शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
2
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
3
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
4
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
5
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
6
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
7
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
8
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
9
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
10
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
11
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
12
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
13
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
14
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
15
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
16
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
17
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
18
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
19
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
20
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

तापमान ४२ अंशावर, अंगाची लाही लाही, दोन महिन्यांतला उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 2:49 AM

रविवारी नवी मुंबईतले तापमान ४२ डिग्री अंशावर पोचले होते. यामुळे दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांच्या अंगाची लाही लाही झाली.

नवी मुंबई : रविवारी नवी मुंबईतले तापमान ४२ डिग्री अंशावर पोचले होते. यामुळे दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांच्या अंगाची लाही लाही झाली. मागील दोन महिन्यांतला तापमानाचा हा उच्चांक असून उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात कमालीची वाढ झाली.देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार रविवारी या उष्ण लाटेची झळ नवी मुंबईकरांना चांगलीच बसली. सकाळी ७ वाजल्यापासूनच तापमान ३० अंश डिग्रीच्या आसपास होते. हे तापमान दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ४२ डिग्रीवर पोचले होते. पुढील अडीच तास तापमानाचा हा पारा कायम होता. त्यामुळे दुपारच्या सुमारास कामानिमित्ताने घराबाहेर निघालेल्यांच्या अंगाची चांगलीच लाही लाही झाली. अनेकांनी उष्णतेच्या लाटेची कल्पना असल्याने दुपारनंतर घराबाहेर निघायचे देखील टाळले. मात्र कामानिमित्ताने घराबाहेर निघालेल्या पादचारी व दुचाकीस्वारांना उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागले. ज्यांना उष्ण लाटेची कल्पना नव्हती, त्यांना तापमानातील अचानक झालेल्या बदलामुळे पुढील दोन महिन्यांतील उन्हाळ्याची कल्पना देखील सहन होत नव्हती. बस थांब्यावरील प्रवासी, सिग्नलला उभे राहणारे दुचाकीस्वार, मोकाट भटके प्राणी या प्रत्येकाकडून उन्हाचे चटके टाळण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार शोधला जात होता.रविवारी झालेली तापमानातील वाढ ही मागील दोन महिन्यांतील सर्वाधिक होती. मागील अनेक दिवसांपासून शहराचे तापमान ३५ ते ३८ डिग्रीपर्यंत जात होते. त्यामुळे उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल अनेकांना लागलेलीच होती. मात्र तापमान ४२ अंशापर्यंत जाईल याची अपेक्षा नवी मुंबईकरांनी केलेली नव्हती. उष्णतेची ही झळ आठवड्याभरात तीन वेळा नवी मुंबईकरांंना बसणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारप्रमाणेच मंगळवार व शुक्रवारी देखील देशात अनेक ठिकाणी पुन्हा अशी उष्ण लाट येणार आहे. त्यावेळी देखील नवी मुंबईतील तापमानाचा पारा ४२ डिग्रीच्या वर जाण्याची शक्यता आहे. अशावेळी लहान मुलांना घराबाहेर नेण्याचे टाळावे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.