शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

गढूळ पाण्याची कटकट दूर होणार, महापालिका बांधणार १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प

By नारायण जाधव | Updated: June 13, 2023 17:39 IST

सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकमतला दिली.

नवी मुंबई : जलवाहिन्या दुरुस्तीमुळे गेल्या पाच-सहा दिवसांपासून नवी मुंबईतील काही भागात गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय अधून-मधूनही गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी असतात. यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून नवी मुंबई महापालिकेने आता मोरबे धरणावर भोकरपाडा येथे १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकमतला दिली.

मोरबे धरण ताब्यात घेतल्यानंतर महापालिकेने त्याकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भोकरपाडा येथे बांधलेल्या ३०० एलएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढून तो ४५० एमएलडीचा केला. मात्र, कालौघात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९८७ बांधलेल्या या जलशुद्धीकरण प्रकल्प जीर्ण होत चालला असून त्याची क्षमता खंगत चालली आहे. अनेक ठिकाणची यंत्रसामग्री जीर्ण होत चालली आहे. तिची तांत्रिक क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. शिवाय तिथे जी टेक्नॉलाॅजी वापरली आहे, तीसुद्धा कालबाह्य होत चालली आहे. यामुळे काही बिघाड झाल्यास ती दुरुस्त करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येतात. यामुळे शहरात जलशुद्धीकरणात अडचणी येत आहेत. यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची डोकेदुखी वाढली हाेती.

नव्या प्रकल्पावर ४७ कोटींचा खर्च

या सर्वांवर कायमस्वरुपी उपाय म्हणून सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांशेजारी जी मोकळी जागा आहे, त्यावर १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या ठिकाणी नवे फिल्टरबेड टाकण्यात येणार आहे. या कामावर ४७ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई दिली. सध्या याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काम पूर्ण झाल्यानंतर गढूळ पाण्याची कटकट दूर होणार असल्याचे ते म्हणाले.

जुना प्रकल्प मोडीत काढणार

नवा १५० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने नंतर वाढविलेल्या १५० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बांधलेल्या जुन्या ३०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्प मोडीत काढण्यात येणार आहे.

नवा जलकुंभ ही बांधणार

जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात २.५ एमएलडी क्षमतेचा नवा जलकुंभ ही बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामावर १९ कोटी ५० रुपये खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी