शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शिक्षकांचे असहकार आंदोलन, ८ महिन्यांपासून वेतन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:55 IST

खारघर येथील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे गेल्या आठ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. थकीत वेतनामुळे कॉलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन चालू केले आहे.

नवी मुंबई - खारघर येथील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे गेल्या आठ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. थकीत वेतनामुळे कॉलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन चालू केले आहे. आंदोलनाचा दहावा दिवस उजाडला असून, याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्याने शिक्षकवर्गाकडून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. बुधवार, ४ एप्रिल रोजी अचानक महाविद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा देशमुख यांनी पाच शिक्षक, कर्मचाºयांच्या हजेरीबुक समोर लाल रेष मारून संबंधित शिक्षकांची सेवा समाप्त झाल्याचे कळविल्याने उपजीविकेवर गदा आल्याचा तीव्र संताप या शिक्षकांनी व्यक्त केला.वेतन नाही, त्यात हेतुपुरस्सर अचानक सहकाºयांवर झालेल्या कारवाईने सर्व स्टाफ प्राचार्यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये गेला व त्यांना घेराव टाकला. वेतन न देता कर्मचाºयांना कामावरून कसे कमी करता, असे विचारल्यावर प्राचार्यांनी उद्धटपणे उत्तरे दिली. वेतन लगेच करता येणार नाही आणि ज्यांना काढले आहे त्यांना परत घेण्यासही त्यांनी नकार दिला. वेतन द्यायचे नाही, तसेच कर्मचाºयांना कामावर काढून टाकायचे, असली मनमानी प्राचार्या मंजुषा देशमुख करीत असल्याने महाविद्यालयाच्या कर्मचाºयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या महिनाभरापासून दोन वेळा स्मरणपत्र पाठवूनही मुंबई विद्यापीठ, तंत्रशिक्षण संचालक, एआयसीटीई आणि महाराष्ट्र शासनदेखील आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मुक्ता शिक्षक संघटनेचे महासचिव सुभाष आठवले यांनी सांगितले. कर्मचाºयांच्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास त्याला प्राचार्य देशमुख याच जबाबदार असतील. त्यांचे हे मनमानी वर्तन थांबले नाही तर त्यांच्यावर छळवणुकीचा गुन्हा दाखल करावा लागेल, असेदेखील त्यांनी सांगितले. शासनाने या प्रकरणी दखल घेत ताबडतोब शिक्षकांचे थकीत पगार दिले जावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.शासनाकडून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीचे पैसे आजवर जमा झालेले नाहीत, अशी सबब सांगत शिक्षकांचा पगार थांबविला जात असल्याचेही मुक्ता शिक्षक संघटनेच सचिव सुभाष आठवले यांनी स्पष्ट केले.वेतन थांबविल्याप्रकरणी मुख्याध्यापिकेला जाब विचारला असता, अरेरावीची भाषा केल्याने तसेच त्यामुळे आलेल्या मानसिक ताणामुळे व्यथित होऊन तेथील महाविद्यालयाच्या प्राध्यापिका भूमी घरत यांना चक्कर आली व त्या जमिनीवर कोसळल्या. त्याच क्षणी त्यांना जवळच्या निरामय हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल केले असून अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.शासनाकडून निधीच मिळालेला नाहीशासनाच्या समाज कल्याण विभागाकडून दहा कोटी रुपयांचा निधी महाविद्यालयाला मिळालेला नाही, त्यामुळे शिक्षकांचा पगार देणे शक्य झालेले नाही, अशी प्रतिक्रिया मंजुषा देशमुख यांनी व्यक्त केली. कोणत्याही शिक्षकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलेले नाही, यामध्ये केवळ वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट संपला असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षकNavi Mumbaiनवी मुंबई