जाधव | Updated: June 13, 2023 17:39 IST

सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकमतला दिली.

नवी मुंबई : जलवाहिन्या दुरुस्तीमुळे गेल्या पाच-सहा दिवसांपासून नवी मुंबईतील काही भागात गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय अधून-मधूनही गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी असतात. यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून नवी मुंबई महापालिकेने आता मोरबे धरणावर भोकरपाडा येथे १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकमतला दिली.

मोरबे धरण ताब्यात घेतल्यानंतर महापालिकेने त्याकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भोकरपाडा येथे बांधलेल्या ३०० एलएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढून तो ४५० एमएलडीचा केला. मात्र, कालौघात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९८७ बांधलेल्या या जलशुद्धीकरण प्रकल्प जीर्ण होत चालला असून त्याची क्षमता खंगत चालली आहे. अनेक ठिकाणची यंत्रसामग्री जीर्ण होत चालली आहे. तिची तांत्रिक क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. शिवाय तिथे जी टेक्नॉलाॅजी वापरली आहे, तीसुद्धा कालबाह्य होत चालली आहे. यामुळे काही बिघाड झाल्यास ती दुरुस्त करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येतात. यामुळे शहरात जलशुद्धीकरणात अडचणी येत आहेत. यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची डोकेदुखी वाढली हाेती.

नव्या प्रकल्पावर ४७ कोटींचा खर्च

या सर्वांवर कायमस्वरुपी उपाय म्हणून सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांशेजारी जी मोकळी जागा आहे, त्यावर १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या ठिकाणी नवे फिल्टरबेड टाकण्यात येणार आहे. या कामावर ४७ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई दिली. सध्या याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काम पूर्ण झाल्यानंतर गढूळ पाण्याची कटकट दूर होणार असल्याचे ते म्हणाले.

जुना प्रकल्प मोडीत काढणार

नवा १५० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने नंतर वाढविलेल्या १५० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बांधलेल्या जुन्या ३०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्प मोडीत काढण्यात येणार आहे.

नवा जलकुंभ ही बांधणार

जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात २.५ एमएलडी क्षमतेचा नवा जलकुंभ ही बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामावर १९ कोटी ५० रुपये खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी