शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

चोक पॉइंट बुजले गेल्यानेच डीपीएस तलाव पडला कोरडा

By नारायण जाधव | Updated: May 29, 2024 18:40 IST

खारफुटी संवर्धन समितीचा निष्कर्ष : सिडकोचे बिंग फुटणार

नवी मुंबई : पामबीच मार्गावर नेरूळ येथील जलवाहतूक जेट्टीवर जाण्यासाठी बांधलेल्या रस्त्यामुळे भरतीचा प्रवाह रोखला गेल्यानेच डीपीएस तलाव कोरडा पडल्याचा निष्कर्ष उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमलेल्या खारफुटी संवर्धन समितीच्या चारसदस्यीय पथकाने काढला आहे. या पथकाने बुधवारी डीपीएस तलाव परिसराची पाहणी केली. त्यात तलावास जेट्टीचा परिसर, त्यासाठी बांधलेल्या ६०० मीटरचा बंधाऱ्यासह रस्त्यामुळे बुजले गेलेले चोक पॉइंटचा समावेश आहे. याबाबत नॅट कनेक्ट फाउंडेशनने तक्रार केली होती. त्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खारफुटी संवर्धन समितीच्या चार अधिकाऱ्यांच्या पथकाने ही पाहणी केली.

चोक पॉइंट बुजविल्यानेच भरतीचा प्रवाह रोखला गेल्याने ३० एकर क्षेत्राचा डीपीएस तलाव काेरडा पडून फ्लेमिंगोंना अन्न मिळत नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला होता. त्याला खारफुटी संवर्धन समितीच्या पथकाने पाहणी करून दुजोरा दिल्याने सिडकोचे बिंग फुटणार आहे. यामुळे खारफुटी संवर्धन समिती आता सिडकोवर कारवाई करण्यासंदर्भात काय भूमिका घेते व कोणती शिफारस करते याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे. मात्र, याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर करावयाचा असल्याने यावर कोणतेही भाष्य करण्यास या समितीने पाठविलेल्या पथकातील सदस्यांनी नकार दिल्याचे तक्रारदार नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

नवी मुंबईची जमीनमालक असलेल्या सिडकोने विकास आराखड्यात दर्शविल्याप्रमाणे तलाव क्षेत्र हे विकसित करण्यायोग्य क्षेत्र आहे, हे दर्शविण्यासाठी बफर झोन तयार केला असल्याचे नवी मुंबई पर्यावरण संरक्षण सोसायटीचे व्यवस्थापकीय समिती सदस्य संदीप सरीन यांनी सांगितले. तर भरतीच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात व्यत्यय आणू नये यासाठी केंद्र तसेच राज्याच्या पर्यावरण विभागांनीदेखील सिडकोला निर्देश दिले होते. या उल्लंघनासाठी सिडकोला जबाबदार धरले पाहिजे, असे ‘एनएमईपीएस’चे अध्यक्ष विरेंद्र कुमार गांधी यांनी सांगितले.आमदार गणेश नाईक यांच्या इशाऱ्यानंतर जाग आलेल्या नवी मुंबई महापालिकेने डीपीएस तलावालगतचा बंधारा कापून भरतीचा प्रवाह तलावात येण्यासाठी तेथे ४५० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्याच्या कामास सुरुवात केली आहे. यामुळे तलावात लवकरच भरतीचे पाणी येईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हे करताना महापालिकेने या तलावातील घाण आणि गाळदेखील साफ करणे आवश्यक आहे. जेणेकरून पाणी तलावामध्ये प्रवेश करू शकेल, असे विरेंद्रकुमार गांधी म्हणाले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई