शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

गढूळ पाण्याची कटकट दूर होणार, महापालिका बांधणार १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प

By नारायण जाधव | Updated: June 13, 2023 17:39 IST

सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकमतला दिली.

नवी मुंबई : जलवाहिन्या दुरुस्तीमुळे गेल्या पाच-सहा दिवसांपासून नवी मुंबईतील काही भागात गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय अधून-मधूनही गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी असतात. यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून नवी मुंबई महापालिकेने आता मोरबे धरणावर भोकरपाडा येथे १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकमतला दिली.

मोरबे धरण ताब्यात घेतल्यानंतर महापालिकेने त्याकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भोकरपाडा येथे बांधलेल्या ३०० एलएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढून तो ४५० एमएलडीचा केला. मात्र, कालौघात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९८७ बांधलेल्या या जलशुद्धीकरण प्रकल्प जीर्ण होत चालला असून त्याची क्षमता खंगत चालली आहे. अनेक ठिकाणची यंत्रसामग्री जीर्ण होत चालली आहे. तिची तांत्रिक क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. शिवाय तिथे जी टेक्नॉलाॅजी वापरली आहे, तीसुद्धा कालबाह्य होत चालली आहे. यामुळे काही बिघाड झाल्यास ती दुरुस्त करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येतात. यामुळे शहरात जलशुद्धीकरणात अडचणी येत आहेत. यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची डोकेदुखी वाढली हाेती.

नव्या प्रकल्पावर ४७ कोटींचा खर्च

या सर्वांवर कायमस्वरुपी उपाय म्हणून सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांशेजारी जी मोकळी जागा आहे, त्यावर १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या ठिकाणी नवे फिल्टरबेड टाकण्यात येणार आहे. या कामावर ४७ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई दिली. सध्या याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काम पूर्ण झाल्यानंतर गढूळ पाण्याची कटकट दूर होणार असल्याचे ते म्हणाले.

जुना प्रकल्प मोडीत काढणार

नवा १५० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने नंतर वाढविलेल्या १५० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बांधलेल्या जुन्या ३०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्प मोडीत काढण्यात येणार आहे.

नवा जलकुंभ ही बांधणार

जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात २.५ एमएलडी क्षमतेचा नवा जलकुंभ ही बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामावर १९ कोटी ५० रुपये खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी