शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अख्खी कोकण किनारपट्टी ‘सिडको’च्या ताब्यात; जागतिक टेंडर काढण्याचे अधिकारही सिडकोला

By नारायण जाधव | Updated: March 6, 2024 06:55 IST

४ मार्च २०२४ पासूनच हे अधिकार ‘सिडको’स दिले असून, तशी अधिसूचना नगरविकास विभागाने प्रसिद्ध केली. नियोजन प्राधिकरण म्हणून कोकण किनारपट्टीचा विकास करण्यासाठी जागतिक टेंडर काढून भागीदार नेमण्याचे अधिकार सिडकोला बहाल केले आहेत.

नवी मुंबई : राज्याच्या विद्यमान महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच कोकण विभागातील मुंबई व ठाणे वगळता रायगड,  पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींसह विकास प्राधिकरणांची क्षेत्रे वगळता  उर्वरित सर्व १,६३५ गावांच्या अधिपत्याखालील ६,४०,७८३ हेक्टर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ‘सिडकाे’ची नियुक्ती केली आहे. 

४ मार्च २०२४ पासूनच हे अधिकार ‘सिडको’स दिले असून, तशी अधिसूचना नगरविकास विभागाने प्रसिद्ध केली. नियोजन प्राधिकरण म्हणून कोकण किनारपट्टीचा विकास करण्यासाठी जागतिक टेंडर काढून भागीदार नेमण्याचे अधिकार सिडकोला बहाल केले आहेत. 

बांधकाम परवानगी प्रत्येक जिल्ह्यात - कोकणातील ज्या विभागात सिडकोची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे, त्या क्षेत्रात बांधकाम आणि अन्य परवानग्या देण्याचे अधिकार सिडकोकडे आपोआपच आले आहेत. - त्यामुळे कोकणवासीयांची गैरसोय होऊ नये, याकरिता प्रत्येक जिल्ह्यात नियोजनकारांचे स्वतंत्र कार्यालय तत्काळ सुरू करावे, असे आदेश सिडकोस दिले आहेत.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोकणात बांधकामासह इतर परवानग्या देण्याचे अधिकार सिडकोकडे आपोआप आले आहेत.

सुबोधकुमार यांची समिती करणार मार्गदर्शन- कोकण किनारपट्टीचा विकास करण्यासाठी भागीदार नेमण्याचे अधिकार सिडकोस देतानाच मदतीसाठी मुंबई महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त सुबोधकुमार यांच्या अधिपत्याखालील उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. 

- या समितीत वने, पर्यावरण, सांस्कृतिक, उद्योग विकास, जलजीवशास्त्र, नगररचना, आपत्ती व्यवस्थापन, जलवाहतूक, बंदर विकास, पर्यावरणीय वास्तुशास्त्रज्ञांचा समावेश असणार आहे.

सिडकोस बहाल केलेली गावेजिल्हा     एकूण     बहाल केलेले     गावे    अंदाजे क्षेत्र (हेक्टर)पालघर     १९७    ८५,७६७रायगड     ४३२    १,२३,३६६ रत्नागिरी     ७२२    २,८४,५२४ सिंधुदुर्ग     २८४    १,४७,१२८एकूण     १,६३५     ६,४०,७८३

नवनवीन बंदरांचा विकासमुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू, रस्ते विकास महामंडळाकडून प्रस्तावित रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, कोकणात येणारे डहाणूच्या वाढवणसह सिंधुदुर्गापर्यंत नवनवीन बंदरे या दृष्टिकोनातून कोकण किनारपट्टीचा जागतिक दर्जाचा विकास करण्यासाठी सिडकोची नियुक्ती केल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे. 

कोकणात नारळी सुपारी, आंब्याच्या बागा, मासे, काजूचे उत्पादन, सागरकिनारे  यांचा नियोजनबद्ध विकास केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करून पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन अर्थात पाच लाख कोटींपर्यंत पोहोचविण्यासाठी सिडकोची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोकणातच विकासाच्या संधी मिळाव्यातराज्याला ७२० किमीची किनारपट्टी आहे. कोकणाला निसर्गसंपन्नता, पर्यटनस्थळे, वन्यजीवन, गडकोट किल्ल्यांसह पुरातन वास्तूंचा वारसा आहे. मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस, त्यामुळे विस्कळीत होणारे सामान्यांचे जनजीवन, जलसंधारणाचे अल्प प्रमाण, समुद्रकिनारा, डोंगरमाथा यामधील मर्यादित जागा तसेच पर्यटकांवर अवलंबून असलेले व्यवसाय, अरुंद रस्ते यामुळे विकासास कमी वाव असल्याने कोकणवासी शहरांकडे धाव घेतात. 

कोकणातच आपला विकास करावा, या उद्देशाने परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी कोकण विभागातील रायगड,  पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकाेची नियुक्ती केल्याचे स्पष्टीकरण नगरविकास विभागाने दिले आहे.

या ११ बाबींवर लक्ष केंद्रित करणार- पर्यावरण संरक्षण, संवर्धन तसेच अपारंपरिक ऊर्जानिर्मिती.- पर्यावरणपूरक-साहसी पर्यटन, सागरी किल्ल्यांचे संवर्धन व सेवासुविधांनी युक्त समावेशक विकास करणे.- परिसराचा विकास करून स्थानिकांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करणे, पर्यटनासह उद्योगविकासात समाविष्ट करून रोजगार देणे.- स्थानिक लोकसंस्कृतीची जोपासना.- नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी सुविधांची निर्मिती करणे.- वनसंपत्ती, अभयारण्यांचे जतन करणे.- जल व मृदासंवर्धन आणि संधारणाची कामे करणे.- सुनियोजित रस्त्यांचे जाळे, बंदरविकास, जलमार्ग विकसित करणे.- किनारपट्टीची सुरक्षा व संरक्षण करणे.- सागरी शास्त्र, खनिज तसेच सागरी अभियांत्रिकी संशोधन केंद्राचा विकास करणे.- अनधिकृत बांधकामे, अनधिकृत विकासास निर्बंध आणणे, यांचा विचार करून तज्ज्ञ समितीच्या मार्गदर्शनाखाली सिडकोचा कोकणचा विकास करणार आहे.

टॅग्स :cidcoसिडकोkonkanकोकणGovernmentसरकार