शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

चोक पॉइंट बुजले गेल्यानेच डीपीएस तलाव पडला कोरडा

By नारायण जाधव | Updated: May 29, 2024 18:40 IST

खारफुटी संवर्धन समितीचा निष्कर्ष : सिडकोचे बिंग फुटणार

नवी मुंबई : पामबीच मार्गावर नेरूळ येथील जलवाहतूक जेट्टीवर जाण्यासाठी बांधलेल्या रस्त्यामुळे भरतीचा प्रवाह रोखला गेल्यानेच डीपीएस तलाव कोरडा पडल्याचा निष्कर्ष उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमलेल्या खारफुटी संवर्धन समितीच्या चारसदस्यीय पथकाने काढला आहे. या पथकाने बुधवारी डीपीएस तलाव परिसराची पाहणी केली. त्यात तलावास जेट्टीचा परिसर, त्यासाठी बांधलेल्या ६०० मीटरचा बंधाऱ्यासह रस्त्यामुळे बुजले गेलेले चोक पॉइंटचा समावेश आहे. याबाबत नॅट कनेक्ट फाउंडेशनने तक्रार केली होती. त्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खारफुटी संवर्धन समितीच्या चार अधिकाऱ्यांच्या पथकाने ही पाहणी केली.

चोक पॉइंट बुजविल्यानेच भरतीचा प्रवाह रोखला गेल्याने ३० एकर क्षेत्राचा डीपीएस तलाव काेरडा पडून फ्लेमिंगोंना अन्न मिळत नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला होता. त्याला खारफुटी संवर्धन समितीच्या पथकाने पाहणी करून दुजोरा दिल्याने सिडकोचे बिंग फुटणार आहे. यामुळे खारफुटी संवर्धन समिती आता सिडकोवर कारवाई करण्यासंदर्भात काय भूमिका घेते व कोणती शिफारस करते याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे. मात्र, याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर करावयाचा असल्याने यावर कोणतेही भाष्य करण्यास या समितीने पाठविलेल्या पथकातील सदस्यांनी नकार दिल्याचे तक्रारदार नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

नवी मुंबईची जमीनमालक असलेल्या सिडकोने विकास आराखड्यात दर्शविल्याप्रमाणे तलाव क्षेत्र हे विकसित करण्यायोग्य क्षेत्र आहे, हे दर्शविण्यासाठी बफर झोन तयार केला असल्याचे नवी मुंबई पर्यावरण संरक्षण सोसायटीचे व्यवस्थापकीय समिती सदस्य संदीप सरीन यांनी सांगितले. तर भरतीच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात व्यत्यय आणू नये यासाठी केंद्र तसेच राज्याच्या पर्यावरण विभागांनीदेखील सिडकोला निर्देश दिले होते. या उल्लंघनासाठी सिडकोला जबाबदार धरले पाहिजे, असे ‘एनएमईपीएस’चे अध्यक्ष विरेंद्र कुमार गांधी यांनी सांगितले.आमदार गणेश नाईक यांच्या इशाऱ्यानंतर जाग आलेल्या नवी मुंबई महापालिकेने डीपीएस तलावालगतचा बंधारा कापून भरतीचा प्रवाह तलावात येण्यासाठी तेथे ४५० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्याच्या कामास सुरुवात केली आहे. यामुळे तलावात लवकरच भरतीचे पाणी येईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हे करताना महापालिकेने या तलावातील घाण आणि गाळदेखील साफ करणे आवश्यक आहे. जेणेकरून पाणी तलावामध्ये प्रवेश करू शकेल, असे विरेंद्रकुमार गांधी म्हणाले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई