शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

चोक पॉइंट बुजले गेल्यानेच डीपीएस तलाव पडला कोरडा

By नारायण जाधव | Updated: May 29, 2024 18:40 IST

खारफुटी संवर्धन समितीचा निष्कर्ष : सिडकोचे बिंग फुटणार

नवी मुंबई : पामबीच मार्गावर नेरूळ येथील जलवाहतूक जेट्टीवर जाण्यासाठी बांधलेल्या रस्त्यामुळे भरतीचा प्रवाह रोखला गेल्यानेच डीपीएस तलाव कोरडा पडल्याचा निष्कर्ष उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमलेल्या खारफुटी संवर्धन समितीच्या चारसदस्यीय पथकाने काढला आहे. या पथकाने बुधवारी डीपीएस तलाव परिसराची पाहणी केली. त्यात तलावास जेट्टीचा परिसर, त्यासाठी बांधलेल्या ६०० मीटरचा बंधाऱ्यासह रस्त्यामुळे बुजले गेलेले चोक पॉइंटचा समावेश आहे. याबाबत नॅट कनेक्ट फाउंडेशनने तक्रार केली होती. त्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खारफुटी संवर्धन समितीच्या चार अधिकाऱ्यांच्या पथकाने ही पाहणी केली.

चोक पॉइंट बुजविल्यानेच भरतीचा प्रवाह रोखला गेल्याने ३० एकर क्षेत्राचा डीपीएस तलाव काेरडा पडून फ्लेमिंगोंना अन्न मिळत नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला होता. त्याला खारफुटी संवर्धन समितीच्या पथकाने पाहणी करून दुजोरा दिल्याने सिडकोचे बिंग फुटणार आहे. यामुळे खारफुटी संवर्धन समिती आता सिडकोवर कारवाई करण्यासंदर्भात काय भूमिका घेते व कोणती शिफारस करते याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे. मात्र, याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर करावयाचा असल्याने यावर कोणतेही भाष्य करण्यास या समितीने पाठविलेल्या पथकातील सदस्यांनी नकार दिल्याचे तक्रारदार नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

नवी मुंबईची जमीनमालक असलेल्या सिडकोने विकास आराखड्यात दर्शविल्याप्रमाणे तलाव क्षेत्र हे विकसित करण्यायोग्य क्षेत्र आहे, हे दर्शविण्यासाठी बफर झोन तयार केला असल्याचे नवी मुंबई पर्यावरण संरक्षण सोसायटीचे व्यवस्थापकीय समिती सदस्य संदीप सरीन यांनी सांगितले. तर भरतीच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात व्यत्यय आणू नये यासाठी केंद्र तसेच राज्याच्या पर्यावरण विभागांनीदेखील सिडकोला निर्देश दिले होते. या उल्लंघनासाठी सिडकोला जबाबदार धरले पाहिजे, असे ‘एनएमईपीएस’चे अध्यक्ष विरेंद्र कुमार गांधी यांनी सांगितले.आमदार गणेश नाईक यांच्या इशाऱ्यानंतर जाग आलेल्या नवी मुंबई महापालिकेने डीपीएस तलावालगतचा बंधारा कापून भरतीचा प्रवाह तलावात येण्यासाठी तेथे ४५० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्याच्या कामास सुरुवात केली आहे. यामुळे तलावात लवकरच भरतीचे पाणी येईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हे करताना महापालिकेने या तलावातील घाण आणि गाळदेखील साफ करणे आवश्यक आहे. जेणेकरून पाणी तलावामध्ये प्रवेश करू शकेल, असे विरेंद्रकुमार गांधी म्हणाले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई