शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
4
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
5
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
6
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
7
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
8
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
9
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
10
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
11
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
12
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
13
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
14
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
15
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
16
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
17
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
18
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
19
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
20
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती

वैतीनगरात साकारले थायलंडचे गणेश मंदीर

By admin | Updated: September 23, 2015 23:39 IST

काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्र मंडळाने यंदा साकारलेले बँकॉकचे (थायलंड) गणेश मंदीर सध्या ठाणेकरांचे आकर्षण ठरले आहे. ‘काजूवाडीचा राजा’ अशी

जितेंद्र कालेकर , ठाणेकाजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्र मंडळाने यंदा साकारलेले बँकॉकचे (थायलंड) गणेश मंदीर सध्या ठाणेकरांचे आकर्षण ठरले आहे. ‘काजूवाडीचा राजा’ अशी ख्याती झालेल्या या मंडळाच्या गणेशालाही भाविकांची मोठी गर्दी होत आहे.मंडळाचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे. कला दिग्दर्शक संदीप वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील समीर भेकरे आणि अभिषेक बनकर यांच्या ४० जणांच्या टीमने बँकॉक येथील एका मॉलच्या बाजूला असलेल्या गणेश मंदीराची प्रतिकृती गेली दीड महिना मेहनत घेऊन साकारली आहे. ८ ते १५ सप्टेंबर या सात दिवसातच २४ बाय ४५ च्या भव्य मंडपाचे काम केले आहे. यासाठी प्रत्येक कामगाराचे मानधन तसेच इतर सामुग्रीसाठी मिळून साडेआठ ते नऊ लाखांचा खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती हे या मंडळाचे अध्यक्ष असून त्यांच्याच संकल्पनेतून काही तरी नविन करण्याच्या विचारातून बँकॉकचे हे मंदीर साकारले असून त्यामध्ये दहा फूटी ‘काजूवाडीचा राजा’ विराजमान झाला आहे. त्याला साजेशी आकर्षक एलईडी दिव्यांची रोषणाई केली आहे. त्यामुळे वीज बचतीबरोबरच दिव्यांच्या प्रखरतेचाही भाविकांना त्रास होत नाही. यासाठीही दीड ते दोन लाखांचा खर्च केला आहे. मंडळाने अधिकृत वीज जोडणी घेऊनच याठिकाणची रोषणाई केली आहे. मंडळामध्ये महिलांसह १०० पेक्षा अधिक कार्यकर्ते असून २५ पदाधिकारी आहेत. पर्यावरणभिमुख मंदिर उभारणीसाठी कापड, लाकूड फायबरचा वापर केला असून थर्माकोलचा नगण्य वापर केल्याचेही मंडळाचे कार्यकर्ते सांगतात.केवळ भक्तीगीते : गणेशोत्सवाच्या काळात या मंडपामध्ये मंद आवाजात केवळ भक्तीगीते आणि श्लोक, मंत्र यालाच प्राधान्य दिले जाते. सिनेमातील इतर गाण्यांना बंदी घातली आहे. पहिल्या दिवसापासून याठिकाणी बहुभाषिक भजने सादर केली जात आहेत. खड्डेविरहीत मंडप : माजी महापौरांच्या नावाने ओळख निर्माण झालेल्या या मंडळाने शिस्तही तशीच ठेवली आहे. या शिस्तीमुळेच याठिकाणी पत्ते खेळण्यालाही बंदी आहे. स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात येत असतो. त्यामुळे आवारापासून मंदीरात कुठेही कचरा आढळून येत नाही. याशिवाय, खड्डे विरहित मंडप उभारण्याची गेल्या चार वर्षांपासूनची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे.सामाजिक बांधिलकी...सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मंडळाने जांभूळपाडा (पाली, रायगड) येथील पूरग्रस्तांना काही वर्षांपूर्वी नऊ हजारांची आर्थिक मदत केली होती. हीच परंपरा कायम ठेवून यंदाही राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मंडळाच्यावतीने आर्थिक मदत केली जाणार असल्याचे वैती यांनी सांगितले.सुरक्षिततेची खबरदारीसुरक्षिततेची खबरदारी म्हणून याठिकाणी पाच सीसीटीव्ही लावलेले आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सतत जागता पहारा असतो. भाविकांना येण्यासाठी प्रशस्त मार्गही आहे.