शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

ठाणे जिल्हाधिकारी हाजीर होऽऽ

By admin | Updated: December 22, 2016 06:03 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प स्थलांतराचा तिढा राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रलंबित आहे. १९ डिसेंबरला

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प स्थलांतराचा तिढा राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रलंबित आहे. १९ डिसेंबरला पार पडलेल्या सुनावणीत लवादाच्या न्या. देशपांडे व न्या. रहिम खंडपीठाने थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच पुढील सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.पालिकेने २००८ मध्ये उत्तनच्या धावगी-डोंगरी येथे बीओटी तत्त्वावर घनकचरा प्रकल्प सुरू केला होता. त्याला स्थानिकांनी तीव्र विरोध केल्यानंतरही तो सुरू झाल्याने आरोग्याच्या समस्येचा दावा उपस्थित करून स्थानिकांनी त्याच्या स्थलांतरासाठी पालिकेकडे सतत पाठपुरावा सुरू केला होता. सुरुवातीला तो घोडबंदर येथील वरसावे गावात स्थलांतर करण्याचा ठराव तत्कालीन महासभेत मंजूर करण्यात आला. तेथील ग्रामस्थांनीही त्याला जोरदार विरोध केल्यानंतर तो वसई तालुक्यातील सकवार येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, प्रकल्पासाठी जागा मिळावी, यासाठी पालिकेने राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला. त्याला अखेर यश आल्याने सरकारने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी सकवार येथे सुमारे ७० एकर जागा दिली. त्यापोटी पालिकेने ७२ लाख रु. जिल्हा प्रशासनाला अदा केले. परंतु, त्याचा सातबारा अद्याप पालिकेच्या नावे केलेला नाही. त्यातच, ही जागा वनविभागात येत असल्याने प्रकल्पासाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. या प्रकल्पात पालिकेला बीओटी तत्त्वावरील कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू करायचा असल्याने अद्याप त्याला ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. या दुहेरी अडचणीत सापडलेल्या पालिकेचा प्रकल्प सकवारमध्ये होऊ न देण्यासाठी सकवार ग्रामस्थांनीसुद्धा पंचायत सभेत ठराव मंजूर करून तो जिल्हा प्रशासनाकडे धाडला. यामुळे सकवारचा प्रकल्पसुद्धा सध्या अनिश्चितीच्या सावटाखाली असल्याने स्थानिकांनी प्रकल्प स्थलांतरासाठी नागरी हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून २०१५ मध्ये थेट राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठाकडे याचिका दाखल केली. त्यावर, पार पडलेल्या सुनावणीत लवादाने पालिकेच्या अडचणींच्या दाव्यावर वेळोवेळी कडक ताशेरे ओढून सकवार प्रकल्पापोटी येणाऱ्या खर्चापैकी सुमारे ७० कोटी रक्कम एस्क्रो खात्यात जमा करण्याचे आदेश २७ नोव्हेंबर २०१५ रोजी दिले. त्यावर पालिकेने उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवल्यानंतर न्यायालयाने लवादाकडेच पुढील सुनावणी सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर, पार पडलेल्या सुनावणीत ७० कोटी रक्कम भरण्याच्या आदेशावर लवादाने फेरविचार करण्याची पालिकेने विनंती केली. (प्रतिनिधी)