शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

बांधकाम प्रकल्पात बाधित मच्छीमारांच्या नुकसानभरपाईसाठी अखेर धोरण निश्चित, २५ हजार ते सहा लाखपर्यंत मिळणार भरपाई

By नारायण जाधव | Updated: March 10, 2023 17:54 IST

या धोरणानुसार मच्छीमारांना नुकसानीनुसार सहा श्रेणीत नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. ही रक्कम २५ हजार ते सहा लाखापर्यंत आहे.

नवी मुंबई- मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी येथील ठाणे खाडीवरील तिसऱ्या पुलासंदर्भात मच्छीमारांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने कान टोचल्यानंतर, राज्याच्या मत्स्य विकास विभागाने राज्यातील सर्वच बांधकाम प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांना नुकसान भरभाई देण्यासाठी अखेर धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार मच्छीमारांना नुकसानीनुसार सहा श्रेणीत नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. ही रक्कम २५ हजार ते सहा लाखापर्यंत आहे. याशिवाय जो बांधकाम प्रकल्प राबविण्यात येणार आहे, तो राबविणाऱ्या संस्थेने मच्छीमारांच्या सोयीसुविधांसाठी दोन कोटी ते ५० कोटींपर्यंतची रक्कम मत्स्य विकास विभागाकडे जमा करावयाची आहे.

ठाणे खाडीवर रस्ते विकास महामंडळ तिसरा खाडीपूल बांधत आहे. यापुलामुळे मासेमारीवर परिणाम होणार असल्याचे सांगून वाशीगाव येथील मरिआई मच्छीमार सहकारी संस्थेने न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुणावणीप्रसंगी राज्य सरकारने मच्छीमारांच्या नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी धोरण निश्चित करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षेतखाली समिती गठित केल्याचेही सांगितले होते. यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध रस्ते विकास महांडळाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानेही राज्यातील विविध बांधकाम प्रकल्पांत बाधित होणाऱ्या मच्छीमारांच्या नुकसानभरपाईसाठी तीन महिन्यांच्या आत धोरण निश्चित करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार राज्य शासनाने ९ मार्च २०२३ रोजी हे धोरण प्रसिद्ध केले आहे.

सात बाबी घेतल्या विचारात -यासाठी सात बाबी विचारात घेतल्या आहेत. यामध्ये मच्छीमारांची ओळख निश्चित करणे, मासेमारी नौकेचा प्रकार आणि इतर माहिती ताांत्रिक मूल्यमापन/ सामाजिक प्रभाव मूल्यांकन, अंमलबजावणी संस्था/ यंत्रणाद्वारे बेस लाइन सर्वेक्षण, आदर्श कार्यप्रणाली, मच्छीमारांना देण्यात येणारी नुकसानभरपाई आणि तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करणे यांचा समावेश आहे.

सहा श्रेणीत मिळणार नुकसानभरपाई -बांधकाम प्रकल्पांत बाधित होणाऱ्या मच्छीमारांचे सहा श्रेणीत वर्गीकरण करून त्यानुसार नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. यामध्ये मासेमारी क्षेत्र कायमचे नष्ट झाले असल्यास सहा लाख रुपये, प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रापासून ५०० मीटर त्रिज्येच्या क्षेत्रातील मासेमारीवर परिणाम झाल्यास चार लाख रुपये, हाताने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे नुकसान झाल्यास दोन लाख रुपये, दैनंदिन मासेमारी झालेला विलंब, येण्याजाण्याच्या खर्च वाढल्यास एक लाख रुपये, पाणी गढूळ झाल्यास ५० हजार रुपये आणि बांधकाम प्रकल्पांच्या मालवाहू नौकांमुळे जाळ्यांचे नुकसान झाल्यास २५ हजार रुपये इतकी भरपाई देण्याची शिफारस या धोरणात करण्यात आली आहे.

तक्रार निवारणासाठी त्रिस्तरीय यंत्रणा -मच्छीमारांच्या नुकसानभरपाईसंदर्भात काही तक्रारी असल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी त्रिस्तरीय यंत्रणा स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हास्तरीय, प्रादेशिक्ष आणि राज्य स्तरीय यंत्रणेचा समावेश आहे.

सोयीसुविधांसाठी दोन कोटी ते ५० कोटी -राज्यात ज्याठिकाणी रस्ते, पूल, बंदरे, जेट्टी यांचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत, त्यात बाधित होणाऱ्या मच्छीमारांना पायाभूत सुविधा देण्यासाठी १००० कोटी पर्यंतच्या प्रकल्पात दोन कोटी तर हजार कोटीवरील प्रकल्पासाठी ५० कोटीपर्यंत रक्कम प्रकल्प राबविणाऱ्या यंत्रणेने मत्स्य विकास विभागाकडे जमा करावयाची आहे. यानिधीतून मच्छीमारांना पाणीपुरवठा, शौचालये, मासळी सुकविण्यासाठीचे ओटे बांधणे, युनिक ओळखपत्र देणे, मत्स्यबीज उत्पादन प्रकल्प राबविणे, समुद्र पिंजरे बांधणे असे प्रकल्प राबविण्याची शिफारस नव्या धोरणात करण्यात आली आहे.

या प्रकल्पांत बाधित मच्छीमारांना होणार लाभ -येत्या काळात विरार-अलिबाग कॉरिडोर, जेएनपीटी ते दिल्ली फ्रेट कॉरिडोर, मुंबई-दिल्ली महामार्ग, रेवस-करंजा पूल, रेवस ते रेड्डी सागरी महामार्गासह वाढवण बंदर, बुलेट ट्रेन असे अनेक प्रकल्प आकार घेत आहेत, या प्रकल्पांत बाधित मच्छीमारांना नव्या नुकसानभरपाई धोरणाचा लाभ होणार आहे. 

टॅग्स :fishermanमच्छीमारNavi Mumbaiनवी मुंबई