शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

विमानतळबाधित दहा गावांच्या स्थलांतराची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 6:15 AM

अखेरच्या दिवशी मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद : पाच गावे १०० टक्के रिकामी

नवी मुंबई : विमानतळबाधित दहा गावांतील ग्रामस्थांना स्थलांतरासाठी दिलेली अखेरची मुदत मंगळवारी संपली. यानंतर कोणतीही मुदत दिली जाणार नसल्याने त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अखेरच्या दिवशी प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतराच्या प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, शेवटच्या टप्प्यात अर्ज देताना विमानतळबाधितांची गैरसोय होऊ नये, यासाठी सिडकोचा संबंधित विभाग रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आला होता.

दहा गाव संघर्ष समितीच्या विनंतीनुसार ग्रामस्थांना स्थलांतरासाठी १५ जानेवारीची अंतिम मुदत होती. मंगळवारी शेवटच्या टप्प्यात बांधकामे निष्कासित करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केले.सध्या स्थलांतरित होणाऱ्या दहा गांवापैकी वाघिवलीचा अपवाद वगळता उर्वरित नऊ गावे ९५ टक्के रिकामी झाल्याचा दावा सोमवारी सिडकोकडून करण्यात आला होता. मंगळवारी अखेरच्या दिवशी १०० टक्के स्थलांतर होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून सिडकोच्या संबंधित विभागात प्रकल्पग्रस्तांची गर्दी होती.

शेवटच्या दिवसापर्यंत दहा गावांपैकी गणेशपुरी, तरघर, वाघिवली वाडा व वरचे ओवळे ही पाच गावे एक-दोन प्रकरणांचा अपवाद वगळता १०० टक्के रिकामी झाली आहेत. तर कोल्ही आणि चिंचपाडा ही दोन गावे ९५ टक्के स्थलांतरित झाली आहेत.उलवे आणि कोंबडभुजे या दोन गावांतून ७० टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. वाघिवली या गावाचा विमानतळ गाभा क्षेत्राबाहेर समावेश होत असल्याने तूर्तास सिडकोला या गावाच्या स्थलांतराची घाई नाही. असे असले तरी आतापर्यंत या गावातील १५३ कुटुंबांपैकी ९० जणांनी स्थलांतर केले आहे.

अर्जांची दोन दिवसांत पडताळणी करणारबांधकाम निष्कासित करण्यासाठी अंतिम मुदतीच्या आत प्राप्त झालेल्या अर्जाची पुढील दोन दिवसांत संबंधित गावांत जाऊन पडताळणी केली जाईल. बांधकामे निष्कासित केल्याची खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतर हा संपूर्ण अहवाल राज्य शासनाला पाठविला जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्यांनी अर्ज दिले नाहीत; परंतु बांधकामे निष्कासित केली आहेत, त्यांचे त्याच दिवशी अर्ज स्वीकारले जातील, असे आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी विजय पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई