शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटमधील टारझनचा गांजा अड्डा पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 02:30 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील टारझनचा गांजा अड्डा दीड वर्षानंतर पुन्हा सुरू झाला आहे. २४ तास गांजाविक्री करण्यासाठी कमिशनवर मुले नेमण्यात आली आहेत.

नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील टारझनचा गांजा अड्डा दीड वर्षानंतर पुन्हा सुरू झाला आहे. २४ तास गांजाविक्री करण्यासाठी कमिशनवर मुले नेमण्यात आली आहेत. बिनधास्तपणे अमली पदार्थांची विक्री सुरू असताना बाजारसमिती प्रशासन व पोलीसही काहीच कारवाई करत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.मुंबईमधील भाजी मार्केट नवी मुंबईमध्ये स्थलांतर केल्यानंतर टारझन उर्फ हरिभाऊ विधाते याने या परिसरात अमली पदार्थ विक्रीचा अड्डा तयार केला होता. मार्केटच्या शेवटच्या गेटजवळील पानटपरी व बाहेरील महापालिकेचे सार्वजनिक प्रसाधनगृह येथे हा अड्डा सुरू होता. येथे गांजा विकणाºया मुलांची साखळी तयार करण्यात आली होती. २४ तास कधीही गांजा उपलब्ध करून दिला जात होता. जुलै ते आॅक्टोबर २०१६मध्ये ‘लोकमत’ने केलेल्या दोन स्टिंग आॅपरेशननंतर एपीएमसी पोलिसांनी व नंतर अमली पदार्थविरोधी पथकाने टारझनवर गुन्हा दाखल केला. त्याला तुरुंगात पाठविले होते. एक वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिलेला टारझन काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून आला आहे. तो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर येथील गांजा अड्डा पुन्हा सुरू झाला आहे. हा अड्डा टारझनच्या आशीर्वादानेच सुरू असल्याची चर्चा मार्केटमध्ये आहे; परंतु अद्याप त्या पाठीमागे कोण आहे? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. ‘लोकमत’च्या टीमने दोन दिवस या परिसरामध्ये स्टिंग आॅपरेशन केले. भाजी मार्केटमधील प्रसाधनगृहाला लागून बसलेले चार ते पाच तरुण बिनधास्तपणे गांजा ओढत होते. येथील उभ्या वाहनांमध्ये व हातगाड्यांवर बसून येणाºया ग्राहकांना १०० रुपयांमध्ये गांजाची पुडी दिली जात असल्याचे निदर्शनास आले.बाजारसमितीच्या गेटवरच अमली पदार्थांची विक्री सुरू असताना येथील सुरक्षा अधिकारी व कर्मचाºयांनी अद्याप काहीही आक्षेप घेतलेले नाहीत. पोलिसांची बिट मार्शल व इतर गस्ती वाहनेही मार्केटमध्ये दिवसरात्र पहारा ठेवत असतात; पण सर्वांना माहीत असलेला अड्डा पोलिसांना अजून का माहीत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बाजारसमितीमध्ये अनधिकृतपणे मुक्काम करत असलेले कामगार अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. याशिवाय महाविद्यालयीन तरुणही येथे गांजाखरेदी करण्यासाठी येत आहेत. गतवर्षी दोन वेळा पोलिसांनी कारवाई केली असल्यामुळे आता विक्रेत्यांनी सावधानता बाळगली आहे. अनोळखी व्यक्तीला गांजा विकत दिला जात नाही. गांजा अड्ड्याच्या परिसरामध्ये जास्त वेळ कोणी थांबले तरी त्याची विचारपूस केली जात आहे. या परिसराचे फोटो काढणाºयांनाही तत्काळ अडविले जात असून फोटो का काढले? याविषयी जाब विचारण्यात येत आहे.कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीरएपीएमसीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाºयांना व अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांना अभय दिले जात आहे. येथील प्रसाधनगृह व इतर ठिकाणी अमली पदार्थांची साठवणूक केली जात आहे. वेळेत गुन्हेगारांवर कारवाई केली नाही तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बेकायदेशीर वास्तव्यबाजारसमितीमध्ये अनुज्ञप्ती नसलेल्या कोणालाही काम करता येत नाही व येथे थांबताही येत नाही; परंतु गांजाविक्रेते सर्व नियम धाब्यावर बसवून मार्केटमध्ये दिवस- रात्र बिनधास्तपणे वावरत आहेत. सर्वांसमोर गांजा ओढत असतात व विक्रीही करत असतात. हा बेकायदेशीर व्यवसाय थांबविण्यासाठी प्रशासन काहीही करत नसल्यामुळे व्यापारी व इतर घटकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.