शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

शिंदे सरकारच्या सत्तासंघर्षाची माहिती देण्यास माहिती आयोगाची ना ना, सुनावणीनंतर चार महिन्यांनी दिला आदेश

By नारायण जाधव | Updated: August 26, 2023 17:33 IST

Navi Mumbai: राज्यात जून २०२२ मध्ये शिवसेनेतून फुटून बाहेर पडून सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे सरकारच्या सत्तासंघर्षाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्यपाल कार्यालयास देण्याचे धैर्य राज्य माहिती आयोगानेही दाखविलेले नाही.

- नारायण जाधवनवी मुंबई - राज्यात जून २०२२ मध्ये शिवसेनेतून फुटून बाहेर पडून सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे सरकारच्या सत्तासंघर्षाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्यपाल कार्यालयास देण्याचे धैर्य राज्य माहिती आयोगानेही दाखविलेले नाही. माहिती आयोगाच्या या नकारघंटेविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे नवी मुंबईतीलमाहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजपसोबत जून २०२२ मध्ये सोयरीक करून सत्ता स्थापन केली. ते करताना कायदेशीर बाबींची पूर्तता राज्यपाल कार्यालयाने केली होती की नाही याची खातरजमा करण्यासाठी नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी राज्यपाल कार्यालयाकडे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला, त्यास कोणी कोणी पाठिंबा दिला, यासोबतच राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी कोणत्या पक्षास आमंत्रण दिले याची माहिती मागविली होती. ही कागदपत्रे राज्यपाल कार्यालयात नसून ती राज्यपालांकडे असल्याचा दावा करून जेव्हा ती उपलब्ध होतील तेव्हा देऊ असे सांगून जाधव यांची राज्यपाल कार्यालयाने बोळवण केली होती. यावर जाधव यांनी प्रथम अपिल केले होते. त्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून महामहिम राज्यपाल त्यात प्रतिवादी असल्याने ती कागदपत्रे राज्यपालांकडे असल्याचे सांगून माहिती त्यांचे अपिल निकाली काढले होते.

यानंतर जाधव यांनी याबाबत राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपिल दाखल केले होते. त्याची सुनावणी १४ एप्रिल २०२३ रोजी पूर्ण झाल्यावरही आदेश देण्यास राज्य माहिती आयोगाने चार महिने घेतले. राज्य माहिती आयोगाने जाधव यांचे अपिल नाकारताना सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून तसेच विधानसभा सभापती यांच्याकडेही याबाबत सुनावणी सुरू असल्याने महिती देता येणार नसल्याचे कारण आदेशात नोंदवले आहे. तर आयोगाने नोंदवलेली कारणे ही तथ्यहीन असून याबाबतची सर्वोच्च न्यायालयातील याचिका एप्रिल २०२३ मध्येच निकाली निघाली असल्याने माहिती आयोगाचे निरीक्षण आक्षेपार्ह आहे असे जाधव यांचे म्हणणे आहे. आयोगाने आदेशात नोंदवलेली कारणे दिशाभूल करणारी आहेत. सभापती राहुल नार्वेकरांकडे सुरू असलेली सुनावणी ही आमदार अपात्रतेबाबत असून त्याचा मी मागितलेल्या कागदपत्रांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे वर्षभर लढा देऊनही पदरी उपेक्षाच पडल्याने या विरोधात न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही. - संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRight to Information actमाहिती अधिकारNavi Mumbaiनवी मुंबई